शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रोजगार हमीच्या कामावरून गदारोळ

By admin | Updated: November 17, 2014 23:22 IST

मिरज पं. स. बैठक : दिलीप बुरसे यांचा कारवाईचा इशारा

मिरज : मिरज तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या जनावरांचा गोठा बांधकाम व विहीर खुदाईसाठी अडवणुकीमुळे कामे रखडल्याच्या तक्रारीमुळे सभापती व सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांपासून कर्मचारी व ग्रामसेवकांची झाडाझडती घेतली. १ डिसेंबरपर्यंत कामे मार्गी लागून लाभार्थ्यांना कामाचे हप्ते न दिल्यास दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. बैठकीत एकमेकांकडे बोटे दाखवून गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारी झटकण्याच्या केलेल्या प्रयत्नाचाही समाचार घेण्यात आला.मिरज तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांचा गोठा बांधकाम, विहीर खुदाईच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी उसनवार पैसे घेऊन ही कामे सुरु केली आहेत. बऱ्याच लाभार्थ्यांनी गोठा बांधकाम व विहीर खुदाईची कामे सुरु केली असताना झालेल्या कामांचा एकही हप्ता मिळाला नाही. हेलपाटे मारुनही अधिकारी व कर्मचारी दाद देत नसल्याने वैतागलेल्या लाभार्थ्यांनी सभापती दिलीप बुरसे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. तक्रारींची दखल घेऊन सभापती दिलीप बुरसे, सदस्य सतीश निळकंठ, शंकर पाटील, बाबासाहेब कांबळे, तानाजी पाटील यांच्यासह गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, रोजगार हमी योजनेचे अधिकारी व ग्रामसेवकांच्या उपस्थितीत रोजगार हमी योजनेच्या कामांची आढावा बैठक घेण्यात आली. बुरसे यांनी तालुक्यातील गावनिहाय कामांचा ग्रामसेवकांकडून आढावा घेतला. यामध्ये कांही गावात कामांना मंजुरी देण्यात आली नसल्याचे तर मंजूर कामांना कर्मचाऱ्यांकडून काम सुरु करण्यास मोजमापे दिली जात नसल्याने कामे सुरु नाहीत, मस्टर मागणीस टाळाटाळ, पूर्ण झालेल्या कामांचे मस्टर भरुन देऊनही पंचायत समितीतून पूर्ण केलेल्या कामांचा पहिला हप्ताही मिळत नसल्याचे दिसून आले. दिलीप बुरसे, सतीश निळकंठ, शंकर पाटील व बाबासाहेब कांबळे यांनी लाभार्थ्यांनी कामे पूर्ण करुनही एकही हप्ता न दिल्याबद्दल गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला. गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या भूमिकेचा पदाधिकाऱ्यांनी समाचार घेतला. रोजगार हमी योजनेंतर्गत कामे रखडण्यास व लाभार्थ्यांची अडवणूक करण्यास प्रशासन जबाबदार असल्याचे लक्षात येताच बुरसे यांनी रखडलेली कामे मार्गी लावून पूर्ण केलेल्या कामांचे हप्ते देण्यात अडवणूक केल्यास दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला. (वार्ताहर)अर्थपूर्ण तडजोडीचा आरोपरोजगार हमी योजनेंतर्गत कामे मंजूर करताना विसंगती दिसून येते. ज्या गावांतील कामासाठी अर्थकारण झाले अशा कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या गावातील लाभार्थ्यांकडून आर्थिक तडजोडी केल्याचा आरोप सदस्य शंकर पाटील यांनी केला.