शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

भारती विद्यापीठाच्या जमीन व्यवहाराची चौकशी करा

By admin | Updated: October 1, 2015 00:43 IST

विलासराव जगताप : त्रिसदस्यीय समिती नेमा

सांगली : भारती विद्यापीठाने शासनाच्या विविध खात्यांकडून मिळविलेल्या सर्व जमिनींची चौकशी शासनाने त्रिसदस्यीय समितीमार्फत करावी, अशी मागणी आ. विलासराव जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. जगताप म्हणाले की, संपूर्ण राज्यभरात महसूल, वने, सीडको, एमआयडीसी अशा अनेक खात्यांच्या व महामंडळांच्या जमिनी भारती विद्यापीठाने लाटल्या आहेत. त्यांचे भाडे थकित असून, ज्या कारणासाठी जमिनी घेतल्या, त्यासाठी त्यांचा वापरही केला नाही. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. तत्कालीन शासकीय यंत्रणाही या प्रकरणात सामील आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे लाटलेल्या जमिनी शासनाने ताब्यात घेतानाच, भाड्यापोटी थकित रकमेवर चक्रवाढ व्याज लावून सर्व वसुली करावी. दिघी (ता. श्रीवर्धन, जि. रायगड) येथील खाडीलगत असलेली गट क्र. २३३ ही २३ हेक्टर जागा १९९५ मध्ये कोळंबी विकास कार्यक्रमांतर्गत भारती विद्यापीठ व कोकण विद्यापीठाने घेतली. सांगलीतील विद्यापीठ इमारतीच्या जागेचीही थकबाकी २१ कोटी ५३ लाख ६५ हजार ५00 रुपये इतकी आहे. गेल्या अनेक वर्षांची ही थकबाकी वसूल करावी, अशी मागणी आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदमच या बेकायदेशीर व्यवहारामागे आहेत. त्यामुळे सर्व जमीन व्यवहारांची चौकशी शासनाने करावी. याबाबतची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)सर्व व्यवहार कायदेशीर विद्यापीठाचे सर्व जमिनीचे व्यवहार हे कायदेशीर व पारदर्शीपणाने केले आहेत. भाड्यासंदर्भात स्थानिक पातळीवर महसूल विभागाने दिलेल्या नोटिसांनाही त्या-त्यावेळी उत्तर दिले आहे, अशी माहिती भारती विद्यापीठाचे संचालक डॉ. नितीन नायक यांनी दिली.