शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची चौकशी करा, पण बदनामी नको

By admin | Updated: September 21, 2015 00:07 IST

सुधीर गाडगीळांच्या आरोपाने खळबळ : घोटाळे सिद्ध न झाल्यास राजीनामा देण्याची मागणी

सांगली : सांगली महापालिकेत पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याच्या, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या आरोपबॉम्बने शहरात खळबळ उडाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीप्रणित विकास महाआघाडीच्या कारभारावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. खरंच, पालिकेत घोटाळे झाले असतील, तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई व्हावी, पण केवळ राजकीय विरोधातून महापालिकेची बदनामी नको, अशी प्रतिक्रियाही सर्वच स्तरातून उमटत आहे. सत्ताधारी काँग्रेसने तर गाडगीळांनाच कात्रीत धरण्याची तयारी चालविली आहे. घरकुल, पाणीपुरवठासह एचसीएल व इतर योजनांचा निधी महाआघाडीच्या काळात खर्च झाला आहे. त्यामुळे ज्या महाआघाडीने त्यांना विधानसभेवेळी मदत केली, तीच अडचणीत येत असेल, तर काँग्रेसने या संधीचा फायदा घेण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षात ड्रेनेजमधील आराखडाबाह्य कामे वगळता, काँग्रेसवर फार मोठे आरोप झालेले नाहीत. पाणी खासगीकरणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर असला तरी, त्याचा ठरावही महाआघाडीच्या काळातच झाला आहे. तेव्हा या घोटाळ्याची पारदर्शी चौकशी व्हावी, अशीच अपेक्षा काँग्रेस करीत आहे. (प्रतिनिधी) भाजपचे नगरसेवक काय करीत होते?महापालिकेत पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केला आहे. विकास महाआघाडीच्या तीन व काँग्रेसच्या गेल्या दोन वर्षातील कारभाराच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. महाआघाडीच्या सत्तेत भाजपही सहभागी होता. या सत्तेत सलग पाच वर्षे भाजपकडेच उपमहापौरपद होते, तर त्यांच्याच ज्येष्ठ नगरसेवकाला स्थायी समिती सभापतीपदही दिले होते. आताच्या काँग्रेस सत्ताकाळातही भाजपचे संख्याबळ सहा ते सातच्या घरात आहे. मग घोटाळे होत असताना या नगरसेवकांनी कधी तोंड का उघडले नाही?, असा सवाल उपमहापौर प्रशांत पाटील यांनी उपस्थित केला.