शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

समाजाच्या ‘डीएनए’मध्येच विषमता

By admin | Updated: December 15, 2015 00:32 IST

नीरजा : इस्लामपुरात एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात

इस्लामपूर : कालबाह्य स्त्रीवादी परंपरांना कवटाळून बसलेल्या समाजाच्या डीएनएमध्येच विषमता आहे. सामाजिक विषमतेची ही एक बाजू असतानाच, आता कथाकथित संस्कृती रक्षकांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालून भयाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. अशावेळी साहित्यिकांनी नवा विचार देणारे आणि समाजाला भान देणारे साहित्य निर्माण करायला हवे, असे मत प्रसिध्द कवयित्री नीरजा यांनी व्यक्त केले.लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषद व राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्यावतीने रविवारी आयोजित २३ व्या एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन कवयित्री नीरजा बोलत होत्या.संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. वि. रा. तोडकर यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह प्रा. शामराव पाटील, प्राचार्या डॉ. दीपा देशपांडे, स्वागताध्यक्ष एस. टी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाच्या सुरुवातीस शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना आदरांजली वाहण्यात आली.कवयित्री नीरजा म्हणाल्या, अखिल भारतीय संमेलनांपेक्षा छोट्या संमेलनांतून गंभीरपणे विचार मांडले जातात. सध्या असहिष्णुतेच्या वातावरणामुळे प्रामाणिकपणे व्यक्त होणे देखील अडचणीचे ठरत आहे. या दबावाच्या वातावरणाशी संघर्ष करण्यात साहित्यिकांचा वेळ जातो आहे. जातीअंताच्या लढ्याकडे ज्या गांभीर्याने पाहिले जाते, तेवढ्या गांभीर्याने स्त्रीमुक्तीकडे पाहिले जात नाही. स्त्रीला सत्तेपेक्षा समानता हवी आहे.प्रा. डॉ. वि. रा. तोडकर म्हणाले, केशवसूत, मर्ढेकर, नारायण सुर्वे यांच्या परंपरेतील स्त्रीविश्वाचे वर्णन करणाऱ्या कवयित्री नीरजा या एक महत्त्वाच्या साहित्यिक आहेत. त्यांच्या कथा व कवितांमधील एकही वाक्य सुटणार नाही, अशी गोडी वाचकाला लागून राहते, असेही तोडकर यांनी सांगितले.यावेळी शहानवाज मुल्ला यांच्या ‘दु:ख उराशी आले’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन मिरजे यांच्याहस्ते करण्यात आले, तर ‘लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती’ पुरस्कार पांडुरंग मोरे यांच्या ‘आथारी’ या कथासंग्रहास, तसेच समाधान महाजन यांच्या ‘अस्वस्थ क्षणाचे पाश’ या काव्यसंग्रहास देण्यात आला.स्वागताध्यक्ष एस. टी. पाटील यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. दीपा देशपांडे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. प्रा. दशरथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मंगल कोकाटे यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य विश्वास सायनाकर, प्रा. प्रदीप पाटील, प्रा. राजा माळगी, प्रा. दीपक स्वामी, प्रा. सुभाष खोत, वैजयंती पेठकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर) संघर्षात वेळ जातो : स्त्रीमुक्तीबाबत गंभीर व्हासध्या असहिष्णुतेच्या वातावरणामुळे प्रामाणिकपणे व्यक्त होणे देखील अडचणीचे ठरत आहे.दबावाच्या वातावरणाशी संघर्ष करण्यात साहित्यिकांचा वेळ जातो आहे.जातीअंताच्या लढ्याकडे ज्या गांभीर्याने पाहिले जाते, तेवढ्या गांभीर्याने स्त्रीमुक्तीकडे पाहिले जात नाही. अखिल भारतीय संमेलनांपेक्षा छोट्या संमेलनांतून गंभीरपणे विचार मांडले जातात.स्त्रीला सत्तेपेक्षा समानतेची गरज आहे.