शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

समाजाच्या ‘डीएनए’मध्येच विषमता

By admin | Updated: December 15, 2015 00:32 IST

नीरजा : इस्लामपुरात एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात

इस्लामपूर : कालबाह्य स्त्रीवादी परंपरांना कवटाळून बसलेल्या समाजाच्या डीएनएमध्येच विषमता आहे. सामाजिक विषमतेची ही एक बाजू असतानाच, आता कथाकथित संस्कृती रक्षकांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालून भयाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. अशावेळी साहित्यिकांनी नवा विचार देणारे आणि समाजाला भान देणारे साहित्य निर्माण करायला हवे, असे मत प्रसिध्द कवयित्री नीरजा यांनी व्यक्त केले.लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषद व राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्यावतीने रविवारी आयोजित २३ व्या एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन कवयित्री नीरजा बोलत होत्या.संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. वि. रा. तोडकर यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह प्रा. शामराव पाटील, प्राचार्या डॉ. दीपा देशपांडे, स्वागताध्यक्ष एस. टी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाच्या सुरुवातीस शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना आदरांजली वाहण्यात आली.कवयित्री नीरजा म्हणाल्या, अखिल भारतीय संमेलनांपेक्षा छोट्या संमेलनांतून गंभीरपणे विचार मांडले जातात. सध्या असहिष्णुतेच्या वातावरणामुळे प्रामाणिकपणे व्यक्त होणे देखील अडचणीचे ठरत आहे. या दबावाच्या वातावरणाशी संघर्ष करण्यात साहित्यिकांचा वेळ जातो आहे. जातीअंताच्या लढ्याकडे ज्या गांभीर्याने पाहिले जाते, तेवढ्या गांभीर्याने स्त्रीमुक्तीकडे पाहिले जात नाही. स्त्रीला सत्तेपेक्षा समानता हवी आहे.प्रा. डॉ. वि. रा. तोडकर म्हणाले, केशवसूत, मर्ढेकर, नारायण सुर्वे यांच्या परंपरेतील स्त्रीविश्वाचे वर्णन करणाऱ्या कवयित्री नीरजा या एक महत्त्वाच्या साहित्यिक आहेत. त्यांच्या कथा व कवितांमधील एकही वाक्य सुटणार नाही, अशी गोडी वाचकाला लागून राहते, असेही तोडकर यांनी सांगितले.यावेळी शहानवाज मुल्ला यांच्या ‘दु:ख उराशी आले’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन मिरजे यांच्याहस्ते करण्यात आले, तर ‘लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती’ पुरस्कार पांडुरंग मोरे यांच्या ‘आथारी’ या कथासंग्रहास, तसेच समाधान महाजन यांच्या ‘अस्वस्थ क्षणाचे पाश’ या काव्यसंग्रहास देण्यात आला.स्वागताध्यक्ष एस. टी. पाटील यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. दीपा देशपांडे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. प्रा. दशरथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मंगल कोकाटे यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य विश्वास सायनाकर, प्रा. प्रदीप पाटील, प्रा. राजा माळगी, प्रा. दीपक स्वामी, प्रा. सुभाष खोत, वैजयंती पेठकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर) संघर्षात वेळ जातो : स्त्रीमुक्तीबाबत गंभीर व्हासध्या असहिष्णुतेच्या वातावरणामुळे प्रामाणिकपणे व्यक्त होणे देखील अडचणीचे ठरत आहे.दबावाच्या वातावरणाशी संघर्ष करण्यात साहित्यिकांचा वेळ जातो आहे.जातीअंताच्या लढ्याकडे ज्या गांभीर्याने पाहिले जाते, तेवढ्या गांभीर्याने स्त्रीमुक्तीकडे पाहिले जात नाही. अखिल भारतीय संमेलनांपेक्षा छोट्या संमेलनांतून गंभीरपणे विचार मांडले जातात.स्त्रीला सत्तेपेक्षा समानतेची गरज आहे.