शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

सांगली जिल्ह्यातील अपात्र २०७८ शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:23 IST

सांगली : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील त्रुटी असलेल्या २०७८ शेतकºयांची दुरुस्ती यादी

ठळक मुद्दे दुरुस्ती यादी शासनाकडे : लाभार्थींना सहकार विभागाचा दिलासावेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तांत्रिक चुका समोर आल्या होत्या

सांगली : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील त्रुटी असलेल्या २०७८ शेतकºयांची दुरुस्ती यादी शासनाच्या पोर्टलवर शुक्रवारी पुन्हा अपलोड करण्यात आली. कर्जमाफीच्या योजनेपासून संबंधित लाभार्थी वंचित राहणार असल्याची भीती निर्माण झाली होती. पात्र शेतकºयांचे नुकसान होणार नसल्याची दक्षता घेत दुरुस्ती यादी शासनाकडे परत पाठविण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतगत मागील आठवड्यापासून कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा होत आहे. जिल्ह्यासाठी १९ हजार ७७४ शेतकºयांना ७२ कोटी कर्जमाफी मिळाली आहे. ती जिल्हा बँकेने विकास सोसायट्यांच्या आणि सोसायट्यांनी संबंधित कर्जदार शेतकºयांच्या खात्यावर जमा केली आहे. कर्जमाफी योजनेतील शेतकºयांची खाती बंद करण्यात येत असताना, त्यातील अनेक शेतकºयांच्या यादीत त्रुटी आढळून आल्या. त्रुटी आढळल्याने वीस हजार शेतकºयांपैकी दोन हजार ७८ शेतकरी अपात्र ठरणार असल्याचे अटळ होते. त्या शेतकºयांची सहा कोटी ३४ लाख रुपये रक्कम असून ती शासनाकडे परत जाणार होती. शेतकरी पात्र असूनही कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती.

पात्र शेतकºयांवर अन्याय होणार नसल्याची दक्षता घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेला दोन हजार ७८ शेतकºयांच्या यादीतील त्रुटी दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी बँकेला सुटी असतानाही अधिकारी आणि कर्मचारी यादीतील त्रुटींची दुरुस्ती करण्यात व्यस्त होते. रात्री उशिराने शासनाच्या पोर्टलवर पुन्हा दुरुस्ती यादी अपलोड करण्यात आली. यादीमध्ये कर्जदार शेतकºयांच्या नावात बदल, रकमेत तफावत होती. तसेच काही शेतकºयांची कर्जमाफीची रक्कम प्रोत्साहन अनुदान, तर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम कर्जमाफीच्या यादीत होती. त्याची पडताळणी करुन ती दुरुस्त करण्यात आली. त्रुटी दुरुस्त करुन शासनाला पाठविण्यात आलेल्या यादीतील शेतकºयांची नावे ग्रीन यादीमध्येही दिसणार असल्याचे बँकेच्या अधिकाºयांनी सांगितले.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी आणि कर्मचाºयांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील दोन हजार ७८ शेतकºयांना सहा कोटी ३४ लाखांच्या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. तसेच राज्य शासनाच्या सहकार विभागाच्या अधिकाºयांनीही अपात्र यातील दुरुस्तीस मंजुरी दिली आहे. यामुळे अपात्र दोन हजार ७८ शेतकºयांना कर्जमाफीचा फायदा होणार हे निश्चित झाले आहे. जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनीही अपात्र शेतकरी पात्र झाले असल्याचे सांगितले.

दरम्यान, शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सर्वच शेतकºयांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. यासाठी आंदोलनाचा लढा चालूच ठेवला आहे. या लढ्यामुळेही सरकार कर्जमाफीतील पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घेत आहे. तसेच अपात्र लाभार्थींना लाभही झाला नाही पाहिजे, याची सहकार विभागातील अधिकारी दक्षता घेत आहेत.संख्या वाढणार : अधिकाºयांचे संकेतसांगली जिल्ह्यात प्राप्त अर्जांपैकी १ लाख ७१ हजार कर्जदारांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा बॅँकेला, तर ५१ हजार कर्जदारांची माहिती देण्याचे आदेश अन्य बॅँकांना दिले होते. छाननीमध्ये यातील अनेकजण एकाच कुटुंबातील असल्यामुळे ही संख्या कमी झाली होती. आधार क्रमांक, कर्जाची रक्कम, थकबाकीचा तपशील अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तांत्रिक चुका समोर आल्या होत्या. त्या चुकांची दुरुस्ती सुरु होती. जिल्हा बँकेत यासाठी स्वतंत्र यंत्रणा कामाला लागली आहे. तांत्रिक दोष दूर करेपर्यंत बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी तांत्रिक दोष दूर केल्यामुळेच दोन हजार ७८ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे.