शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘इंदिरा आवास’ घोटाळ्याची चौकशी होणार

By admin | Updated: January 13, 2016 23:23 IST

नियामक मंडळाच्या बैठकीत निर्णय : सात आमदार, खासदारांची दांडी

सांगली : तांदूळवाडी (ता. वाळवा) गावासह जिल्ह्यातील सर्वच इंदिरा आवास घरकुल योजनेच्या निधी वाटपाची सखोल चौकशी करण्याची मागणी बुधवारी नियामक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या बैठकीस सात आमदार आणि खासदारांनी दांडी दिल्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद अध्यक्षा होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण विकास यंत्रणेकडील नियामक मंडळाची बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात झाली. या बैठकीस आमदार विलासराव जगताप, नियामक मंडळाचे अशासकीय सदस्य प्रकाश पाटील, रोहिदास सातपुते, अनुराधा शिंदे, आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सुमन देशमुख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, प्रकल्प संचालक अजयकुमार माने आदी उपस्थित होते. नियामक मंडळाच्या बैठकीस सर्व आमदार, दोन खासदारांना निमंत्रित केले होते. पण, या बैठकीस केवळ आ. जगताप उपस्थित होते. उर्वरित सात आमदार आणि दोन खासदारांनी दांडी दिली. नियामक मंडळाचे अशासकीय सदस्य व वाळवा पंचायत समितीचे सदस्य प्रकाश पाटील यांनी तांदुळवाडी येथील इंदिरा आवास घरकुल योजनेतील लाभार्थींच्या निधीच्या घोटाळ्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आ. जगताप यांनीही, घरकुल योजनेतील निधीवर जर कोण डल्ला मारत असेल, तर त्याची सखोल चौकशी करून ग्रामसेवक आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, असे सांगितले. होर्तीकर व दिलीप पाटील यांनी तांदुळवाडी घरकुल घोटाळ्याची चौकशी करून दोषी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. इंदिरा आवास घरकुल योजनेचा आढावा घेऊन निधीतील घोटाळा झाला आहे का, याचाही शोध घेतला जाईल, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि मुद्रा योजनेतील कर्ज देण्याकडे बँका दुर्लक्ष करीत आहेत, असा सदस्यांनी आरोप केला. यावेळी सर्व बँकांची बैठक घेऊन कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात येईल, असे आश्वासन माने यांनी दिले. (प्रतिनिधी) पीक विम्याचा लाभ द्या खरीप हंगामामध्ये पाऊस कमी झाल्याने खरीप पिकांचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ झाला आहे का, याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल घ्यावा. एकही शेतकरी विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जगताप यांनी दिली.