शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

भविष्यात भारताचे युध्द चीन-पाकशी एकाचवेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:14 IST

सांगली : जागतिक पातळीवरील घडामोडी लक्षात घेतल्यास, भविष्यातील भारताचे युध्द चीनशीच असेल आणि त्यावेळी पाकिस्तानशीही लढावे लागेल, असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.सांगली शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिना ब्रिगेडियर हेमंत महाजन च्या निमित्ताने शनिवारी आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘चीन पुरस्कृत दहशतवाद’ असा व्याख्यानाचा विषय होता. येथील मालू हायस्कूलच्या क्रीडांगणावर ...

सांगली : जागतिक पातळीवरील घडामोडी लक्षात घेतल्यास, भविष्यातील भारताचे युध्द चीनशीच असेल आणि त्यावेळी पाकिस्तानशीही लढावे लागेल, असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.सांगली शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाब्रिगेडियर हेमंत महाजन च्या निमित्ताने शनिवारी आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘चीन पुरस्कृत दहशतवाद’ असा व्याख्यानाचा विषय होता. येथील मालू हायस्कूलच्या क्रीडांगणावर केशवराव दीक्षित गौरव व्याख्यानमाला सुरू आहे. सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर यावेळी उपस्थित होते.महाजन हणाले की, डोकलामच्या निमित्ताने चीन आणि भारतामध्ये मोठा तणाव निर्माण झाला. चीनबद्दल भीतीचे वातावरणही पसरले; मात्र ते एक मानसिक युध्द होते. ते आपण जिंकले आहे. आपल्याला यापुढेही अशा युध्दांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी आपल्याला अंतर्गत सुरक्षेकडे विशेषत: दहशतवाद व नक्षलवादाकडे गांभीर्याने पाहायला हवे. चीनची युध्दखोरीची प्रवृत्ती कायम आहे. त्यांना भारताला हरवून, जगात आपणच दादा आहोत, हे सिध्द करायचे आहे; मात्र गेल्या नऊ वर्षांत भारताने केलेली तयारी मोठी आहे. बंदरांचा विकास जलदगतीने होत आहे. त्याचवेळी चीनचे शेजारी राष्ट्रांशी असलेले संबंध पाहता, तसेच आपल्याशी त्यांची सुरु असलेली मैत्री पाहता, चीनला भारताविरुध्द युध्द पुकारणे तेवढे सोपे नाही. २०२० मध्ये चीन ते युध्द करेल, असेही जाणकारांचे मत आहे. त्यावेळी पाकिस्तानही आपल्याशी युध्द करेल. त्याची तयारी म्हणून ते पाकिस्तानशी जोडणारा चार हजार किलोमीटरचा महामार्ग बनवत आहेत. मात्र हा रस्ता त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. श्रीलंकेतील त्यांचे बंदर ज्याप्रमाणे आज बंद पडल्यात जमा आहे, तशीच या महामार्गाची अवस्था होईल. आपणही या महामार्गाचा भविष्यात युध्दासाठी वापर करु शकतो. त्याचवेळी पाकिस्तानमधून चीनशी व्यापार झालाच, तर तो दहशतवादाचा होईल. त्यामुळे त्या मार्गाची फारशी भीती बाळगण्याचे कारण नाही. आपल्याला चीनविरुध्द लढायचे आहेच, मात्र त्याचवेळी त्यासाठी जगातील त्यांच्या शत्रुराष्टÑांसोबत आपल्याला मैत्री करावी लागेल, असेही ते म्हणाले.महान कार्याचा ध्यास हवासध्याचे सरकार त्यादिशेने पाऊल टाकत आहे. नुकतेच झालेले आॅस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान या राष्ट्रांबरोबरचे आपले करार त्या रणनीतीचा भाग आहेत. असे मैत्रीसंबंध वाढवून आपण चीनवर दबाव निर्माण करू शकतो. ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण आता बदलत आहे. या बदलांचा कानोसा घेऊन आपली धोरणे ठरली पाहिजेत. देश महान होण्यासाठी देशातील नागरिकांनी महान कार्याचा ध्यास घेतला पाहिजे, असेही महाजन म्हणाले.