शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बेदाणा निर्मितीचा वाढता खर्च पेलवेना!

By admin | Updated: March 23, 2015 00:38 IST

उत्पादक अडचणीत : औषधे, खतांच्या किमती गगनाला; हमी भावाची शेतकऱ्यांची मागणी

संजय माने - टाकळी --निसर्गाचा लहरीपणा, दिवसेंदिवस औषधे व खतांच्या वाढणाऱ्या किमती आणि दलालांकडून होणाऱ्या अडवणुकीने मिरज पूर्व भागासह जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. खर्चाच्या तुलनेत योग्य भाव न मिळाल्यास शेतकरी बेदाणा निर्मितीकडे पाठ फिरविण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षभरामध्ये शेतीऔषधे व खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पर्यायाने द्राक्ष उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली. मात्र बेदाणा व द्राक्ष विक्री दरात वाढ झालेली नाही. बेदाण्याची आवक घटली तरच दर वाढविला जातो. आवक वाढल्यास दलाल दराचा प्रश्न निर्माण करतात. औषधे व खताची दरवाढ ही शासननिर्णयाने होते. ही दरवाढ शेतकरी निमूटपणे स्वीकारतो. पण शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा याकडे कोणाचेच लक्ष नसते, ही वस्तुस्थिती आहे. निसर्गाच्या अवकृपेने होणारे नुकसान टाळता येत नसले तरी, बहुतांश वेळा दलालीचा फटका बसतो. नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांचा द्राक्ष असो अथवा अन्य शेतीमाल असो, त्या मालाचा दर साखळी पध्दतीने दलाल ठरवितात. शेतकऱ्यांना हमीभाव देणारी बाजारपेठ नसल्यामुळे दलालांमुळे बेदाण्यास योग्य भाव मिळत नाही. बेदाणा उत्पादनाचा खर्च व आजचा बेदाण्याचे दर पाहता, बेदाणा उत्पादित शेतकऱ्यांना नुकसानीत हा व्यवसाय करावा लागत असल्याने, शासनस्तरावर याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आयात होणाऱ्या औषधांच्या ंिकमतीत २० ते ३० टक्क्याने वाढ झाली आहे. मजुरांच्या मजुरीतही वाढ झाली आहे. विक्री केलेल्या बेदाण्याचे पैसे दलालांकडून त्वरित हवे असल्यास, २ टक्के वटाव घेतला जातो. त्यापुढे वटाव कट न करता पैसे पाहिजे असल्यास बेदाणा खरेदीपासून दीड ते दोन महिन्यांनी शेतकऱ्यास दलालाकडून पैसे दिले जातात. दलालांकडून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या या पिळवणुकीची दखल घेऊन मार्केट कमिटीने खरेदी केलेल्या मालाचे पैसे आठ दिवसात देण्याचा ठराव केला आहे. ठराव केला असला तरी, दलालांवर वचक नसल्याने या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. एक किलो बेदाणा बनविण्यास शेतकऱ्यास २५ रूपये, एक एकरास द्राक्ष निर्मितीसाठी लागणाऱ्या औषधांसाठी ४० हजार, मजुरी ६० हजार रुपये, असा एक लाख रुपये खर्च होतो. एकरी अडीच टन बेदाणा प्रक्रियेस मजुरी, प्रक्रियेचे केमिकल्स, वाहतूक, शेड, कोल्ड स्टोअरेज भाडे हा खर्च पाहता, द्राक्षशेती न परवडणारी आहे. बेदाणा उत्पादन हेही बेभरंवशाचे होऊन बसले आहे. बेदाण्याची आवक वाढल्यास व्यापारी दरात घसरण करतात. उत्पादन घटले, तरच दर वाढवितात. अशी परिस्थिती दरवर्षी ठरलेली असते. अवकाळीमुळे चांगल्या दर्जाच्या बेदाण्याचे प्रमाण घटल्याने सध्या चांगल्या मालाला १५० ते १७५ रुपयांपर्यंत दर आहे. अवकाळीमुळे भिजलेला बेदाणा कवडीमोल किमतीने विकावा लागणार आहे. एकूण परिस्थिती पाहता, निसर्गाचा फटका आणि दलालांची अडवणूक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारी ठरु लागली आहे. यातून बँकेच्या कर्जाचे हप्ते आणि पुढील हंगामाच्या तयारीचे नियोजन करायचे ठरविल्यास शेतकऱ्यास खासगी सावकार व बँकांचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. याची दखल घेऊन शासनाने एक तर औषधे व खतांच्या वाढत्या दरांना लगाम घातला पाहिजे. दरवाढ अटळच असेल, तर दलालांची साखळी तोडून शेतकऱ्यांच्या उत्पादित बेदाण्याला हमीभाव देण्याचे नियोजन केले पाहिजे. अन्यथा भविष्यात शेतकरी द्राक्षशेतीकडे पाठ फिरविण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना हमीभाव देणारी बाजारपेठ अथवा यंत्रणा नसल्याने निर्माण झालेल्या दलालांच्या साखळीमुळे बेदाण्यास योग्य भाव मिळत नाही. बेदाणा उत्पादनाचा खर्च व आजचा बेदाण्याचा दर पाहता, बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीत हा व्यवसाय करावा लागत आहे. शासनस्तरावर याची दखल घेण्याची गरज आहे.