शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

बेदाणा निर्मितीचा वाढता खर्च पेलवेना!

By admin | Updated: March 23, 2015 00:38 IST

उत्पादक अडचणीत : औषधे, खतांच्या किमती गगनाला; हमी भावाची शेतकऱ्यांची मागणी

संजय माने - टाकळी --निसर्गाचा लहरीपणा, दिवसेंदिवस औषधे व खतांच्या वाढणाऱ्या किमती आणि दलालांकडून होणाऱ्या अडवणुकीने मिरज पूर्व भागासह जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. खर्चाच्या तुलनेत योग्य भाव न मिळाल्यास शेतकरी बेदाणा निर्मितीकडे पाठ फिरविण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षभरामध्ये शेतीऔषधे व खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पर्यायाने द्राक्ष उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली. मात्र बेदाणा व द्राक्ष विक्री दरात वाढ झालेली नाही. बेदाण्याची आवक घटली तरच दर वाढविला जातो. आवक वाढल्यास दलाल दराचा प्रश्न निर्माण करतात. औषधे व खताची दरवाढ ही शासननिर्णयाने होते. ही दरवाढ शेतकरी निमूटपणे स्वीकारतो. पण शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा याकडे कोणाचेच लक्ष नसते, ही वस्तुस्थिती आहे. निसर्गाच्या अवकृपेने होणारे नुकसान टाळता येत नसले तरी, बहुतांश वेळा दलालीचा फटका बसतो. नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांचा द्राक्ष असो अथवा अन्य शेतीमाल असो, त्या मालाचा दर साखळी पध्दतीने दलाल ठरवितात. शेतकऱ्यांना हमीभाव देणारी बाजारपेठ नसल्यामुळे दलालांमुळे बेदाण्यास योग्य भाव मिळत नाही. बेदाणा उत्पादनाचा खर्च व आजचा बेदाण्याचे दर पाहता, बेदाणा उत्पादित शेतकऱ्यांना नुकसानीत हा व्यवसाय करावा लागत असल्याने, शासनस्तरावर याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आयात होणाऱ्या औषधांच्या ंिकमतीत २० ते ३० टक्क्याने वाढ झाली आहे. मजुरांच्या मजुरीतही वाढ झाली आहे. विक्री केलेल्या बेदाण्याचे पैसे दलालांकडून त्वरित हवे असल्यास, २ टक्के वटाव घेतला जातो. त्यापुढे वटाव कट न करता पैसे पाहिजे असल्यास बेदाणा खरेदीपासून दीड ते दोन महिन्यांनी शेतकऱ्यास दलालाकडून पैसे दिले जातात. दलालांकडून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या या पिळवणुकीची दखल घेऊन मार्केट कमिटीने खरेदी केलेल्या मालाचे पैसे आठ दिवसात देण्याचा ठराव केला आहे. ठराव केला असला तरी, दलालांवर वचक नसल्याने या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. एक किलो बेदाणा बनविण्यास शेतकऱ्यास २५ रूपये, एक एकरास द्राक्ष निर्मितीसाठी लागणाऱ्या औषधांसाठी ४० हजार, मजुरी ६० हजार रुपये, असा एक लाख रुपये खर्च होतो. एकरी अडीच टन बेदाणा प्रक्रियेस मजुरी, प्रक्रियेचे केमिकल्स, वाहतूक, शेड, कोल्ड स्टोअरेज भाडे हा खर्च पाहता, द्राक्षशेती न परवडणारी आहे. बेदाणा उत्पादन हेही बेभरंवशाचे होऊन बसले आहे. बेदाण्याची आवक वाढल्यास व्यापारी दरात घसरण करतात. उत्पादन घटले, तरच दर वाढवितात. अशी परिस्थिती दरवर्षी ठरलेली असते. अवकाळीमुळे चांगल्या दर्जाच्या बेदाण्याचे प्रमाण घटल्याने सध्या चांगल्या मालाला १५० ते १७५ रुपयांपर्यंत दर आहे. अवकाळीमुळे भिजलेला बेदाणा कवडीमोल किमतीने विकावा लागणार आहे. एकूण परिस्थिती पाहता, निसर्गाचा फटका आणि दलालांची अडवणूक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारी ठरु लागली आहे. यातून बँकेच्या कर्जाचे हप्ते आणि पुढील हंगामाच्या तयारीचे नियोजन करायचे ठरविल्यास शेतकऱ्यास खासगी सावकार व बँकांचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. याची दखल घेऊन शासनाने एक तर औषधे व खतांच्या वाढत्या दरांना लगाम घातला पाहिजे. दरवाढ अटळच असेल, तर दलालांची साखळी तोडून शेतकऱ्यांच्या उत्पादित बेदाण्याला हमीभाव देण्याचे नियोजन केले पाहिजे. अन्यथा भविष्यात शेतकरी द्राक्षशेतीकडे पाठ फिरविण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना हमीभाव देणारी बाजारपेठ अथवा यंत्रणा नसल्याने निर्माण झालेल्या दलालांच्या साखळीमुळे बेदाण्यास योग्य भाव मिळत नाही. बेदाणा उत्पादनाचा खर्च व आजचा बेदाण्याचा दर पाहता, बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीत हा व्यवसाय करावा लागत आहे. शासनस्तरावर याची दखल घेण्याची गरज आहे.