शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

वाढीव घरपट्टीच्या नोटिसांचा खेळ रंगला

By admin | Updated: March 19, 2015 23:55 IST

इस्लामपूर पालिका : कर आकारणीबाबत हरकतीसाठी पैसे न भरण्याचा झळकला फलक

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील वाढीव घरपट्टीच्या नोटिसांच्या खो—खोचा खेळ रंगतच चालला आहे. बंददिवशी मुख्याधिकाऱ्यांनी नि:शुल्क अपील करण्याला मान्यता दिली. त्यानंतर पुन्हा ५0 टक्के रक्कम भरण्याची टिमकी वाजवली, तर आज, तिसऱ्या दिवशी या खेळाची इतिश्री करीत, नवीन कर आकारणीची हरकत दाखल करतेवेळी ५0 टक्के रक्कम भरण्याची सक्ती नाही, असे फलक पालिकेने शहरात झळकवले.आज येथील विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांच्या दालनात माजी नगरसेवक विक्रमभाऊ पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन पालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, मुख्याधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. त्यामुळेच अत्यंत चुकीच्या पध्दतीने नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.कलम ११९ प्रमाणे केवळ संकलित कराच्या नोटिसा देणे बंधनकारक असताना, त्यामध्ये सर्व करांचा समावेश करुन मालमत्ताधारकांवर आर्थिक भुर्दंड लादण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या १९९ च्या नोटिसीवर केवळ अर्जाद्वारे कोणतीही रक्कम न भरता नियमानुसार हरकत घेता येते. मात्र प्रशासनाचा प्रयत्न पहिल्या अपिलाची सुनावणी होण्यापूर्वीच दुसऱ्या अपिलाचे आमंत्रण देत पैसे गोळा करण्याचा आहे, ही बाब बेकायदेशीर आहे.पाटील म्हणाले, पहिल्या अपिलाची सुनावणी झाल्यानंतर त्याची यादी प्रसिध्द होईल. त्यानंतर पाचसदस्यीय समितीसमोरील दुसऱ्या अपिलाची नोटीस स्वतंत्रपणे प्रसिध्द करून नागरिकांना कळविले जाते. त्यावेळी सभागृहात निर्णय होईल त्याप्रमाणे ३0 अथवा ५0 टक्के रक्कम भरुन अपील स्वीकारण्याचे ठरवले जाईल.त्यामुळे प्रशासनाने आताच ही घाई करून नागरिकांना लुबाडू नये. गेल्या २९ वर्षांपासून पालिकेचा कारभार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या या सर्व गोष्टी माहीत आहेत. मात्र तरीही गेल्या ४—५ वर्षांपासून बेकायदेशीरपणे ५0 टक्के अपिलाची रक्कम भरुन घेतली जात आहे. हे जनतेची दिशाभूल करण्याचे काम तातडीने थांबवावे.ही पत्रकार परिषद सुरु असतानाच नागरिकांना नवीन कर आकारणीवर कोणतीही रक्कम न भरता अपील करता येईल. ५0 टक्के रक्कम भरण्याची सक्ती नाही, असे आवाहन करणारे फलक शहरात लावले जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या घरपट्टीच्या नोटिसांवरुन रंगलेला खेळ शेवटी पैसे न भरता अपील करण्याच्या मुद्यावर येऊन संपला. (वार्ताहर)मुख्याधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखालीविक्रमभाऊ पाटील म्हणाले की, पहिल्या अपिलाची सुनावणी झाल्यानंतर त्याची यादी प्रसिध्द होईल. त्यानंतर ५ सदस्यीय समितीसमोरील दुसऱ्या अपिलाची नोटीस स्वतंत्रपणे प्रसिध्द करून नागरिकांना कळविले जाते. त्यावेळी सभागृहात निर्णय होईल त्याप्रमाणे ३0 अथवा ५0 टक्के रक्कम भरुन अपील स्वीकारण्याचे ठरवले जाईल. पालिकेचे मुख्याधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. त्यामुळेच अत्यंत चुकीच्या पध्दतीने नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.