शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

वाढीव घरपट्टीच्या नोटिसांचा खेळ रंगला

By admin | Updated: March 19, 2015 23:55 IST

इस्लामपूर पालिका : कर आकारणीबाबत हरकतीसाठी पैसे न भरण्याचा झळकला फलक

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील वाढीव घरपट्टीच्या नोटिसांच्या खो—खोचा खेळ रंगतच चालला आहे. बंददिवशी मुख्याधिकाऱ्यांनी नि:शुल्क अपील करण्याला मान्यता दिली. त्यानंतर पुन्हा ५0 टक्के रक्कम भरण्याची टिमकी वाजवली, तर आज, तिसऱ्या दिवशी या खेळाची इतिश्री करीत, नवीन कर आकारणीची हरकत दाखल करतेवेळी ५0 टक्के रक्कम भरण्याची सक्ती नाही, असे फलक पालिकेने शहरात झळकवले.आज येथील विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांच्या दालनात माजी नगरसेवक विक्रमभाऊ पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन पालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, मुख्याधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. त्यामुळेच अत्यंत चुकीच्या पध्दतीने नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.कलम ११९ प्रमाणे केवळ संकलित कराच्या नोटिसा देणे बंधनकारक असताना, त्यामध्ये सर्व करांचा समावेश करुन मालमत्ताधारकांवर आर्थिक भुर्दंड लादण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या १९९ च्या नोटिसीवर केवळ अर्जाद्वारे कोणतीही रक्कम न भरता नियमानुसार हरकत घेता येते. मात्र प्रशासनाचा प्रयत्न पहिल्या अपिलाची सुनावणी होण्यापूर्वीच दुसऱ्या अपिलाचे आमंत्रण देत पैसे गोळा करण्याचा आहे, ही बाब बेकायदेशीर आहे.पाटील म्हणाले, पहिल्या अपिलाची सुनावणी झाल्यानंतर त्याची यादी प्रसिध्द होईल. त्यानंतर पाचसदस्यीय समितीसमोरील दुसऱ्या अपिलाची नोटीस स्वतंत्रपणे प्रसिध्द करून नागरिकांना कळविले जाते. त्यावेळी सभागृहात निर्णय होईल त्याप्रमाणे ३0 अथवा ५0 टक्के रक्कम भरुन अपील स्वीकारण्याचे ठरवले जाईल.त्यामुळे प्रशासनाने आताच ही घाई करून नागरिकांना लुबाडू नये. गेल्या २९ वर्षांपासून पालिकेचा कारभार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या या सर्व गोष्टी माहीत आहेत. मात्र तरीही गेल्या ४—५ वर्षांपासून बेकायदेशीरपणे ५0 टक्के अपिलाची रक्कम भरुन घेतली जात आहे. हे जनतेची दिशाभूल करण्याचे काम तातडीने थांबवावे.ही पत्रकार परिषद सुरु असतानाच नागरिकांना नवीन कर आकारणीवर कोणतीही रक्कम न भरता अपील करता येईल. ५0 टक्के रक्कम भरण्याची सक्ती नाही, असे आवाहन करणारे फलक शहरात लावले जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या घरपट्टीच्या नोटिसांवरुन रंगलेला खेळ शेवटी पैसे न भरता अपील करण्याच्या मुद्यावर येऊन संपला. (वार्ताहर)मुख्याधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखालीविक्रमभाऊ पाटील म्हणाले की, पहिल्या अपिलाची सुनावणी झाल्यानंतर त्याची यादी प्रसिध्द होईल. त्यानंतर ५ सदस्यीय समितीसमोरील दुसऱ्या अपिलाची नोटीस स्वतंत्रपणे प्रसिध्द करून नागरिकांना कळविले जाते. त्यावेळी सभागृहात निर्णय होईल त्याप्रमाणे ३0 अथवा ५0 टक्के रक्कम भरुन अपील स्वीकारण्याचे ठरवले जाईल. पालिकेचे मुख्याधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. त्यामुळेच अत्यंत चुकीच्या पध्दतीने नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.