शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

‘म्हैसाळ’चा विसर्ग वाढवा, अन्यथा सांगोलेचे पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:59 IST

जत : जत तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्या प्रमाणात मागणी आहे, त्या प्रमाणात म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून पाणी येत नाही. येथील शेतकºयांची ...

जत : जत तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्या प्रमाणात मागणी आहे, त्या प्रमाणात म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून पाणी येत नाही. येथील शेतकºयांची मागणी पूर्ण झाल्यानंतर सांगोला तालुक्यात पाणी सोडण्यात यावे किंवा पाण्याचा विसर्ग वाढवून त्यांना पाणी सोडावे. अन्यथा आम्ही पाणी सोडू देणार नाही, असा इशारा आमदार विलासराव जगताप यांनी दिला आहे.जत तालुक्यात सुरू असलेल्या म्हैसाळ योजना कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली जत येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता विजय पाटील व सर्व शाखा अभियंता उपस्थित होते.जगताप पुढे म्हणाले, म्हैसाळ योजनेचे सात विद्युतपंप सुरू आहेत. त्यामुळे ७५० क्युसेक पाणी कालव्यातून येणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात १५० क्युसेक पाणी जत तालुक्यात येत आहे. त्यातील ७५ क्युसेक पाणी सांगोला तालुक्यात सोडण्याचा घाट अधिकाºयांनी घातला आहे. परंतु आम्ही जत तालुक्यातून पाणी पुढे सोडणार नाही. जत तालुक्यातील म्हैसाळ कालव्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता ५५० क्युसेक इतकी आहे. परंतु २५० क्युसेक पाणी सोडले जात असले तरी प्रत्यक्षात १५० क्युसेक पाणी येथे येत आहे. जत तालुक्यात अत्यल्प प्रमाणात फक्त आठ इंच इतका कमी पाऊस झाला आहे. येथील शेतकºयांनी पाण्यासाठी पैसे भरले आहेत. परंतु पाणी सोडले जात नाही. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील काही शेतकरी पैसे भरत नाहीत, परंतु त्यांना पाणी मिळत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.तालुक्यात आलेले पाणी व भरलेले पैसे याचा ताळमेळ लागत नाही. पैसे जादा भरले आहेत आणि पाणी कमी आले आहे. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील कालव्यामधून कर्नाटक राज्यात पाणी गेले आहे. याला सर्वस्वी संबंधित शाखा अभियंता जबाबदार आहे. या अभियंत्यावर कारवाई करून त्याच्याकडून कर्नाटकात गेलेल्या पाण्याचे पैसे वसूल करावेत, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली.जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, जत पं. स. सभापती सुशिला तांवशी, प्रभाकर जाधव, सरदार पाटील, आप्पासाहेब नामद, शिवाप्पा तांवशी, माजी सभापती मंगल जमदाडे, श्रीदेवी जावीर आदी उपस्थित होते.कार्यकारी अभियंता नलवडेंची बदली करापाणी सोडण्याचे व त्याचे नियोजन करण्याचे अधिकार एकाच अधिकाºयांना द्यावेत. कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे हे मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील आहेत. त्यामुळे तेथे पैसे न भरताही पाणी मिळत आहे. त्यांची तेथून अन्यत्र बदली करावी, अशी मागणी या बैठकीत आमदार विलासराव जगताप यांनी केली.