शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

‘म्हैसाळ’चा विसर्ग वाढवा, अन्यथा सांगोलेचे पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:59 IST

जत : जत तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्या प्रमाणात मागणी आहे, त्या प्रमाणात म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून पाणी येत नाही. येथील शेतकºयांची ...

जत : जत तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्या प्रमाणात मागणी आहे, त्या प्रमाणात म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून पाणी येत नाही. येथील शेतकºयांची मागणी पूर्ण झाल्यानंतर सांगोला तालुक्यात पाणी सोडण्यात यावे किंवा पाण्याचा विसर्ग वाढवून त्यांना पाणी सोडावे. अन्यथा आम्ही पाणी सोडू देणार नाही, असा इशारा आमदार विलासराव जगताप यांनी दिला आहे.जत तालुक्यात सुरू असलेल्या म्हैसाळ योजना कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली जत येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता विजय पाटील व सर्व शाखा अभियंता उपस्थित होते.जगताप पुढे म्हणाले, म्हैसाळ योजनेचे सात विद्युतपंप सुरू आहेत. त्यामुळे ७५० क्युसेक पाणी कालव्यातून येणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात १५० क्युसेक पाणी जत तालुक्यात येत आहे. त्यातील ७५ क्युसेक पाणी सांगोला तालुक्यात सोडण्याचा घाट अधिकाºयांनी घातला आहे. परंतु आम्ही जत तालुक्यातून पाणी पुढे सोडणार नाही. जत तालुक्यातील म्हैसाळ कालव्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता ५५० क्युसेक इतकी आहे. परंतु २५० क्युसेक पाणी सोडले जात असले तरी प्रत्यक्षात १५० क्युसेक पाणी येथे येत आहे. जत तालुक्यात अत्यल्प प्रमाणात फक्त आठ इंच इतका कमी पाऊस झाला आहे. येथील शेतकºयांनी पाण्यासाठी पैसे भरले आहेत. परंतु पाणी सोडले जात नाही. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील काही शेतकरी पैसे भरत नाहीत, परंतु त्यांना पाणी मिळत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.तालुक्यात आलेले पाणी व भरलेले पैसे याचा ताळमेळ लागत नाही. पैसे जादा भरले आहेत आणि पाणी कमी आले आहे. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील कालव्यामधून कर्नाटक राज्यात पाणी गेले आहे. याला सर्वस्वी संबंधित शाखा अभियंता जबाबदार आहे. या अभियंत्यावर कारवाई करून त्याच्याकडून कर्नाटकात गेलेल्या पाण्याचे पैसे वसूल करावेत, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली.जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, जत पं. स. सभापती सुशिला तांवशी, प्रभाकर जाधव, सरदार पाटील, आप्पासाहेब नामद, शिवाप्पा तांवशी, माजी सभापती मंगल जमदाडे, श्रीदेवी जावीर आदी उपस्थित होते.कार्यकारी अभियंता नलवडेंची बदली करापाणी सोडण्याचे व त्याचे नियोजन करण्याचे अधिकार एकाच अधिकाºयांना द्यावेत. कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे हे मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील आहेत. त्यामुळे तेथे पैसे न भरताही पाणी मिळत आहे. त्यांची तेथून अन्यत्र बदली करावी, अशी मागणी या बैठकीत आमदार विलासराव जगताप यांनी केली.