शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

अवकाळी अनुदान अडकले बँकेत

By admin | Updated: October 16, 2015 00:52 IST

शेतकऱ्यांची नाराजी : आठ कोटींचे अनुदान; साडेचार हजार लाभार्थी

तासगाव : फेब्रुवारी, मार्च महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून तालुक्यातील १३ हजार ४१३ शेतकऱ्यांना आठ कोटी २५ लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तहसील कार्यालयाकडून पंधरा दिवसांपूर्वी संबंधित बँकांकडे हे अनुदान वर्ग करूनदेखील अद्यापही अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी असून, तात्काळ अनुदान देण्याची मागणी होत आहे.फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस, तसेच गारपीट झाली होती. या पावसाने रब्बी, हंगामी बागायती, तसेच द्राक्षासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत होती. त्याची दखल घेत शासकीय यंत्रणेमार्फत तातडीने अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाकडून झाला. त्यानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार, हंगामी बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी पंधरा हजार, तर फळबागांसाठी हेक्टरी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले होते.शासनाच्या निर्णयानुसार तालुक्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या १३ हजार ४१३ शेतकऱ्यांना पिकानुसार आठ कोटी २५ लाख ४५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली होती. महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्यात २५ आॅगस्टला ४ हजार ५०९ शेतकऱ्यांचे २ कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान बँकांकडे वर्ग करण्यात आले होते. तसेच दुसऱ्या टप्प्यात ३० सप्टेंबरला ८ हजार ९४४ शेतकऱ्यांचे ५ कोटी ७३ लाख रुपयांचे अनुदान संबंधित बँकांत वर्ग करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा बँकेने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)जिल्ह्यात अवकाळीचे सर्वाधिक अनुदान तासगाव तालुक्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान दोन टप्प्यात बँंकांकडे वर्ग करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान दहा दिवसांपूर्वी संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आले आहे. हे अनुदान तातडीने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. - सुधाकर भोसले, तहसीलदार महसूल विभागाकडून जिल्हा बँकेकडे अनुदान वर्ग करून अनेक दिवस झाले आहेत. तरीही अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. रब्बी हंगाम, द्राक्षबागांच्या पीक छाटणीचा हंगाम सुरू आहे. अनुदान वेळेत मिळाल्यास अडचणीतील शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. अनुदान वर्ग झाले नाही, तर आंदोलन करणार आहे. - हरिष खराडे, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना