शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पासपोर्टची प्रक्रिया सुकर करणार, सांगलीत सेवा केंद्राचे उद्घाटन : ज्ञानेश्वर मुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:23 IST

सांगली : सध्या असलेल्या पॅनकार्ड आणि आधारकार्ड इतकीच पासपोर्ट चीही प्रक्रिया सुकर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी येथे केले.येथील प्रधान पोस्ट कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कॉँग्रेसचे नेते पतंगराव कदम ...

ठळक मुद्दे सांगलीत पोस्ट कार्यालयात सेवा केंद्राचे उद्घाटन

सांगली : सध्या असलेल्या पॅनकार्ड आणि आधारकार्ड इतकीच पासपोर्टचीही प्रक्रिया सुकर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी येथे केले.

येथील प्रधान पोस्ट कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कॉँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे त्यांना आदरांजली अर्पण करून अत्यंत साध्या पद्धतीने केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मुळे म्हणाले की, विदेशी सेवेत रुजू झाल्यापासूनच आपल्या भागातील लोकांची सेवा करण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न आता पूर्ण झाले असून, कोल्हापूरनंतर सांगलीतही पासपोर्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशातील १६५ वे केंद्र सांगलीत सुरू झाले आहे. पासपोर्टसाठी पूर्वीप्रमाणे कीचकट कागदपत्रे रद्द करण्यात आली असून, आता कमीत कमी व नागरिकांना सहज उपलब्ध होतील अशा कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढता येणार आहे. पासपोर्टच्या प्रक्रियेत पोलीस तपासणीची पद्धत थोडी त्रासदायक ठरत असली, तरी पोलीस प्रशासनाशी संवाद साधत ती अधिक सोयीची करण्यावर भर देणार आहे. यावेळी नीता केळकर, जयंत वैशंपायन, एन. विनोदकुमार, विनोद कुटे, शशिकांत नरके, जतिन पोटे उपस्थित होते.सांगलीचे ऋणानुबंध दृढमुळे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात माझे गाव असले तरी जन्म सांगली जिल्ह्यातील आरग येथे झाला आहे. तसेच महाविद्यालयीन जीवनात मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालय, बायसिंगर ग्रंथालय, विलिंग्डन कॉलेज येथे भाषण स्पर्धा गाजविल्या आहेत. लिखाणासाठी म. द. हातकणंगलेकर यांनी मार्गदर्शन केले असल्याने सांगलीशी विशेष ऋणानुबंध आहेत. ते बंध या केंद्रामुळे अधिक दृढ झाले आहेत. 

पतंगरावांना आदरांजलीकार्यक्रम नियोजित असल्याने सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे त्यांना आदरांजली अर्पण करून साध्या पध्दतीने कार्यक्रम झाला. खा. संजयकाका पाटील व आम. सुधीर गाडगीळ यांनीही कदम यांना श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमात सहभाग घेतला नाही.सांगलीत शनिवारी पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर मुळे, शशिकांत नरके, जतीन पोटे, जयंत वैशंपायन, एन. विनोदकुमार, ए. के. नाईक उपस्थित होते.