शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
2
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
3
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
4
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
6
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
7
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
8
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
9
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
10
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
11
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
12
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
13
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
14
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
15
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
16
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
17
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
18
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
19
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
20
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गावगाड्याकडून नागरिकीकरणाकडे: गावाचा अनियंत्रित विस्तार, गायरानात अतिक्रमणे फार 

By संतोष भिसे | Updated: December 14, 2024 18:07 IST

ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत होण्याची गरज

संतोष भिसेसांगली : गेल्या काही वर्षांत मोठ्या गावांचे नागरिकीकरण वेगाने होत आहे. जिल्ह्यातील सर्वच मोठी गावे वेगाने विकसित होत आहेत. या तुलनेत तेथे नागरी सुविधा देण्यात ग्रामपंचायती सक्षम नसल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षांत लोकसंख्या पाच-सात पटींनी वाढली तरी गावठाण मात्र वाढले नाही. परिणामी लोकांनी अतिक्रमणे करत गायरानात अतिक्रमणे व मनमानी वस्त्या केल्या आहेत.गावकुसाबाहेर वसाहती वाढल्या, शेकडो घरे वाढली; पण तेथे रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आदी सुविधा देण्यात ग्रामपंचायतींची ताकद अपुरी पडत आहे. विशेषत: शहरांलगतच्या गावांत ही समस्या गंभीर आहे. शहर जवळ असल्याने ही गावे वेगाने वाढली. शहराबाहेर शांत वातावरणात राहू इच्छिणाऱ्यांनी या गावांत जागा घेऊन बंगले उभारले. शहरातील धनिकांनी गुंतवणूक म्हणून शेजारच्या या गावांत जमिनी खरेदी करून ठेवल्या. पण या ग्रामपंचायतींना ‘नगरविकास कशाशी खातात?’ हेच माहिती नाही.अजगरासारख्या वाढणाऱ्या वसाहतींना नियंत्रित करण्याचा अजेंडा ग्रामविकास किंवा नगरविकास विभागाकडे नाही. विस्तारित वसाहतीतील रहिवासी सुविधांसाठी ग्रामपंचायतींशी वर्षानुवर्षे माथेफोड करीत आहेत. रस्ते, सांडपाणी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था आदी प्राथमिक सुविधांसाठी त्यांचा दररोजच संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत होण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे २०० ग्रामपंचायतींची लोकसंख्या १५ हजार ते २० हजारांदरम्यान आहे. त्या नगर पंचायत होण्यास पात्र आहेत. काही वर्षांपूर्वी कवठेमहांकाळ, कडेगाव, आटपाडी आदी तालुका शहरे असलेल्या ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती झाल्या. पण, त्यांच्या इतकीच मोठ्या लोकसंख्येची गावे मात्र ग्रामपंचायतीच राहिली आहेत.

मालगावात सर्वात जास्त लोकसंख्या, तरीही..मिरज तालुक्यातील मालगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे ४० हजारांपर्यंत पोहोचली आहे. गावठाणासह वाड्या-वस्त्या आणि सुभाषनगरच्या काही भागाचा बोजा ग्रामपंचायतीवर आहे. एखाद्या नगरपालिकेइतका बोजा ग्रामपंचायतीवर आहे. पण, तिचे रूपांतर नगर पंचायतीत होण्याच्या दृष्टीने शासकीय स्तरावर उदासीनता आहे. यावर उपाय म्हणून गावकऱ्यांनीच विभाजनाचा निर्णय घेतला आहे. सुभाषनगरची स्वतंत्र ग्रामपंचायत करून ताण कमी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येत आहे.

वाळवा तालुक्याचे ठिकाणी, तरीही ग्रामपंचायततालुक्याचे ठिकाण असलेले वाळवा गाव व्यापारी केंद्र आहे. शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करताना लोकसंख्येतही वाढ होत आहे. पंचक्रोशीतील डझनभर गावांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ताण गावावर आहे. तरीही गावगाडा हाकण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवरच आहे. येथे नगर पंचायत करण्यात कोणालाही स्वारस्य नसावे अशी स्थिती आहे.

टॅग्स :Sangliसांगली