शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
2
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
3
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
4
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
5
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
6
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
7
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
8
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
9
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
10
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
11
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
12
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
13
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
14
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
15
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
16
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
17
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
18
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
19
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
20
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...

गावगाड्याकडून नागरिकीकरणाकडे: गावाचा अनियंत्रित विस्तार, गायरानात अतिक्रमणे फार 

By संतोष भिसे | Updated: December 14, 2024 18:07 IST

ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत होण्याची गरज

संतोष भिसेसांगली : गेल्या काही वर्षांत मोठ्या गावांचे नागरिकीकरण वेगाने होत आहे. जिल्ह्यातील सर्वच मोठी गावे वेगाने विकसित होत आहेत. या तुलनेत तेथे नागरी सुविधा देण्यात ग्रामपंचायती सक्षम नसल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षांत लोकसंख्या पाच-सात पटींनी वाढली तरी गावठाण मात्र वाढले नाही. परिणामी लोकांनी अतिक्रमणे करत गायरानात अतिक्रमणे व मनमानी वस्त्या केल्या आहेत.गावकुसाबाहेर वसाहती वाढल्या, शेकडो घरे वाढली; पण तेथे रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आदी सुविधा देण्यात ग्रामपंचायतींची ताकद अपुरी पडत आहे. विशेषत: शहरांलगतच्या गावांत ही समस्या गंभीर आहे. शहर जवळ असल्याने ही गावे वेगाने वाढली. शहराबाहेर शांत वातावरणात राहू इच्छिणाऱ्यांनी या गावांत जागा घेऊन बंगले उभारले. शहरातील धनिकांनी गुंतवणूक म्हणून शेजारच्या या गावांत जमिनी खरेदी करून ठेवल्या. पण या ग्रामपंचायतींना ‘नगरविकास कशाशी खातात?’ हेच माहिती नाही.अजगरासारख्या वाढणाऱ्या वसाहतींना नियंत्रित करण्याचा अजेंडा ग्रामविकास किंवा नगरविकास विभागाकडे नाही. विस्तारित वसाहतीतील रहिवासी सुविधांसाठी ग्रामपंचायतींशी वर्षानुवर्षे माथेफोड करीत आहेत. रस्ते, सांडपाणी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था आदी प्राथमिक सुविधांसाठी त्यांचा दररोजच संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत होण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे २०० ग्रामपंचायतींची लोकसंख्या १५ हजार ते २० हजारांदरम्यान आहे. त्या नगर पंचायत होण्यास पात्र आहेत. काही वर्षांपूर्वी कवठेमहांकाळ, कडेगाव, आटपाडी आदी तालुका शहरे असलेल्या ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती झाल्या. पण, त्यांच्या इतकीच मोठ्या लोकसंख्येची गावे मात्र ग्रामपंचायतीच राहिली आहेत.

मालगावात सर्वात जास्त लोकसंख्या, तरीही..मिरज तालुक्यातील मालगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे ४० हजारांपर्यंत पोहोचली आहे. गावठाणासह वाड्या-वस्त्या आणि सुभाषनगरच्या काही भागाचा बोजा ग्रामपंचायतीवर आहे. एखाद्या नगरपालिकेइतका बोजा ग्रामपंचायतीवर आहे. पण, तिचे रूपांतर नगर पंचायतीत होण्याच्या दृष्टीने शासकीय स्तरावर उदासीनता आहे. यावर उपाय म्हणून गावकऱ्यांनीच विभाजनाचा निर्णय घेतला आहे. सुभाषनगरची स्वतंत्र ग्रामपंचायत करून ताण कमी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येत आहे.

वाळवा तालुक्याचे ठिकाणी, तरीही ग्रामपंचायततालुक्याचे ठिकाण असलेले वाळवा गाव व्यापारी केंद्र आहे. शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करताना लोकसंख्येतही वाढ होत आहे. पंचक्रोशीतील डझनभर गावांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ताण गावावर आहे. तरीही गावगाडा हाकण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवरच आहे. येथे नगर पंचायत करण्यात कोणालाही स्वारस्य नसावे अशी स्थिती आहे.

टॅग्स :Sangliसांगली