शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सांगली लोकसभेत पुन्हा तिंरगी लढत! महाआघाडी, युतीत वाढले दावेदार; संजय पाटील, विशाल पाटील व चंद्रहार पाटील शर्यतीत

By हणमंत पाटील | Updated: August 25, 2023 17:54 IST

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र बदलत आहे.

सांगली : राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र बदलत आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे आगामी निवडणूकही तिरंगी करण्याची खेळी भाजपकडून पुन्हा खेळली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत फूट पडल्याने महाविकास आघाडी व युतीत लोकसभा उमेदवारीवरील दावेदार वाढले आहेत. तरीही सद्य:स्थितीत खासदार संजय पाटील, काँग्रेसचे विशाल पाटील व पैलवान चंद्रहार पाटील या तिघांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. सांगली लोकसभेची पुनर्रचना २००९ मध्ये झाली. तोपर्यंत सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, २०१४ नंतर केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

भाजपच्या उमेदवारीवरून दोन गट ...काँग्रेस आघाडीचे संजय पाटील यांना भाजपने ऐनवेळी उमेदवारी देऊन २०१४ च्या मोदी यांच्या लाटेत त्यांना निवडून आणले. त्यानंतर २०१९ ची लोकसभा वंचित बहुजन विकास आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांनी लढविली. त्यामुळे भाजपला हा विजय सोपा झाला. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार पाटील यांना उमेदवारी देण्यावरून जिल्ह्यातील भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी देण्यासाठी नाराज गट सक्रिय झाला आहे. शिवाय युतीमध्ये सामील झालेला शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गटही उमेदवारीवर दावा करणार आहे.

काँग्रेसच्या जागेवर शिवसेना, राष्ट्रवादीचा दावा...महाविकास आघाडीत सांगली मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. त्यामुळे सध्यातरी विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर काँग्रेसमध्ये दुमत नाही. त्यामुळे पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू केल्याचे दिसून येते. परंतु, २०१४ व २०१९ या सलग दोन लोकसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेच्या ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दावा केला जातोय.

वंचितची जागा बीआरएस घेणार का?आघाडी व युतीमध्ये राजकीय पक्षांची व इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या दोन्हीमधील नाराज गटातील उमेदवाराच्या गळ्यात लोकसभेची माळ घालण्याच्या तयारीत भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आहे. त्यासाठी बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनीही सांगलीतील मेळाव्याला उपस्थित राहून चाचपणी केली. सांगली हा शेतकरी संघटनांचा पट्टा असल्याने येथे शेतकरी कार्ड वापरण्याची खेळी बीआरएस करणार आहे. त्यामुळे गत पंचवार्षिक निवडणुकीत वंचितने घेतलेल्या मतांची जागा बीआरएस घेणार का ? याविषयी उत्सुकता आहे. 

टॅग्स :SangliसांगलीSangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकlok sabhaलोकसभा