शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

सांगली जिल्ह्यातील अपघातसंख्येत तब्बल १३ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 7:39 PM

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब रस्ते, वेगावर नसलेले नियंत्रण आणि बेशिस्तपणा अशा ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब रस्ते, वेगावर नसलेले नियंत्रण आणि बेशिस्तपणा अशा अनेक गोष्टींमुळे जिल्ह्यातील अपघातांची संख्या वाढत आहे. २0१७ च्या तुलनेत २0१८ मध्ये सांगली जिल्ह्यात १३ टक्के अपघात वाढले आहेत. राज्यातील अपघातांच्या वाढीचे प्रमाण 0.८० असताना जिल्ह्याचे हे प्रमाण चिंताजनक आहे.सांगली जिल्ह्यात एकीकडे वाहनसंख्येत वाढ होत असताना अरुंद व खराब रस्ते, रस्त्यावरील वाहनधारकांचा बेशिस्तपणा, अतिक्रमणे, वेगावर नसलेले नियंत्रण अशा कारणांनी अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरीही त्यात यश मिळताना दिसत नाही.आकडेवारी अधिकच...महाराष्टÑ मोटार वाहन विभागाने प्रसिद्ध केलेली ही आकडेवारी जानेवारी ते जून २0१८ पर्यंतची आहे. २0१७ मधील अपघात संख्येशी तिची तुलना केली आहे. अपघात संख्येतील आकडेवारीचा विचार करता कोल्हापूर राज्यात क्रमांक एकवर असून, सांगली राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. अपघातात मृत्यू होण्याच्या बाबतीत कोल्हापूर क्रमांक एकवर, तर सांगली २२ व्या क्रमांकावर आहे, तर जखमींच्या संख्येतही कोल्हापूर क्रमांक एकवर असून, सांगली ११ व्या क्रमांकावर आहे.राज्यात २0१७ च्या तुलनेत २0१८ मध्ये एकूण अपघातसंख्येत 0.८० टक्के वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात ही वाढ १३ टक्क्यांच्या घरात आहे. राज्यात अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत ९.२७ टक्के वाढ झाली असताना जिल्ह्यात ही वाढ ८.६३ टक्के म्हणजे कमी दिसते. दुसरीकडे जखमींच्या आकडेवारीत राज्यात १.६७ टक्के वाढ असताना जिल्ह्यात ही वाढ १0.४0 टक्के दिसते. त्यामुळे अपघातसंख्या कमी होण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे बनले आहेवाहनसंख्येत होतेय झपाट्याने वाढदिवसागणिक वाहनसंख्या वाढत आहे. ३0 एप्रिल २0१९ च्या आकडेवारीनुसार एकूण वाहनसंख्या ९ लाख १५ हजार ६८७ इतकी आहे. ३१ मार्च २०१८ मध्ये ही संख्या ८ लाख ५० हजार ७४८ इतकी होती. म्हणजेच जवळपास एक वर्षात वाहनसंख्येत ६४ हजार ९३९ ची भर पडली. म्हणजेच जिल्ह्यात महिन्याकाठी जवळपास साडेपाच हजार वाहने रस्त्यावर येत आहेत. .