शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

इलियास नायकवडी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:25 IST

मिरज : राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी (वय ८३) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. नायकवडी यांच्यावर गेले दोन ...

मिरज : राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी (वय ८३) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. नायकवडी यांच्यावर गेले दोन महिने रुग्णालयात उपचार सुरू होते.आष्टा (ता. वाळवा) येथे १५ जुलै १९३६ रोजी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या इलियास नायकवडी यांना पाच भाऊ, दोन बहिणी आहेत. वडिलांचा शेती हाच व्यवसाय होता. प्रतिकूल परिस्थितीत आष्टा येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर कामेरी (ता. वाळवा) येथे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून व पुढे सांगली जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात आटपाडी, कवठेमहांकाळ पंचायत समितीत उर्दू भाग शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. जिल्हा परिषदेत नोकरी करीत असताना राजकारणाकडे अधिक कल असल्याने राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन वाळव्याचे आमदार विश्वास पाटील यांच्या माध्यमातून राजारामबापू पाटील यांचे ते जवळचे व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाऊ लागले.प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत असताना पुरोगामी शिक्षक समिती ही शिक्षक संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची स्थापना केली. धडाडीचा कार्यकर्ता, बुद्धिचातुर्य व वक्तृत्व कलेमुळे, राजारामबापूंचे विश्वासू म्हणून त्यांनी राजकारणात स्थान मिळविले. त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जनता पार्टीचे उमेदवार म्हणून मिरज विधानसभेची निवडणूक काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव शिंदे यांच्याविरोधात लढविली. त्या काळात वसंतदादा हे काँग्रेसचे सर्वेसर्वा असताना, दिग्गज प्रस्थापितांविरोधात नवखे उमेदवार असतानाही त्यांनी जोरदार संघर्ष केला. निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, मात्र त्या काळात त्यांच्या जबरदस्त भाषणशैलीचा जनमानसावर प्रभाव पडला. माजी आमदार विठ्ठलअण्णा पाटील त्यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध होते. मिरजेत त्यांनी जनता सहकारी कुक्कुटपालन संस्थेची स्थापना केली.राजारामबापू पाटील यांचे कार्यकर्ते असल्याने मिरज परिसरात माजी आमदार संभाजी पवार, माजी आमदार व्यंकाप्पा पत्की, माजी आमदार शरद पाटील, नानासाहेब सगरे, अण्णासाहेब डांगे, अजितराव घोरपडे, बापूसाहेब पुजारी असे अनेक सहकारी त्यांना मिळाले. मिरजेतील आझाद शिक्षण संस्थेचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, अरबी उर्दू मराठी शाळा या शैक्षणिक संस्था जनाब यांनी चालविल्या. आपल्या बुद्धिचातुर्याने अनेक दिग्गजांना नामोहरम करत राजकारणात त्यांनी वेगळा ठसा उमटवला. तत्कालीन नगरपालिका व महापालिकेत त्यांनी सातत्याने प्रस्थापितांना हादरे दिले. मिरज नगरपालिकेत सून वहिदा नायकवडी व पुत्र इद्रिस नायकवडी यांना नगराध्यक्ष व महापालिकेत त्यांच्या कुटुंबातील एकाचवेळी तीन-तीन नगरसेवक निवडून आणण्याची किमया त्यांनी केली. पुढे पुत्र इद्रिस नायकवडी यांना महापौर पदावर विराजमान करण्याचा यशस्वी प्रयोगही त्यांनी केला.जीवनातील अनेक संघर्षांना तोंड देत राजकारणात आपले स्थान कायम करणाऱ्या इलियास नायकवडी यांचा प्रवाहाविरुद्ध जाण्याचा स्थायीभाव होता. राजारामबापूंनी त्यांची औरंगाबाद विभागीय निवड मंडळावर सदस्य म्हणून निवड केली होती. मिरज नगरपरिषद प्राथमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. जयंत पाटील, विलासराव शिंदे, आर. आर. पाटील, हसन मुश्रीफ यांच्याबरोबर राजकीय प्रवास केला. एखाद्या विषयाच्या समर्थनार्थ व विरोधात दोन्ही बाजू मांडण्याची त्यांची क्षमता प्रचंड होती. उदाहरण व कथा सांगून एखादी गोष्ट पटवून देण्याची त्यांची शैली होती. इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक असलेले इलियास नायकवडी पंचतंत्र, इसापनीती, बोधकथा यांचा भाषणात समर्पक उपयोग करून उद्बोधन करीत असत. मेंदूच्या आजारामुळे गेले दोन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी त्यांचे निधन झाले.