शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

इलियास नायकवडी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:25 IST

मिरज : राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी (वय ८३) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. नायकवडी यांच्यावर गेले दोन ...

मिरज : राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी (वय ८३) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. नायकवडी यांच्यावर गेले दोन महिने रुग्णालयात उपचार सुरू होते.आष्टा (ता. वाळवा) येथे १५ जुलै १९३६ रोजी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या इलियास नायकवडी यांना पाच भाऊ, दोन बहिणी आहेत. वडिलांचा शेती हाच व्यवसाय होता. प्रतिकूल परिस्थितीत आष्टा येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर कामेरी (ता. वाळवा) येथे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून व पुढे सांगली जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात आटपाडी, कवठेमहांकाळ पंचायत समितीत उर्दू भाग शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. जिल्हा परिषदेत नोकरी करीत असताना राजकारणाकडे अधिक कल असल्याने राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन वाळव्याचे आमदार विश्वास पाटील यांच्या माध्यमातून राजारामबापू पाटील यांचे ते जवळचे व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाऊ लागले.प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत असताना पुरोगामी शिक्षक समिती ही शिक्षक संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची स्थापना केली. धडाडीचा कार्यकर्ता, बुद्धिचातुर्य व वक्तृत्व कलेमुळे, राजारामबापूंचे विश्वासू म्हणून त्यांनी राजकारणात स्थान मिळविले. त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जनता पार्टीचे उमेदवार म्हणून मिरज विधानसभेची निवडणूक काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव शिंदे यांच्याविरोधात लढविली. त्या काळात वसंतदादा हे काँग्रेसचे सर्वेसर्वा असताना, दिग्गज प्रस्थापितांविरोधात नवखे उमेदवार असतानाही त्यांनी जोरदार संघर्ष केला. निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, मात्र त्या काळात त्यांच्या जबरदस्त भाषणशैलीचा जनमानसावर प्रभाव पडला. माजी आमदार विठ्ठलअण्णा पाटील त्यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध होते. मिरजेत त्यांनी जनता सहकारी कुक्कुटपालन संस्थेची स्थापना केली.राजारामबापू पाटील यांचे कार्यकर्ते असल्याने मिरज परिसरात माजी आमदार संभाजी पवार, माजी आमदार व्यंकाप्पा पत्की, माजी आमदार शरद पाटील, नानासाहेब सगरे, अण्णासाहेब डांगे, अजितराव घोरपडे, बापूसाहेब पुजारी असे अनेक सहकारी त्यांना मिळाले. मिरजेतील आझाद शिक्षण संस्थेचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, अरबी उर्दू मराठी शाळा या शैक्षणिक संस्था जनाब यांनी चालविल्या. आपल्या बुद्धिचातुर्याने अनेक दिग्गजांना नामोहरम करत राजकारणात त्यांनी वेगळा ठसा उमटवला. तत्कालीन नगरपालिका व महापालिकेत त्यांनी सातत्याने प्रस्थापितांना हादरे दिले. मिरज नगरपालिकेत सून वहिदा नायकवडी व पुत्र इद्रिस नायकवडी यांना नगराध्यक्ष व महापालिकेत त्यांच्या कुटुंबातील एकाचवेळी तीन-तीन नगरसेवक निवडून आणण्याची किमया त्यांनी केली. पुढे पुत्र इद्रिस नायकवडी यांना महापौर पदावर विराजमान करण्याचा यशस्वी प्रयोगही त्यांनी केला.जीवनातील अनेक संघर्षांना तोंड देत राजकारणात आपले स्थान कायम करणाऱ्या इलियास नायकवडी यांचा प्रवाहाविरुद्ध जाण्याचा स्थायीभाव होता. राजारामबापूंनी त्यांची औरंगाबाद विभागीय निवड मंडळावर सदस्य म्हणून निवड केली होती. मिरज नगरपरिषद प्राथमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. जयंत पाटील, विलासराव शिंदे, आर. आर. पाटील, हसन मुश्रीफ यांच्याबरोबर राजकीय प्रवास केला. एखाद्या विषयाच्या समर्थनार्थ व विरोधात दोन्ही बाजू मांडण्याची त्यांची क्षमता प्रचंड होती. उदाहरण व कथा सांगून एखादी गोष्ट पटवून देण्याची त्यांची शैली होती. इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक असलेले इलियास नायकवडी पंचतंत्र, इसापनीती, बोधकथा यांचा भाषणात समर्पक उपयोग करून उद्बोधन करीत असत. मेंदूच्या आजारामुळे गेले दोन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी त्यांचे निधन झाले.