शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांचा प्रेरणादायी इतिहास दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

सावंतपूर : इंग्रजांशी सतत चौदा वर्षे प्राणपणाने लढा देणारे व स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पर्वात हसतहसत फासावर गेलेले आद्य क्रांतिवीर राजे ...

सावंतपूर : इंग्रजांशी सतत चौदा वर्षे प्राणपणाने लढा देणारे व स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पर्वात हसतहसत फासावर गेलेले आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा इतिहास तरुणांना प्रेरणादायी असूनही तो दुर्लक्षित राहिल्याची खंत प्रगतशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष मारुती शिरतोडे यांनी व्यक्त केली.

रामानंदनगर (ता. पलूस) येथे समाजवादी प्रबोधिनी, लोकशाही वाचवा कृतिशील विचार मंच, श्री समर्थ साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ व व्ही. वाय. (आबा) पाटील समाज प्रबोधन अकॅडमी यांच्यातर्फे आयोजित आचार्य शांतारामबापू गरुड स्मृती व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना 'आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जीवन व कार्य' या विषयावर ते बोलत होते. ‘क्रांतिअग्रणी पर्व’चे संपादक व्ही. वाय. (आबा) पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रा. आदम पठाण यांनी स्वागत केले.

शिरतोडे म्हणाले. मराठेशाहीचा अस्त झाल्यानंतर स्वातंत्र्यलढा सुरू झाला. या स्वातंत्र्यलढ्याचे चार टप्पे पडतात. या चार टप्प्यांतील पहिल्या पर्वात उमाजी नाईक या रामोशी वीराने ब्रिटिशांच्या कंपनी सरकारला सळो की पळो करून सोडले. ब्रिटिश सैनिकांच्या पलटणी उमाजीला पकडण्यासाठी जिवाचे रान करीत होत्या परंतु डोंगरदऱ्यात लपून-छपून गनिमीकाव्याने इंग्रजांशी उमाजीने प्रखर बंड उभारले. उमाजी नाईकांच्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत साडेतीन लाख हुतात्मे झाले आहेत. अनेकांनी कारावास भोगला आहे. बलिदान दिले आहे. त्यांच्या प्राण त्यागावरच आपल्या देशाचे स्वातंत्र्य आज उभे आहे. तेव्हा हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, देशाच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी सजग राहिले पाहिजे.

व्याख्यानमालेस हिम्मतराव मलमे, दगडू जाधव, संदीप सदामते, सुनील दलवाई, भानुदास आंबी, उत्तम सदामते, मारुती सावंत, बाळासाहेब खेडकर, जयवंत मोहिते, संजय जाधव, महेश मदने, कृष्णत गायकवाड, संजीवनी मोहिते, म. मा. फाटक, बी. बी. खोत यांच्यासह अनेक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. प्रा. विठ्ठल सदामते यांनी आभार मानले.