शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

इस्लामपूरला लाभलेला ‘स्वच्छतादूत’ दुर्लक्षित : अभियानापुरतीच जागृती झाल्याचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:59 IST

स्वच्छ भारत अभियानात इस्लामपूर पालिकेने महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला. याचा आनंदोत्सव साजरा होऊन आठवडाही लोटला नाही, तोवरच शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत

ठळक मुद्देस्वच्छता अभियानातील विजेत्या शहरातच अस्वच्छतेचे साम्राज्य

अशोक पाटील ।इस्लामपूर : स्वच्छ भारत अभियानात इस्लामपूर पालिकेने महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला. याचा आनंदोत्सव साजरा होऊन आठवडाही लोटला नाही, तोवरच शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. दुसरीकडे कोणत्याही अपेक्षेशिवाय इस्लामपूर शहाराची स्वच्छता करणारा ‘स्वच्छतादूत’ मात्र सर्वांकडूनच दुर्लक्षित राहिला आहे.केवळ अभियानाची घोषणा झाल्यावरच स्वच्छतेबाबत जागरुकता दाखविणाºया इस्लामपूर पालिकेने स्वच्छ भारत अभियानात हिरीरीने भाग घेतला. शहरातील सर्वच घटकांनी मदत केली. यामुळे पालिकेला राज्यात आठवा क्रमांक मिळाला. परंतु अभियान संपले आणि पुन्हा शहरात कचराकुंड्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. शहरातील मारुती मंदिर व गणेश मंदिरालगत कचºयाची दुर्गंधी आहे. रविवारी संकष्टीदिवशी या दुर्गंधीतूनच भाविकांना दर्शनासाठी यावे लागत होते. स्वच्छतेचा ठेका बगलबच्चांना देण्यात आला आहे. त्यामुळेच स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.एकीकडे पालिकेच्या स्वच्छता विभागाची अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे मात्र परराज्यातून शहरात आलेला एक अनामिक मात्र दररोज सकाळी ६ ते ८ या दोन तासात कोणत्याही अपेक्षेशिवाय झरी नाका ते गांधी चौकातील सर्व रस्ते स्वच्छ करतो. तो कन्नडमध्ये बोलतो. मात्र आपले नाव तो ‘महात्मा गांधींचा वारस’ असे सांगतो.हातात खराटा आणि स्वच्छता, एवढाच त्याचा नित्यक्रम. कपडे मळकटलेले आहेत. जो शहराची स्वच्छता करण्यासाठी आघाडीवर आहे. तो सगळ्यांकडून दुर्लक्षित राहिला आहे. सामाजिक संघटनांनी त्याचे पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे.स्वच्छतागृह कुलूपबंदस्वच्छ भारत अभियानाच्या काळात इस्लामपूर पालिकेने वाळवा बझारसमोर तातडीने दोन दिवसात उभे केलेले महिलांसाठीचे स्वच्छतागृह आता कुलूपबंद आहे. याचा वापर इतर कारणांसाठीच होत असल्याचेही निदर्शनास येत आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSangliसांगली