शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

इस्लामपूरला लाभलेला ‘स्वच्छतादूत’ दुर्लक्षित : अभियानापुरतीच जागृती झाल्याचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:59 IST

स्वच्छ भारत अभियानात इस्लामपूर पालिकेने महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला. याचा आनंदोत्सव साजरा होऊन आठवडाही लोटला नाही, तोवरच शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत

ठळक मुद्देस्वच्छता अभियानातील विजेत्या शहरातच अस्वच्छतेचे साम्राज्य

अशोक पाटील ।इस्लामपूर : स्वच्छ भारत अभियानात इस्लामपूर पालिकेने महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला. याचा आनंदोत्सव साजरा होऊन आठवडाही लोटला नाही, तोवरच शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. दुसरीकडे कोणत्याही अपेक्षेशिवाय इस्लामपूर शहाराची स्वच्छता करणारा ‘स्वच्छतादूत’ मात्र सर्वांकडूनच दुर्लक्षित राहिला आहे.केवळ अभियानाची घोषणा झाल्यावरच स्वच्छतेबाबत जागरुकता दाखविणाºया इस्लामपूर पालिकेने स्वच्छ भारत अभियानात हिरीरीने भाग घेतला. शहरातील सर्वच घटकांनी मदत केली. यामुळे पालिकेला राज्यात आठवा क्रमांक मिळाला. परंतु अभियान संपले आणि पुन्हा शहरात कचराकुंड्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. शहरातील मारुती मंदिर व गणेश मंदिरालगत कचºयाची दुर्गंधी आहे. रविवारी संकष्टीदिवशी या दुर्गंधीतूनच भाविकांना दर्शनासाठी यावे लागत होते. स्वच्छतेचा ठेका बगलबच्चांना देण्यात आला आहे. त्यामुळेच स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.एकीकडे पालिकेच्या स्वच्छता विभागाची अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे मात्र परराज्यातून शहरात आलेला एक अनामिक मात्र दररोज सकाळी ६ ते ८ या दोन तासात कोणत्याही अपेक्षेशिवाय झरी नाका ते गांधी चौकातील सर्व रस्ते स्वच्छ करतो. तो कन्नडमध्ये बोलतो. मात्र आपले नाव तो ‘महात्मा गांधींचा वारस’ असे सांगतो.हातात खराटा आणि स्वच्छता, एवढाच त्याचा नित्यक्रम. कपडे मळकटलेले आहेत. जो शहराची स्वच्छता करण्यासाठी आघाडीवर आहे. तो सगळ्यांकडून दुर्लक्षित राहिला आहे. सामाजिक संघटनांनी त्याचे पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे.स्वच्छतागृह कुलूपबंदस्वच्छ भारत अभियानाच्या काळात इस्लामपूर पालिकेने वाळवा बझारसमोर तातडीने दोन दिवसात उभे केलेले महिलांसाठीचे स्वच्छतागृह आता कुलूपबंद आहे. याचा वापर इतर कारणांसाठीच होत असल्याचेही निदर्शनास येत आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSangliसांगली