शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

कुरघोड्या कराल, तर जशास तसे उत्तर

By admin | Updated: April 9, 2015 00:03 IST

संजय पाटील : म्हैसाळ योजनेबाबत काही नेत्यांकडून जनतेची दिशाभूल

सांगली : मोठ्या प्रयत्नाने म्हैसाळचे पंप सुरू झाले असून, शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. परंतु याप्रश्नी वारंवार काही नेत्यांकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे. अशा गोष्टीत कोणी कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, सकाळी म्हैसाळ टप्पा क्र. १ येथे जाऊन पाहणी केली. मागील पाच वर्षांपासून पंपांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी दारांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे. अशी परिस्थिती असली तरीही अधिकाऱ्यांनी म्हैसाळचे तीन पंप सुरू केले आहेत. ते पूर्ण क्षमतेचे चालविण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे हित साधले जाणार आहे. तरीही त्यांच्यामध्ये काहीजण येण्याची शक्यता आहे. कॅनॉल व दरवाजे फोडून पाणी चोरणे आदी प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे घडले तर, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या आड येणाऱ्या मंडळींवर नाईलाजाने कारवाई करावी लागेल. दुरुस्ती खर्चासाठी २ कोटी निधीची मागणी असून, आवर्तन संपल्यानंतर संबंधित निधी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या शनिवारी बेडग येथील पंपाची पाहणी करण्यात येणार आहे. त्यावेळी पाणी क्षेत्राचा लाभ होणाऱ्या गावातील प्रमुख नागरिकांची बैठक घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांना पाणी मागणीचे फॉर्म भरणे गरजेचे आहे. म्हैसाळप्रश्नी कोणी राजकारण करू नये. अधिकाऱ्यांनी कोणाच्याही राजकारणाला बळी पडू नये, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. रोटेशन पध्दतीनेच पाणी सोडण्यात येणार आहे. सोशल मीडियावरून काहीजण टीका-टिप्पणी करण्यात मग्न आहेत. परंतु कोणीही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करू नये. (प्रतिनिधी)पुतनामावशीचे प्रेम ओळखून...नागेवाडी येथील यशवंत कारखान्याची सुनावणी बुधवारी दिल्लीत झाली. त्यामध्ये अनिल बाबर यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तसेच हा खटला काढून टाकण्यास सांगितले आहे. यामुळे बाबर यांनी खटला मागे घेतला आहे. भविष्यकाळात या प्रश्नावरून ग्रामस्थांकडून पैसे काढण्याचा उद्योग कोणी करू नये कारण पुतनामावशीचे प्रेम लोक ओळखून असल्याचे पाटील यांनी सांगितले.म्हैसाळच्या वीजबिलाची थकबाकी ४ कोटी रुपये आहे. आणखी दोन महिने योजना कार्यान्वित करायची झाल्यास ६ कोटी विजेचा खर्च आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.