शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

वेळ पडल्यास बंदुका हातात घेऊ

By admin | Updated: October 2, 2016 01:08 IST

पाकिस्तानला धडा शिकवा : माजी सैनिकांचे सरकारला आवाहन

सांगली : उरी हल्ल्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरातील तळांवर हल्ले करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. सरकारने आता माघार न घेता पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. गरज पडल्यास भारतीय सैन्याला मदत करण्यासाठी आम्ही बंदुका हातात घेऊन लढण्यास तयार आहोत. जिल्ह्यातील १८ हजार सैनिक सीमेवर जाण्यास तयार आहेत, असे शनिवारी पत्रकार परिषदेत माजी सैनिकांनी सांगितले. यासाठी शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. माजी सुभेदार हरिभाऊ शिंदे म्हणाले की, मी सैन्यदलामध्ये २६ वर्षे नोकरी केली आहे. ज्या उरीमध्ये अतिरेक्यांनी सैन्यदलावर हल्ला केला होता, तेथे बारा वर्षे सेवा झाली आहे. पाकिस्तानकडून वारंवार नियंत्रण रेषेचे उल्लंघन होत असताना आम्हाला त्यांच्याविरुध्द लढण्याची परवानगी मिळत नव्हती. यामुळे भारतीय सैन्य चिडून होते. उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे सात लाँचपॅड उद्ध्वस्त करण्यासाठी सैन्याला आदेश दिला. यामुळे निश्चितच सैनिकांचे मनौधैर्य वाढण्यास मदत होणार आहे. सरकारच्या भूमिकेला आणि सैन्याला पाकिस्तानबरोबर लढण्यासाठी बळ मिळावे, यासाठी सांगली जिल्ह्यातील हजारो माजी सैनिक पुन्हा सीमेवर जाण्यास तयार आहेत. सुभेदार संभाजी पवार म्हणाले की, आम्हाला राजकारणात पडायचे नाही, पण सैन्याच्यादृष्टीने बऱ्याच वर्षातून प्रथमच चांगला निर्णय भारत सरकारने घेतला आहे. पाकिस्तानकडून होणारे हल्ले किती दिवस पाहात बसायचे? कधी तर त्यांना धडा शिकवण्याची गरज होतीच. ते धाडस नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहे. शिवाय आम्ही सीमेवर लढण्यास तयार आहोत. शमशुद्दीन नदाफ म्हणाले की, पाकिस्तानच्या भूमीत जाऊन तेथील दहशतवाद्यांचा खात्मा केल्यामुळे निश्चितच भारतीय सैनिकांचे मनोबल वाढणार आहे. भारतीय सैन्य सीमेवर गेलेच आहे, तर पाकिस्तानला धडा शिकवूनच परत आले पाहिजे. यासाठी आम्ही त्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार आहोत. यावेळी दिलावर आत्तार, बाळासाहेब पवार, शिवाजी पवार, महादेव कोळी, गोरखनाथ जमदाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांना ७ रोजी निवेदन देणार सैनिकांच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रसंगी आम्ही सिमेवर जाण्यास तयार आहोत, याबाबतचे निवेदन शुक्रवार, दि. ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील व माजी सैनिक बाळासाहेब पवार यांनी केले आहे.