शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

वेळ पडल्यास बंदुका हातात घेऊ

By admin | Updated: October 2, 2016 01:08 IST

पाकिस्तानला धडा शिकवा : माजी सैनिकांचे सरकारला आवाहन

सांगली : उरी हल्ल्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरातील तळांवर हल्ले करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. सरकारने आता माघार न घेता पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. गरज पडल्यास भारतीय सैन्याला मदत करण्यासाठी आम्ही बंदुका हातात घेऊन लढण्यास तयार आहोत. जिल्ह्यातील १८ हजार सैनिक सीमेवर जाण्यास तयार आहेत, असे शनिवारी पत्रकार परिषदेत माजी सैनिकांनी सांगितले. यासाठी शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. माजी सुभेदार हरिभाऊ शिंदे म्हणाले की, मी सैन्यदलामध्ये २६ वर्षे नोकरी केली आहे. ज्या उरीमध्ये अतिरेक्यांनी सैन्यदलावर हल्ला केला होता, तेथे बारा वर्षे सेवा झाली आहे. पाकिस्तानकडून वारंवार नियंत्रण रेषेचे उल्लंघन होत असताना आम्हाला त्यांच्याविरुध्द लढण्याची परवानगी मिळत नव्हती. यामुळे भारतीय सैन्य चिडून होते. उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे सात लाँचपॅड उद्ध्वस्त करण्यासाठी सैन्याला आदेश दिला. यामुळे निश्चितच सैनिकांचे मनौधैर्य वाढण्यास मदत होणार आहे. सरकारच्या भूमिकेला आणि सैन्याला पाकिस्तानबरोबर लढण्यासाठी बळ मिळावे, यासाठी सांगली जिल्ह्यातील हजारो माजी सैनिक पुन्हा सीमेवर जाण्यास तयार आहेत. सुभेदार संभाजी पवार म्हणाले की, आम्हाला राजकारणात पडायचे नाही, पण सैन्याच्यादृष्टीने बऱ्याच वर्षातून प्रथमच चांगला निर्णय भारत सरकारने घेतला आहे. पाकिस्तानकडून होणारे हल्ले किती दिवस पाहात बसायचे? कधी तर त्यांना धडा शिकवण्याची गरज होतीच. ते धाडस नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहे. शिवाय आम्ही सीमेवर लढण्यास तयार आहोत. शमशुद्दीन नदाफ म्हणाले की, पाकिस्तानच्या भूमीत जाऊन तेथील दहशतवाद्यांचा खात्मा केल्यामुळे निश्चितच भारतीय सैनिकांचे मनोबल वाढणार आहे. भारतीय सैन्य सीमेवर गेलेच आहे, तर पाकिस्तानला धडा शिकवूनच परत आले पाहिजे. यासाठी आम्ही त्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार आहोत. यावेळी दिलावर आत्तार, बाळासाहेब पवार, शिवाजी पवार, महादेव कोळी, गोरखनाथ जमदाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांना ७ रोजी निवेदन देणार सैनिकांच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रसंगी आम्ही सिमेवर जाण्यास तयार आहोत, याबाबतचे निवेदन शुक्रवार, दि. ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील व माजी सैनिक बाळासाहेब पवार यांनी केले आहे.