शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

वेळ पडल्यास बंदुका हातात घेऊ

By admin | Updated: October 2, 2016 01:08 IST

पाकिस्तानला धडा शिकवा : माजी सैनिकांचे सरकारला आवाहन

सांगली : उरी हल्ल्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरातील तळांवर हल्ले करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. सरकारने आता माघार न घेता पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. गरज पडल्यास भारतीय सैन्याला मदत करण्यासाठी आम्ही बंदुका हातात घेऊन लढण्यास तयार आहोत. जिल्ह्यातील १८ हजार सैनिक सीमेवर जाण्यास तयार आहेत, असे शनिवारी पत्रकार परिषदेत माजी सैनिकांनी सांगितले. यासाठी शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. माजी सुभेदार हरिभाऊ शिंदे म्हणाले की, मी सैन्यदलामध्ये २६ वर्षे नोकरी केली आहे. ज्या उरीमध्ये अतिरेक्यांनी सैन्यदलावर हल्ला केला होता, तेथे बारा वर्षे सेवा झाली आहे. पाकिस्तानकडून वारंवार नियंत्रण रेषेचे उल्लंघन होत असताना आम्हाला त्यांच्याविरुध्द लढण्याची परवानगी मिळत नव्हती. यामुळे भारतीय सैन्य चिडून होते. उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे सात लाँचपॅड उद्ध्वस्त करण्यासाठी सैन्याला आदेश दिला. यामुळे निश्चितच सैनिकांचे मनौधैर्य वाढण्यास मदत होणार आहे. सरकारच्या भूमिकेला आणि सैन्याला पाकिस्तानबरोबर लढण्यासाठी बळ मिळावे, यासाठी सांगली जिल्ह्यातील हजारो माजी सैनिक पुन्हा सीमेवर जाण्यास तयार आहेत. सुभेदार संभाजी पवार म्हणाले की, आम्हाला राजकारणात पडायचे नाही, पण सैन्याच्यादृष्टीने बऱ्याच वर्षातून प्रथमच चांगला निर्णय भारत सरकारने घेतला आहे. पाकिस्तानकडून होणारे हल्ले किती दिवस पाहात बसायचे? कधी तर त्यांना धडा शिकवण्याची गरज होतीच. ते धाडस नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहे. शिवाय आम्ही सीमेवर लढण्यास तयार आहोत. शमशुद्दीन नदाफ म्हणाले की, पाकिस्तानच्या भूमीत जाऊन तेथील दहशतवाद्यांचा खात्मा केल्यामुळे निश्चितच भारतीय सैनिकांचे मनोबल वाढणार आहे. भारतीय सैन्य सीमेवर गेलेच आहे, तर पाकिस्तानला धडा शिकवूनच परत आले पाहिजे. यासाठी आम्ही त्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार आहोत. यावेळी दिलावर आत्तार, बाळासाहेब पवार, शिवाजी पवार, महादेव कोळी, गोरखनाथ जमदाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांना ७ रोजी निवेदन देणार सैनिकांच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रसंगी आम्ही सिमेवर जाण्यास तयार आहोत, याबाबतचे निवेदन शुक्रवार, दि. ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील व माजी सैनिक बाळासाहेब पवार यांनी केले आहे.