शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

जमत नसेल तर, कारखाने बंद ठेवा!

By admin | Updated: November 3, 2016 23:37 IST

राजू शेट्टींचा पलटवार : सांगलीतील साखर कारखानदारांची सावध भूमिका; दराची कोंडी कायम

 शीतल पाटील ल्ल सांगली यंदाच्या गळीत हंगामात उसाला ‘एफआरपी’सह टनाला १७५ रुपये जादा दर देण्याचा कोल्हापूर फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना मान्य नसेल, तर त्यांनी साखर कारखाने सुरू करू नयेत. येथील ऊस कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने गाळप करतील, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील कारखानदारांना सुनावले. दरम्यान, जिल्ह्यातील कारखानदारांनी आता कोल्हापूर फॉर्म्युल्यावर सावध पवित्रा घेतला आहे. एफआरपीपेक्षा जादा दर देऊ; पण तो किती असेल, याविषयी मात्र कोणीच कारखानदार उघडपणे बोलण्यास तयार नाही. त्यामुळे ऊस दराची कोंडी कोल्हापूर जिल्ह्यात फुटली असली, तरी सांगलीत मात्र कायम आहे. कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यस्थी करीत ऊसदराचा तिढा सोडविला. अखेर एफआरपीसह टनास १७५ जादा दर देण्यावर ऊस दराची कोंडी फुटली, पण हा फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी अमान्य केला आहे. हा फॉर्म्युला केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांसाठी असून, आमचा काहीच संबंध नाही, असे म्हणत येथील कारखानदारांनी हात झटकले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराबाबत निर्णय झाला असला तरी, तो सर्वांनाच लागू आहे. त्यात सांगलीतील कारखानदारांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटनाही रस्त्यावर उतरणार, हे निश्चित आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तर कोल्हापूर फॉर्म्युला मान्य नसेल, तर कारखानेच सुरू करू नका, असा सज्जड दम भरला आहे. सांगलीतील ऊस कोल्हापूर व कर्नाटकातील कारखाने गाळप करतील. कर्नाटकातील कारखान्यातील एफआरपीसह १७५ रुपये जादा देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यातून सांगली जिल्ह्यातील कारखानदार १७५ पेक्षा वाढीव रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार असतील, तर त्यांचे स्वागतच करू, असे म्हणत कारखानदारांवर पलटवार केला आहे. ऊस दराच्या प्रश्नावर सांगलीतील वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसताच कारखानदारांनीही सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. काही कारखानदारांनी एफआरपीची रक्कम एकरकमी देणार आहोतच, त्यावर किती वाढीव रक्कम द्यायची, याचाही निर्णय लवकर घेऊ, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अंगावर घेण्याचे टाळले आहे. पण १७५ रुपये देणार, की त्यापेक्षा कमी-अधिक देणार, यावर भाष्य करण्यास कोणीच तयार नाही. येत्या आठवड्याभरात जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे गाळप सुरू होणार आहे. त्यामुळे ऊस दर किती मिळणार, याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. कळवळा असेल, तर कोल्हापूरपेक्षा जादा दर द्या : राजू शेट्टी कोल्हापुरातील सर्व कारखानदार, रघुनाथदादा पाटील, शिवसेना व आम्ही चर्चेला बसलो. त्या मंथनातून जो फॉर्म्युला निघाला, तो राज्याने स्वीकारावा, असाच आहे. त्यात काहीच चुकीचे नाही. एफआरपीपेक्षा जादा दर मिळावा, एवढाच त्याचा अर्थ आहे. तब्बल तीन दिवस १४ तास चर्चा करून, घासूनपुसून निर्णय घेतला आहे. बैठकीला अनेक दिग्गज मंडळी होती. आम्ही आकड्यावर चर्चा केली नाही. नंतर कारखानदार दराचा आकडा बदलतात. त्यामुळे एक फॉर्म्युला निश्चित केला. हा फॉर्म्युला स्वीकारण्याची मानसिकता कर्नाटकातील कारखान्यांचीही आहे. सांगलीतील कारखानदारांना फॉर्म्युला मान्य नसेल, तर शेतकरी कोल्हापुरातील कारखान्यांना ऊस घालतील. सांगलीतील कारखानदारांनी कारखाने सुरू करू नयेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांपेक्षा सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना ऊस उत्पादकांचा अधिक कळवळा असेल, तर त्यांनी कोल्हापूरपेक्षा जादा दर जाहीर करावा. १७५ ऐवजी १८० रुपये जादा द्यावेत, आम्ही त्यांचे स्वागतच करू. पण कोल्हापूरपेक्षा एक रुपयाही कमी दर घेणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी दिला. हुतात्मा कारखान्याकडे लक्ष गेल्या काही वर्षात ऊस दरावरून कारखानदार व संघटनांत तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. या संघर्षात ऊस दराची कोंडी फोडण्याचे काम हुतात्मा साखर कारखान्याने केले होते. यंदा हुतात्मा कारखान्याचा गळीत हंगाम रविवार, दि. ६ पासून सुरू होत आहे. यादिवशी कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी दराची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांचे लक्ष हुतात्मा कारखान्याकडे लागले आहे.