शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य चोरी सिद्ध झाल्यास लेखणी थांबवू

By admin | Updated: January 15, 2017 01:12 IST

विश्वास पाटील : औदुंबर येथे ७४ वे ‘सदानंद साहित्य संमेलन’ उत्साहात

अंकलखोप : मध्यंतरी माझ्या साहित्य चोरीची मोठी चर्चा करण्यात आली. मी साहित्य चोरी केल्याचे सिद्ध झाले, तर लेखणी बंद करेन, असे स्पष्टीकरण ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी शनिवारी दिले. औदुंबर (ता. पलूस) येथील सदानंद साहित्य मंडळाने आयोजित केलेल्या ७४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.विश्वास पाटील म्हणाले की, साहित्यिकाच्या जीवनामध्ये ठिणगी पडते व साहित्याचा वणवा निर्माण होतो, तेव्हाच ते साहित्य दर्जेदार होऊन त्याला लोकमान्यता मिळते. लेखक हा कलावंत असतो. तो व्रतस्थ असतो. सध्या मात्र लेखकांमध्ये मरगळ आली आहे. एखादी कादंबरी प्रसिद्ध झाली की लेखक थांबत असल्याचे दिसत आहे.ते म्हणाले की, महाराष्ट्राला थोर साहित्यिकांची परंपरा आहे. ही माती कसदार आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर आहे. साहित्यामध्ये विदर्भाचा दिसणारा अनुशेष पश्चिम महाराष्ट्राने भरून काढला आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांनी वेगवेगळे विषय साहित्यात आणले पाहिजेत. अलीकडे ग्रामीण भागातील नागरिकीकरणाला वेगवेगळे रंग आहेत, त्याची उधळण साहित्यिकांनी करावी. ‘पानिपत’मध्ये मी माणसे शोधली, म्हणूनच ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरली. ‘पानिपत’ हा शब्द ‘पुण्यपत’ झाला, कारण मी पानिपतच्या मुळापर्यंत गेलो. अभ्यास केला. नवीन लेखकांनी मेहनत घेतली पाहिजे. देश फिरला आणि पाहिला पाहिजे, तरच कसदार साहित्य निर्मिती होईल. मध्यंतरी माझ्या साहित्य चोरीची मोठी चर्चा झाली. मात्र मी साहित्य चोरी केल्याचे सिद्ध झाले, तर त्याचक्षणी लेखणी बंद करेन, असेही पाटील यांनी सांगितले.प्रारंभी दिवंगत सदानंद सामंत, कवी सुधांशू, म. भा. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. कवी सुधांशू पुरस्कार राजेंद्र टिळे (शिराळा), ओंकार चिटणीस (बोरगाव-इस्लामपूर) यांना, तर कै. सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार शहानवाज मुल्ला (इस्लामपूर) व प्रा. विठ्ठल सदामते (रामानंदनगर-पलूस) यांच्या काव्यसंग्रहांना देण्यात आला. डॉक्टरेट पदवी मिळविलेल्या प्रा. डॉ. महेश पाटील (भिलवडी), प्रा. डॉ. शार्दूल जोशी (औदुंबर), डॉ. दिनार पाटील (अंकलखोप), प्रा. डॉ. सोनम सूर्यवंशी (अंकलखोप) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मोहन दत्तात्रय आवटे (आमणापूर) यांच्या ‘खुन्नस’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. पुरुषोत्तम जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सरपंच संजना यादव, उपसरपंच विजय पाटील, साहित्यिक वसंत केशव पाटील, प्रा. प्रदीप पाटील, बाळासाहेब पवार (कुंडल), बापूसाहेब शिरगावकर, अशोक पाटील (नागठाणे), उदयसिंह सूर्यवंशी, वैशाली पाटील, रघुराज मेटकरी आदी प्रमुख उपस्थित होते. वासुदेव जोशी यांनी सूत्रसंचालन केले. ‘सैराट’चा काव्यात्मक भाग बघासध्याच्या परिस्थितीबद्दल विश्वास पाटील म्हणाले की, समाजाने ‘सैराट’सारखी कलाकृती पाहावी, मात्र सैराट होऊ नये. त्या चित्रपटातील प्रसंगांसारखे तरुणांनी धाडस करू नये. त्यातील काव्यात्मक भाग आत्मसात करावा. जाती-पातीच्या, धर्माच्या नावावर लेकीचा घातपात करण्याची वाईट प्रवृत्ती घालवण्याचे आवाहन मी साहित्यिक म्हणून करतो. ‘पानिपत’कार म्हणतात...मी शब्दाच्या फडातील पाटील आहे. तमाशा, कुस्ती व उसाच्या फडातील नाही!औदुंबरच्या साहित्य संमेलनातून मराठीची सांस्कृतिक पायाभरणीपानिपत बनले मराठ्यांमुळे ‘पुण्यपत’!