शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श पलूस तालुक्याला लागले भ्रष्टाचाराचे ग्रहण

By admin | Updated: June 23, 2015 00:04 IST

विहीर खुदाई घोटाळा : जिल्हा परिषदेकडून चौकशी सुरू; अनेकांचे धाबे दणाणले

पलूस : ‘आदर्श’ म्हणून राज्याने गौरविलेला पलूस तालुका आता भ्रष्टाचारात आदर्श म्हणून नावाजला जाणार यात शंका नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर खुदाईतील कथित भ्रष्टाचारामुळे पलूस तालुका भ्रष्टाचाराने चांगलाच पोखरला गेला असल्याचे वास्तव समोर आले आहे.निर्मलग्राम योजना, डिजिटल तालुका, तंटामुक्त अभियान १०० टक्के राबविणे, इको व्हिलेज तालुका, तसेच स्वच्छता अभियानात पलूस तालुक्याने शासनाची पारितोषिके मिळवली आहेत. सधन व समृद्ध पलूस तालुका दरडोई उत्पन्नात राज्यात अग्रेसर आहे. अशा या पलूस तालुक्यात भ्रष्टाचार हा प्रकार नव्हता. परंतु अलीकडे मात्र पलूस तालुक्यात भ्रष्टाचाराने चांगलेच डोके वर काढले आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २८४ लाभार्थींनी अनुदान मिळवले आहे. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तालुक्यातीलच जिल्हा परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केल्याने, तालुक्यात खळबळ उडाली आहे.२८४ लाभार्थींनी कोणत्या गट नंबरमध्ये विहीर काढली आहे, प्रकरणाला कधी मंजुरी मिळाली, विहिरीचे काम कधी पूर्ण झाले आदी माहिती घेण्यासाठी शाखा अभियंत्यांची ५ पथके तैनात करण्यात आली आहेत. लवकरच यातील भ्रष्टाचाऱ्यांचे चेहरे उघड होतील. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे या भ्रष्टाचाराची कशाप्रकारे दखल घेतात, याची चर्चा सुरू आहे. परंतु या शासकीय योजनेत मोठी अनियमितता झाल्याने पलूस तालुक्याचे नाव मात्र डागाळले आहे. काही दिवसांपूर्वी पलूस पंचायत समितीचे कृषी अधिकारी नंदकुमार विठोबा चव्हाण आणि लिपिक वैजयंती पाटोळे यांना, लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. पलूस तालुक्याचे नाव भ्रष्टाचारामध्ये पुढे येऊ लागले आहे. (वार्ताहर)आरोपाने खळबळ राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २८४ लाभार्थींनी अनुदान मिळवले आहे. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तालुक्यातीलच जिल्हा परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केल्याने, तालुक्यात खळबळ उडाली आहे.