शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

आदर्श माता पुरस्कारातून महिलांना प्रेरणा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST

सांगलीत राजर्षी शाहू शिक्षण संस्थेतर्फे आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय ...

सांगलीत राजर्षी शाहू शिक्षण संस्थेतर्फे आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, आमदार विक्रम सावंत, सुमनताई पाटील, विशाल पाटील, दीपक शिंदे-म्हैसाळकर, आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगली जिल्ह्याने राज्याला तसेच देशालाही अनेक सुुपुत्र दिले. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी राज्याला दिशा दिली. आदर्श माता पुरस्कारातून अशा महिलांना प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. सांगलीत राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.

संस्थेतर्फे जिल्हाभरातील बारा महिलांना आदर्श माता पुरस्काराने पटाेले व आठवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. देवयानी देशमुख (कडेपूर), शहाजादबी पीरजादे (कामेरी), इंदू सावंत (सावंतपूर), शांताबाई खरमाटे (वंजारवाडी), मंगल शिंदे (पोसेवाडी), आक्का पाटील (मणदूर), पार्वती कुंभार (हरिपूर), छबू चोथे (करगणी), सुमन पाटील (सांगली), नीलिमा पाटील (मिरज), गुजव्वा नाटेकर (उमदी) व बायनाबाई साबळे (नांगोळे यांचा गाैरव झाला. पटोले म्हणाले, भारतीय संस्कृती मोठी आहे. मात्र, आताची पिढी पाश्चिमात्य संस्कारांकडे वळू लागली आहे. भारतीय संस्कृती जपण्यासाठी आदर्श माता पुरस्कारासारख्या कार्यक्रमांची गरज आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळते. सांगली, सातारा जिल्ह्यांनी अशी प्रेरणा अनेकांना दिली आहे.

रामदास आठवले म्हणाले की, आदर्श मातांमुळेच देशाचे नेतृत्व करणारी माणसे घडली. बदलत्या काळात त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.

यावेळी आमदार सुमनताई पाटील, विक्रम सावंत, वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला शाम पांडे, विवेक कांबळे, संजय कांबळे, संदेश भंडारे हेदेखील उपस्थित होते. शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचा एकसष्टीनिमित्त सत्कार झाला. स्वागत मालुश्री पाटील यांनी व प्रास्ताविक विठ्ठल पाटील यांनी केले. आभार गगनराज पाटील यांनी मानले.

चौकट

राजकारणात काहीही होऊ शकते

पटोले म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकते. रामदास आठवले भाजपसोबत आणि मी काँग्रेसमध्ये काम करेन याची कल्पनाही कोणी केलेली नव्हती, पण तसे घडले.