शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
5
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
6
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
7
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
8
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
9
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
10
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
11
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
12
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
13
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
14
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
15
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
16
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
17
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
18
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
19
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
20
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?

आदर्श माता पुरस्कारातून महिलांना प्रेरणा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST

सांगलीत राजर्षी शाहू शिक्षण संस्थेतर्फे आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय ...

सांगलीत राजर्षी शाहू शिक्षण संस्थेतर्फे आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, आमदार विक्रम सावंत, सुमनताई पाटील, विशाल पाटील, दीपक शिंदे-म्हैसाळकर, आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगली जिल्ह्याने राज्याला तसेच देशालाही अनेक सुुपुत्र दिले. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी राज्याला दिशा दिली. आदर्श माता पुरस्कारातून अशा महिलांना प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. सांगलीत राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.

संस्थेतर्फे जिल्हाभरातील बारा महिलांना आदर्श माता पुरस्काराने पटाेले व आठवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. देवयानी देशमुख (कडेपूर), शहाजादबी पीरजादे (कामेरी), इंदू सावंत (सावंतपूर), शांताबाई खरमाटे (वंजारवाडी), मंगल शिंदे (पोसेवाडी), आक्का पाटील (मणदूर), पार्वती कुंभार (हरिपूर), छबू चोथे (करगणी), सुमन पाटील (सांगली), नीलिमा पाटील (मिरज), गुजव्वा नाटेकर (उमदी) व बायनाबाई साबळे (नांगोळे यांचा गाैरव झाला. पटोले म्हणाले, भारतीय संस्कृती मोठी आहे. मात्र, आताची पिढी पाश्चिमात्य संस्कारांकडे वळू लागली आहे. भारतीय संस्कृती जपण्यासाठी आदर्श माता पुरस्कारासारख्या कार्यक्रमांची गरज आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळते. सांगली, सातारा जिल्ह्यांनी अशी प्रेरणा अनेकांना दिली आहे.

रामदास आठवले म्हणाले की, आदर्श मातांमुळेच देशाचे नेतृत्व करणारी माणसे घडली. बदलत्या काळात त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.

यावेळी आमदार सुमनताई पाटील, विक्रम सावंत, वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला शाम पांडे, विवेक कांबळे, संजय कांबळे, संदेश भंडारे हेदेखील उपस्थित होते. शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचा एकसष्टीनिमित्त सत्कार झाला. स्वागत मालुश्री पाटील यांनी व प्रास्ताविक विठ्ठल पाटील यांनी केले. आभार गगनराज पाटील यांनी मानले.

चौकट

राजकारणात काहीही होऊ शकते

पटोले म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकते. रामदास आठवले भाजपसोबत आणि मी काँग्रेसमध्ये काम करेन याची कल्पनाही कोणी केलेली नव्हती, पण तसे घडले.