शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

भाजीपाला दराची पुन्हा शंभरी; गहू, तांदळाचे दरही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:23 IST

सांगली : कोरोनाच्या वाढता संसर्गाने आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला दरातील वाढ कायम आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर सरासरी १०० ...

सांगली : कोरोनाच्या वाढता संसर्गाने आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला दरातील वाढ कायम आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर सरासरी १०० रुपयांवर पोहोचले आहेत, तर खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून या आठवड्यात १५ ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. खाद्यतेलासह गहू, तांदळाच्याही दरात सरासरी प्रति क्विंटल १५० ते २०० रुपयांची वाढ आहे.

आठवडी बाजार बंद असल्याने सध्या घरोघरी फिरून विक्रेते भाजीपाला विकत आहेत. त्यात भाजीपाला आवकही पूर्ण घटली आहे. पुढील आठवड्यात पुन्हा दर वाढण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या पंधरवड्यापर्यंत ४० ते ६० रुपयांवर असलेला भाजीपाला आता ८० ते १०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

चौकट

लिंबूचे दर वाढले

उन्हाळ्यात लिंबू, काकडीला अधिक मागणी असते. त्यात लिंबूची आवक आणि मागणीत तफावत असल्याने दर वाढले आहेत. सध्या पाच रुपयांना एक लिंबू मिळत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लिंबूलाही मागणी चांगली आहे. काकडीही महाग झाली असून प्रति किलो ५० रुपयांनी मिळत आहे. वांगी, दोडका, गवारीचे दर ८० रुपयांवर पोहोचले आहेत.

चौकट

तेलाचा भडका कायम

गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ कायम आहे. या आठवड्यातही तेलाच्या दरात प्रति किलो १५ ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. सरकी, सूर्यफूल, शेंगदाणा तेल दरात वाढ झाल्याने आता ग्राहकांनी पामतेलाची खरेदी वाढविली असली तरी, या तेलाचेही दर आठवड्यात २० रुपयांनी वाढले आहेत.

चौकट

आंबा येतोय आवाक्यात

कोरोना स्थितीमुळे बाजार बंद असल्याने फळे विक्रीवरही परिणाम झाला आहे. फळे विक्रीस परवानगी असली तरी आता सकाळी ११ पर्यंतच मुभा असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. या आठवड्यात आंबा आवकेत वाढ झाली असून दरही काही प्रमाणात आवाक्यात येत आहे. गेल्या आठवड्यापेक्षा दरात १०० रुपयांनी घट झाली आहे.

कोट

शासनाने आठवडी बाजार पुन्हा एकदा सुरू करावेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विक्री करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. घरोघरी विक्री करताना अडचणी येत असून त्यामुळे दरात वाढ होत आहे.

- विठ्ठल मासाळ, भाजीपाला विक्रेता

कोट

सध्या किराणा दुकानांना सकाळी सात ते ११ पर्यंतच वेळ आहे. त्यामुळे ग्राहकांवर परिणाम झाला आहे. सध्या मालाची उपलब्धता असली तरी उठाव कमी आहे. दर वाढत असले तरी मालाची विक्री मर्यादित होत आहे.

- अशिष घोरपडे, व्यापारी

कोट

किराणा सामान, भाजीपाला, पेट्रोल सगळीकडेच दरवाढ आहे. त्यात कोरोनामुळे काम बंद आहे. पण दरवाढ काही थांबत नाही. याचा आम्हा मध्यमवर्गीय कुटुंबांना त्रास होत आहे. शासनाने आता मालाचे दर स्थिर राहतील याकडे विशेष लक्ष द्यावे.

- कमल भोसले, गृहिणी