शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाजीपाला दराची पुन्हा शंभरी; गहू, तांदळाचे दरही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:23 IST

सांगली : कोरोनाच्या वाढता संसर्गाने आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला दरातील वाढ कायम आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर सरासरी १०० ...

सांगली : कोरोनाच्या वाढता संसर्गाने आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला दरातील वाढ कायम आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर सरासरी १०० रुपयांवर पोहोचले आहेत, तर खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून या आठवड्यात १५ ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. खाद्यतेलासह गहू, तांदळाच्याही दरात सरासरी प्रति क्विंटल १५० ते २०० रुपयांची वाढ आहे.

आठवडी बाजार बंद असल्याने सध्या घरोघरी फिरून विक्रेते भाजीपाला विकत आहेत. त्यात भाजीपाला आवकही पूर्ण घटली आहे. पुढील आठवड्यात पुन्हा दर वाढण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या पंधरवड्यापर्यंत ४० ते ६० रुपयांवर असलेला भाजीपाला आता ८० ते १०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

चौकट

लिंबूचे दर वाढले

उन्हाळ्यात लिंबू, काकडीला अधिक मागणी असते. त्यात लिंबूची आवक आणि मागणीत तफावत असल्याने दर वाढले आहेत. सध्या पाच रुपयांना एक लिंबू मिळत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लिंबूलाही मागणी चांगली आहे. काकडीही महाग झाली असून प्रति किलो ५० रुपयांनी मिळत आहे. वांगी, दोडका, गवारीचे दर ८० रुपयांवर पोहोचले आहेत.

चौकट

तेलाचा भडका कायम

गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ कायम आहे. या आठवड्यातही तेलाच्या दरात प्रति किलो १५ ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. सरकी, सूर्यफूल, शेंगदाणा तेल दरात वाढ झाल्याने आता ग्राहकांनी पामतेलाची खरेदी वाढविली असली तरी, या तेलाचेही दर आठवड्यात २० रुपयांनी वाढले आहेत.

चौकट

आंबा येतोय आवाक्यात

कोरोना स्थितीमुळे बाजार बंद असल्याने फळे विक्रीवरही परिणाम झाला आहे. फळे विक्रीस परवानगी असली तरी आता सकाळी ११ पर्यंतच मुभा असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. या आठवड्यात आंबा आवकेत वाढ झाली असून दरही काही प्रमाणात आवाक्यात येत आहे. गेल्या आठवड्यापेक्षा दरात १०० रुपयांनी घट झाली आहे.

कोट

शासनाने आठवडी बाजार पुन्हा एकदा सुरू करावेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विक्री करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. घरोघरी विक्री करताना अडचणी येत असून त्यामुळे दरात वाढ होत आहे.

- विठ्ठल मासाळ, भाजीपाला विक्रेता

कोट

सध्या किराणा दुकानांना सकाळी सात ते ११ पर्यंतच वेळ आहे. त्यामुळे ग्राहकांवर परिणाम झाला आहे. सध्या मालाची उपलब्धता असली तरी उठाव कमी आहे. दर वाढत असले तरी मालाची विक्री मर्यादित होत आहे.

- अशिष घोरपडे, व्यापारी

कोट

किराणा सामान, भाजीपाला, पेट्रोल सगळीकडेच दरवाढ आहे. त्यात कोरोनामुळे काम बंद आहे. पण दरवाढ काही थांबत नाही. याचा आम्हा मध्यमवर्गीय कुटुंबांना त्रास होत आहे. शासनाने आता मालाचे दर स्थिर राहतील याकडे विशेष लक्ष द्यावे.

- कमल भोसले, गृहिणी