शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
4
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
6
यशस्वी जैस्वालने पुन्हा घातला घोळ! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
7
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
8
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
9
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
10
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
11
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
12
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
13
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
14
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
15
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
16
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
17
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
18
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
19
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
20
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  

भाजीपाला दराची पुन्हा शंभरी; गहू, तांदळाचे दरही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:23 IST

सांगली : कोरोनाच्या वाढता संसर्गाने आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला दरातील वाढ कायम आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर सरासरी १०० ...

सांगली : कोरोनाच्या वाढता संसर्गाने आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला दरातील वाढ कायम आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर सरासरी १०० रुपयांवर पोहोचले आहेत, तर खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून या आठवड्यात १५ ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. खाद्यतेलासह गहू, तांदळाच्याही दरात सरासरी प्रति क्विंटल १५० ते २०० रुपयांची वाढ आहे.

आठवडी बाजार बंद असल्याने सध्या घरोघरी फिरून विक्रेते भाजीपाला विकत आहेत. त्यात भाजीपाला आवकही पूर्ण घटली आहे. पुढील आठवड्यात पुन्हा दर वाढण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या पंधरवड्यापर्यंत ४० ते ६० रुपयांवर असलेला भाजीपाला आता ८० ते १०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

चौकट

लिंबूचे दर वाढले

उन्हाळ्यात लिंबू, काकडीला अधिक मागणी असते. त्यात लिंबूची आवक आणि मागणीत तफावत असल्याने दर वाढले आहेत. सध्या पाच रुपयांना एक लिंबू मिळत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लिंबूलाही मागणी चांगली आहे. काकडीही महाग झाली असून प्रति किलो ५० रुपयांनी मिळत आहे. वांगी, दोडका, गवारीचे दर ८० रुपयांवर पोहोचले आहेत.

चौकट

तेलाचा भडका कायम

गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ कायम आहे. या आठवड्यातही तेलाच्या दरात प्रति किलो १५ ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. सरकी, सूर्यफूल, शेंगदाणा तेल दरात वाढ झाल्याने आता ग्राहकांनी पामतेलाची खरेदी वाढविली असली तरी, या तेलाचेही दर आठवड्यात २० रुपयांनी वाढले आहेत.

चौकट

आंबा येतोय आवाक्यात

कोरोना स्थितीमुळे बाजार बंद असल्याने फळे विक्रीवरही परिणाम झाला आहे. फळे विक्रीस परवानगी असली तरी आता सकाळी ११ पर्यंतच मुभा असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. या आठवड्यात आंबा आवकेत वाढ झाली असून दरही काही प्रमाणात आवाक्यात येत आहे. गेल्या आठवड्यापेक्षा दरात १०० रुपयांनी घट झाली आहे.

कोट

शासनाने आठवडी बाजार पुन्हा एकदा सुरू करावेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विक्री करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. घरोघरी विक्री करताना अडचणी येत असून त्यामुळे दरात वाढ होत आहे.

- विठ्ठल मासाळ, भाजीपाला विक्रेता

कोट

सध्या किराणा दुकानांना सकाळी सात ते ११ पर्यंतच वेळ आहे. त्यामुळे ग्राहकांवर परिणाम झाला आहे. सध्या मालाची उपलब्धता असली तरी उठाव कमी आहे. दर वाढत असले तरी मालाची विक्री मर्यादित होत आहे.

- अशिष घोरपडे, व्यापारी

कोट

किराणा सामान, भाजीपाला, पेट्रोल सगळीकडेच दरवाढ आहे. त्यात कोरोनामुळे काम बंद आहे. पण दरवाढ काही थांबत नाही. याचा आम्हा मध्यमवर्गीय कुटुंबांना त्रास होत आहे. शासनाने आता मालाचे दर स्थिर राहतील याकडे विशेष लक्ष द्यावे.

- कमल भोसले, गृहिणी