शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:35 IST

सांगली : शहरात दररोज नळाला पाणी येते. पण ते किती शुद्ध आहे? याबाबत नागरिकांना अनेकदा संभ्रम असतो. महापालिकेकडून शुद्ध ...

सांगली : शहरात दररोज नळाला पाणी येते. पण ते किती शुद्ध आहे? याबाबत नागरिकांना अनेकदा संभ्रम असतो. महापालिकेकडून शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात येते. पण गटारीतून गेलेल्या वाहिन्या, ठिकठिकाणची गळती यामुळे अनेकदा नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यासाठी नागरिकांनी सजग होऊन शुद्ध पाण्यासाठी आग्रह धरला पाहिजे.

महापालिकेने शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी गेल्या काही वर्षात विविध पावले उचलली आहेत. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने ७५ एमएलडीचे अत्याधुनिक केंद्रही सुरू केले आहे. या केंद्रातून सांगली व कुपवाड या दोन शहरांना पाणीपुरवठा होतो, तर मिरजेसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा आहे. शहराच्या गावठाण परिसरात पाण्याचा तुटवडा तसा कमीच जाणवतो. पण उपनगरांत मात्र अनेकदा पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी असतात. गावठाण परिसरात अशुद्ध पाण्याबाबत तक्रारी होत आहेत. या परिसरात गटारीतून, ड्रेनेज वाहिनीजवळूनच पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकदा गटारीचे, ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीत मिसळत असते. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येते. महापालिकेकडून मात्र नागरिकांना शुद्ध पाण्याचाच पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जाते. दररोज आठ ठिकाणचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. आजअखेर अशुद्ध पाण्याचा अहवाल आलेला नाही.

शहरात आठ ठिकाणी घेतले जातात नमुने

पिण्याचे पाणी किती शुद्ध आहे, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने दररोज आठ विविध ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले जातात. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. दररोज वेगवेगळ्या भागातून नमुने संकलित होतात. एखाद्या भागात नळाला खराब पाणी आल्यास तातडीने तेथील नमुने घेतले जातात. त्या पाण्याची तपासणी होते. कुठे गळती असेल तर तातडीने वरिष्ठांना कळविले जाते.

अशी हाेते तपासणी...

दररोज विविध ठिकाणांहून घेतलेले पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. तिथे पाणी पिण्यास योग्य आहे का? याची तपासणी केली जाते.

या पाण्याच्या नमुन्यात मलमूत्र आहे का, क्लोरिनची मात्र योग्य आहे का, याची तपासणी करून, प्रयोगशाळेकडून पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला जातो. एखाद्या वाहिनीला गळती असेल तरच अशुद्ध पाण्याचा अहवाल येतो.

महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दररोज १३५ लिटर पाण्याचा पुरवठा होतो. दररोज पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. कुठे खराब पाण्याची तक्रार आल्यास जागेवरच क्लोरिनच्या मात्रेची तपासणी केली जाते. त्यात कुठे अशुद्धता आढळल्यास हे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले जातात.

- फारुक मुल्ला, केमिस्ट, पाणीपुरवठा अधिकारी