शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:35 IST

सांगली : शहरात दररोज नळाला पाणी येते. पण ते किती शुद्ध आहे? याबाबत नागरिकांना अनेकदा संभ्रम असतो. महापालिकेकडून शुद्ध ...

सांगली : शहरात दररोज नळाला पाणी येते. पण ते किती शुद्ध आहे? याबाबत नागरिकांना अनेकदा संभ्रम असतो. महापालिकेकडून शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात येते. पण गटारीतून गेलेल्या वाहिन्या, ठिकठिकाणची गळती यामुळे अनेकदा नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यासाठी नागरिकांनी सजग होऊन शुद्ध पाण्यासाठी आग्रह धरला पाहिजे.

महापालिकेने शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी गेल्या काही वर्षात विविध पावले उचलली आहेत. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने ७५ एमएलडीचे अत्याधुनिक केंद्रही सुरू केले आहे. या केंद्रातून सांगली व कुपवाड या दोन शहरांना पाणीपुरवठा होतो, तर मिरजेसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा आहे. शहराच्या गावठाण परिसरात पाण्याचा तुटवडा तसा कमीच जाणवतो. पण उपनगरांत मात्र अनेकदा पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी असतात. गावठाण परिसरात अशुद्ध पाण्याबाबत तक्रारी होत आहेत. या परिसरात गटारीतून, ड्रेनेज वाहिनीजवळूनच पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकदा गटारीचे, ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीत मिसळत असते. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येते. महापालिकेकडून मात्र नागरिकांना शुद्ध पाण्याचाच पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जाते. दररोज आठ ठिकाणचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. आजअखेर अशुद्ध पाण्याचा अहवाल आलेला नाही.

शहरात आठ ठिकाणी घेतले जातात नमुने

पिण्याचे पाणी किती शुद्ध आहे, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने दररोज आठ विविध ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले जातात. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. दररोज वेगवेगळ्या भागातून नमुने संकलित होतात. एखाद्या भागात नळाला खराब पाणी आल्यास तातडीने तेथील नमुने घेतले जातात. त्या पाण्याची तपासणी होते. कुठे गळती असेल तर तातडीने वरिष्ठांना कळविले जाते.

अशी हाेते तपासणी...

दररोज विविध ठिकाणांहून घेतलेले पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. तिथे पाणी पिण्यास योग्य आहे का? याची तपासणी केली जाते.

या पाण्याच्या नमुन्यात मलमूत्र आहे का, क्लोरिनची मात्र योग्य आहे का, याची तपासणी करून, प्रयोगशाळेकडून पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला जातो. एखाद्या वाहिनीला गळती असेल तरच अशुद्ध पाण्याचा अहवाल येतो.

महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दररोज १३५ लिटर पाण्याचा पुरवठा होतो. दररोज पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. कुठे खराब पाण्याची तक्रार आल्यास जागेवरच क्लोरिनच्या मात्रेची तपासणी केली जाते. त्यात कुठे अशुद्धता आढळल्यास हे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले जातात.

- फारुक मुल्ला, केमिस्ट, पाणीपुरवठा अधिकारी