शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:35 IST

सांगली : शहरात दररोज नळाला पाणी येते. पण ते किती शुद्ध आहे? याबाबत नागरिकांना अनेकदा संभ्रम असतो. महापालिकेकडून शुद्ध ...

सांगली : शहरात दररोज नळाला पाणी येते. पण ते किती शुद्ध आहे? याबाबत नागरिकांना अनेकदा संभ्रम असतो. महापालिकेकडून शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात येते. पण गटारीतून गेलेल्या वाहिन्या, ठिकठिकाणची गळती यामुळे अनेकदा नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यासाठी नागरिकांनी सजग होऊन शुद्ध पाण्यासाठी आग्रह धरला पाहिजे.

महापालिकेने शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी गेल्या काही वर्षात विविध पावले उचलली आहेत. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने ७५ एमएलडीचे अत्याधुनिक केंद्रही सुरू केले आहे. या केंद्रातून सांगली व कुपवाड या दोन शहरांना पाणीपुरवठा होतो, तर मिरजेसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा आहे. शहराच्या गावठाण परिसरात पाण्याचा तुटवडा तसा कमीच जाणवतो. पण उपनगरांत मात्र अनेकदा पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी असतात. गावठाण परिसरात अशुद्ध पाण्याबाबत तक्रारी होत आहेत. या परिसरात गटारीतून, ड्रेनेज वाहिनीजवळूनच पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकदा गटारीचे, ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीत मिसळत असते. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येते. महापालिकेकडून मात्र नागरिकांना शुद्ध पाण्याचाच पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जाते. दररोज आठ ठिकाणचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. आजअखेर अशुद्ध पाण्याचा अहवाल आलेला नाही.

शहरात आठ ठिकाणी घेतले जातात नमुने

पिण्याचे पाणी किती शुद्ध आहे, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने दररोज आठ विविध ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले जातात. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. दररोज वेगवेगळ्या भागातून नमुने संकलित होतात. एखाद्या भागात नळाला खराब पाणी आल्यास तातडीने तेथील नमुने घेतले जातात. त्या पाण्याची तपासणी होते. कुठे गळती असेल तर तातडीने वरिष्ठांना कळविले जाते.

अशी हाेते तपासणी...

दररोज विविध ठिकाणांहून घेतलेले पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. तिथे पाणी पिण्यास योग्य आहे का? याची तपासणी केली जाते.

या पाण्याच्या नमुन्यात मलमूत्र आहे का, क्लोरिनची मात्र योग्य आहे का, याची तपासणी करून, प्रयोगशाळेकडून पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला जातो. एखाद्या वाहिनीला गळती असेल तरच अशुद्ध पाण्याचा अहवाल येतो.

महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दररोज १३५ लिटर पाण्याचा पुरवठा होतो. दररोज पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. कुठे खराब पाण्याची तक्रार आल्यास जागेवरच क्लोरिनच्या मात्रेची तपासणी केली जाते. त्यात कुठे अशुद्धता आढळल्यास हे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले जातात.

- फारुक मुल्ला, केमिस्ट, पाणीपुरवठा अधिकारी