शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

जतच्या विभाजनाच्या आशा पुन्हा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:06 IST

मच्छिंद्र ऐनापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबिळूर : जत तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक विस्तारक्षेत्र असलेल्या जत तालुक्याच्या विभाजनाची मागणी चाळीस वर्षांहून अधिक काळची आहे. यापूर्वी दिलेले प्रस्ताव मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळाले होते. त्यामुळे अलीकडे पुन्हा नव्याने प्रस्ताव देण्यात आलेत. उमदी आणि संख ...

मच्छिंद्र ऐनापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबिळूर : जत तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक विस्तारक्षेत्र असलेल्या जत तालुक्याच्या विभाजनाची मागणी चाळीस वर्षांहून अधिक काळची आहे. यापूर्वी दिलेले प्रस्ताव मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळाले होते. त्यामुळे अलीकडे पुन्हा नव्याने प्रस्ताव देण्यात आलेत. उमदी आणि संख या दोन्ही ठिकाणचे प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आले आहेत.राज्य शासनाने राज्यातल्या तालुका आणि जिल्हा विभाजनाबाबत दोन समित्या नेमल्या होत्या. त्यानुसार या दोन्ही समित्यांनी अहवाल नुकताच शासनाला सादर केला आहे. लवकरच विभाजनाच्या हालचाली सुरू होणार आहेत.अमरावतीचे तत्कालीन विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा अभ्यास करून अहवाल सादर केला; तर तालुक्यांच्यासंदर्भात अनुपकुमार यांची समिती नेमण्यात आली होती. त्यांनीही आपला अहवाल सादर केला आहे. अगोदरच राज्यात पाच हजार सज्जे निर्माण करण्यात आले आहेत. शिवाय सांगली जिल्ह्यातल्या वाळवा, आष्टा आणि संखसाठी उपविभाग झाले आहेत.यावर राज्याचे प्रधान सचिव आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत अधिकारी अभ्यास करून लवकर नवे तालुके आणि जिल्हे जाहीर करणार आहेत, असे खुद्द महसूलमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जत तालुक्यासह जिल्ह्यातल्या अन्य नव्या तालुक्यांची निर्मिती होण्याबाबत आशा निर्माण झाली आहे.आमदार विलासराव जगताप यांनी उमदीलाही अप्पर कार्यालय मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. यात तडजोड होऊन तालुक्याचे विभाजन होऊन लवकरच नव्या तालुक्याची निर्मिती होईल, असे बोलले जात आहे.महसूलमंत्र्यांची जवळीक : फायद्याचीमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची आणि तालुक्यातील भाजपच्या नेत्यांची जवळीक आहे. त्यामुळे जत तालुक्याला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी संखला अप्पर कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे संख तालुक्याची निर्मिती होण्याची आशा निर्माण झाली आहे.