शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

जतच्या विभाजनाच्या आशा पुन्हा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:06 IST

मच्छिंद्र ऐनापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबिळूर : जत तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक विस्तारक्षेत्र असलेल्या जत तालुक्याच्या विभाजनाची मागणी चाळीस वर्षांहून अधिक काळची आहे. यापूर्वी दिलेले प्रस्ताव मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळाले होते. त्यामुळे अलीकडे पुन्हा नव्याने प्रस्ताव देण्यात आलेत. उमदी आणि संख ...

मच्छिंद्र ऐनापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबिळूर : जत तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक विस्तारक्षेत्र असलेल्या जत तालुक्याच्या विभाजनाची मागणी चाळीस वर्षांहून अधिक काळची आहे. यापूर्वी दिलेले प्रस्ताव मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळाले होते. त्यामुळे अलीकडे पुन्हा नव्याने प्रस्ताव देण्यात आलेत. उमदी आणि संख या दोन्ही ठिकाणचे प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आले आहेत.राज्य शासनाने राज्यातल्या तालुका आणि जिल्हा विभाजनाबाबत दोन समित्या नेमल्या होत्या. त्यानुसार या दोन्ही समित्यांनी अहवाल नुकताच शासनाला सादर केला आहे. लवकरच विभाजनाच्या हालचाली सुरू होणार आहेत.अमरावतीचे तत्कालीन विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा अभ्यास करून अहवाल सादर केला; तर तालुक्यांच्यासंदर्भात अनुपकुमार यांची समिती नेमण्यात आली होती. त्यांनीही आपला अहवाल सादर केला आहे. अगोदरच राज्यात पाच हजार सज्जे निर्माण करण्यात आले आहेत. शिवाय सांगली जिल्ह्यातल्या वाळवा, आष्टा आणि संखसाठी उपविभाग झाले आहेत.यावर राज्याचे प्रधान सचिव आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत अधिकारी अभ्यास करून लवकर नवे तालुके आणि जिल्हे जाहीर करणार आहेत, असे खुद्द महसूलमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जत तालुक्यासह जिल्ह्यातल्या अन्य नव्या तालुक्यांची निर्मिती होण्याबाबत आशा निर्माण झाली आहे.आमदार विलासराव जगताप यांनी उमदीलाही अप्पर कार्यालय मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. यात तडजोड होऊन तालुक्याचे विभाजन होऊन लवकरच नव्या तालुक्याची निर्मिती होईल, असे बोलले जात आहे.महसूलमंत्र्यांची जवळीक : फायद्याचीमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची आणि तालुक्यातील भाजपच्या नेत्यांची जवळीक आहे. त्यामुळे जत तालुक्याला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी संखला अप्पर कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे संख तालुक्याची निर्मिती होण्याची आशा निर्माण झाली आहे.