शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

होलार समाज मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:24 IST

सांगली : होलार समाजाने आपल्या न्यायहक्कासाठी आता रस्त्यावर उतरणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक ...

सांगली : होलार समाजाने आपल्या न्यायहक्कासाठी आता रस्त्यावर उतरणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन होलार समाज समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष राजाराम ऐवळे यांनी व्यक्त केले.

समाजाचे उत्तरार्धकर्ते, समाजभूषण वि.दा. ऐवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित मेळाव्यात राजाराम ऐवळे बोलत होते. ते म्हणाले, समाजाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ३० लाखांवर लोकसंख्या आहे. परंतु जातीच्या चुकीच्या नोंदीमुळे शासन दरबारी निश्चित आकडा दिसून येत नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षात समाजाची दखल घेतली जात नाही म्हणून युवकांनी, महिलांनी मोठ्या संख्येने आक्रमकपणे रस्त्यावर उतरून शासनास समाजाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून नोंदविलेल्या चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी भाग पाडले पाहिजे. गेली कित्येक वर्षे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांच्यासोबत संघटना बैठका आयोजित करून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण शासनाकडून फक्त आश्वासनेच मिळतात; पण कृती घडताना दिसत नाही.

यावेळी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव सिद्राम जाबीर, जिल्हा अध्यक्ष आनंदराव ऐवळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते विजयराव केंगार, युवानेते दीपक हेगडे, तालुकाध्यक्ष गणेश भजनावळे, महादेवराव कांबळे, शुभम ऐवळे, अमितकुमार केंगार, दर्शन ऐवळे, महिला आघाडीच्या मंगल ऐवळे, रूपाली ऐवळे, छायाताई ऐवळे आदी उपस्थित होते.