शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

स्वातंत्र्य लढ्याचा चालता बोलता इतिहास हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

कडेगाव : इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांती करून ब्रिटिश सरकारला पळता भुई थोडी करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या ...

कडेगाव : इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांती करून ब्रिटिश सरकारला पळता भुई थोडी करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्या निधनाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा चालता बोलता इतिहास हरपला आहे. अशा शब्दात डॉ. विश्वजित कदम यांनी क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते.

विश्वजित कदम म्हणाले प्रतिसरकारची स्वातंत्र्यलढ्यातील तीव्रता तेवत ठेवण्यात हौसाताई पाटील यांचे मोठे योगदान होते. त्यांनी वडील क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांना साथ देत आंदोलने, मोर्चे काढून ब्रिटिश सरकारला जेरीस आणले.

हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी म्हणाले की हौसाताई पाटील या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील धगधगत्या मशाल होत्या. आजच्या काळात त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज आहे.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांनी हौसाताई पाटील यांना पद्मभूषण पुरस्कार मिळावा, अशी मागणी केली; तर श्रीमंत कोकाटे यांनी हाैसाताई पाटील यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा, अशा भावना व्यक्त केल्या.

ॲड. शौर्या पवार, हिंमतराव पवार, बाबा महिंद, सुभाष पवार, परशुराम माळी, माधवराव मोहिते, गुत्तासिंह बाबर, ॲड. दीपक लाड, मोहनराव यादव, दीपक रणदिवे, व्ही. वाय. पाटील, राजाराम गरुड, रावीदादा ढमढेरे, सुरेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, श्रीकांत लाड, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, संतोष गायधने, रमेश बांडे, विवेक गुरव यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी आमदार मोहनराव कदम, सयाजीराव देशमुख, तहसीलदार शैलजा पाटील, शांताराम कदम, हाैसाताई पाटील यांचे पुत्र प्रा. विलासराव पाटील ॲड. सुभाष पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय उपस्थित होते.