शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

इतिहासाचा मागोवा समाजासाठी महत्त्वाचा : भालचंद्र वग्याणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:46 IST

सांगली : पुस्तकांमधून विविध गोष्टींचे ज्ञान मिळविताना इतिहासाचाही मागोवा घेण्याची गरज आहे. त्यातील घटना, व्यक्ती, त्यांचे कार्य समजून घेऊन वाटचाल केली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी

ठळक मुद्देसांगलीत दक्षिण भारत जैन सभा व जैन महिला परिषदेच्या पहिल्या शाखेचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात

सांगली : पुस्तकांमधून विविध गोष्टींचे ज्ञान मिळविताना इतिहासाचाही मागोवा घेण्याची गरज आहे. त्यातील घटना, व्यक्ती, त्यांचे कार्य समजून घेऊन वाटचाल केली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी यांनी सांगलीतील कार्यक्रमात व्यक्त केले.

दक्षिण भारत जैन सभा व जैन महिला परिषद या पहिल्या शाखेच्या ११९ व्या वर्धापन दिनाचा सोहळा येथील शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये मंगळवारी सायंकाळी पार पडला. यावेळी व्यासपीठावर हस्तिनापूर येथील प. पू. पीठाधीश रवींद्रकीर्ती महास्वामीजी, रावसाहेब आ. पाटील, प्रा. डी. ए. पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, रावसाहेब जि. पाटील आदी उपस्थित होते.

वग्याणी म्हणाले की, सांगलीतील दक्षिण भारत जैन सभेने येथील ग्रंथालयाला ज्ञानमती माताजींचे नाव देऊन ज्ञानाचा प्रवास दर्शविला आहे. ज्यांच्याकडे माता असते, त्यांच्याकडे मतीही असते आणि मती असणारे ज्ञान प्राप्त करू शकतात. त्यामुळे या नावाला महत्त्व आहे. बऱ्याच लोकांना आपल्या पूर्वजांबद्दलही माहिती नसते. जिथे कुटुंबातील मागील पिढ्यांमधील लोकांची माहिती घेण्याबद्दल आपण उदासीन असतो, तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात किंवा त्यापूर्वी योगदान दिलेल्या लोकांप्रती माहिती घेण्यापासून आपण कोसो दूर असतो. त्यामुळे प्रत्येकाने इतिहासाचा मागोवा घ्यावा.

स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा विचार केला, तर प्रत्येकजण १९४७ आणि १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या उठावापर्यंतच पोहोचतो. प्रत्यक्षात स्वातंत्र्यलढ्याची इतिहासातील पहिली नोंद ही भगवान बाहुबली यांच्या माध्यमातून हजार वर्षांपूर्वी नोंदली गेली आहे. त्यामुळे संपूर्ण जगालाच त्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली आहे. प्रसुतीच्या वेदनेप्रमाणे लेखक झाल्याशिवाय लेखनासाठी आलेल्या वेदनासुद्धा कोणाला कळत नाहीत. त्यामुळे समाजाला दिशा देणाºया अशा लेखकांप्रती आपण आदरभाव व्यक्त केला पाहिजे.

आशीर्वचन देताना पीठाधीश रवींद्रकीर्ती महास्वामीजी म्हणाले की, कोणताही समाज महिलांशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे महिलांविषयी आदरभाव ठेवलाच पाहिजे. ज्ञानमती माताजींनी शिक्षण कमी होऊनही ग्रंथांची अफाट निर्मिती केली आहे. ते कार्य खूपच अलौकिक असे आहे. येथील वीर सेवा दल आणि वीर महिला मंडळ यांचे शिस्तबद्ध कार्य वाखाणण्याजोगे आहे. कोणत्याही महोत्सवातील नियोजनात हे दोन्ही दल आमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. मांगी-तुंगी येथे येथील संघटनेने गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करावे.स्वागत प्रा. राहुल चौगुले यांनी, प्रास्ताविक दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सागर चौगुले, सचिव मीना घोदे यांनी केले. प्रशांत पाटील-मजलेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. जयपाल चौगुले, सौ. अनिता पाटील यांनी केले.पुस्तकाचे प्रकाशन थाटातलेखक प्रा. डी. ए. पाटील यांच्या ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील जैन स्वातंत्र्यसेनानींचे योगदान’ या पुस्तकाचे तसेच प्रथमाचार्य शांतिसागरजी महाराज संक्षिप्त हिंदी परिचय पुस्तिका ‘गुरुगरिमा’ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या पुस्तकनिर्मितीची कथा लेखक पाटील यांनी यावेळी मांडली.

आरोग्याविषयी जागृती महत्त्वाची : मगदूममुंबईचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल मगदूम यावेळी म्हणाले की, समाजातील लोकांनी शिक्षण आणि आरोग्याविषयी जागरुक राहिले पाहिजे. कर्करोगाचे प्रमाण वाढत असताना त्याचे प्रमाण कमी व्हावे, याविषयी जागृती वाढावी म्हणून आम्ही शिबिरे घेत आहोत. यास प्रतिसादही चांगला मिळत आहे. भविष्यात सुदृढ समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी या चळवळीची मदत होईल.

टॅग्स :Sangliसांगलीhistoryइतिहास