शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाचा मागोवा समाजासाठी महत्त्वाचा : भालचंद्र वग्याणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:46 IST

सांगली : पुस्तकांमधून विविध गोष्टींचे ज्ञान मिळविताना इतिहासाचाही मागोवा घेण्याची गरज आहे. त्यातील घटना, व्यक्ती, त्यांचे कार्य समजून घेऊन वाटचाल केली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी

ठळक मुद्देसांगलीत दक्षिण भारत जैन सभा व जैन महिला परिषदेच्या पहिल्या शाखेचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात

सांगली : पुस्तकांमधून विविध गोष्टींचे ज्ञान मिळविताना इतिहासाचाही मागोवा घेण्याची गरज आहे. त्यातील घटना, व्यक्ती, त्यांचे कार्य समजून घेऊन वाटचाल केली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी यांनी सांगलीतील कार्यक्रमात व्यक्त केले.

दक्षिण भारत जैन सभा व जैन महिला परिषद या पहिल्या शाखेच्या ११९ व्या वर्धापन दिनाचा सोहळा येथील शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये मंगळवारी सायंकाळी पार पडला. यावेळी व्यासपीठावर हस्तिनापूर येथील प. पू. पीठाधीश रवींद्रकीर्ती महास्वामीजी, रावसाहेब आ. पाटील, प्रा. डी. ए. पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, रावसाहेब जि. पाटील आदी उपस्थित होते.

वग्याणी म्हणाले की, सांगलीतील दक्षिण भारत जैन सभेने येथील ग्रंथालयाला ज्ञानमती माताजींचे नाव देऊन ज्ञानाचा प्रवास दर्शविला आहे. ज्यांच्याकडे माता असते, त्यांच्याकडे मतीही असते आणि मती असणारे ज्ञान प्राप्त करू शकतात. त्यामुळे या नावाला महत्त्व आहे. बऱ्याच लोकांना आपल्या पूर्वजांबद्दलही माहिती नसते. जिथे कुटुंबातील मागील पिढ्यांमधील लोकांची माहिती घेण्याबद्दल आपण उदासीन असतो, तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात किंवा त्यापूर्वी योगदान दिलेल्या लोकांप्रती माहिती घेण्यापासून आपण कोसो दूर असतो. त्यामुळे प्रत्येकाने इतिहासाचा मागोवा घ्यावा.

स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा विचार केला, तर प्रत्येकजण १९४७ आणि १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या उठावापर्यंतच पोहोचतो. प्रत्यक्षात स्वातंत्र्यलढ्याची इतिहासातील पहिली नोंद ही भगवान बाहुबली यांच्या माध्यमातून हजार वर्षांपूर्वी नोंदली गेली आहे. त्यामुळे संपूर्ण जगालाच त्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली आहे. प्रसुतीच्या वेदनेप्रमाणे लेखक झाल्याशिवाय लेखनासाठी आलेल्या वेदनासुद्धा कोणाला कळत नाहीत. त्यामुळे समाजाला दिशा देणाºया अशा लेखकांप्रती आपण आदरभाव व्यक्त केला पाहिजे.

आशीर्वचन देताना पीठाधीश रवींद्रकीर्ती महास्वामीजी म्हणाले की, कोणताही समाज महिलांशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे महिलांविषयी आदरभाव ठेवलाच पाहिजे. ज्ञानमती माताजींनी शिक्षण कमी होऊनही ग्रंथांची अफाट निर्मिती केली आहे. ते कार्य खूपच अलौकिक असे आहे. येथील वीर सेवा दल आणि वीर महिला मंडळ यांचे शिस्तबद्ध कार्य वाखाणण्याजोगे आहे. कोणत्याही महोत्सवातील नियोजनात हे दोन्ही दल आमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. मांगी-तुंगी येथे येथील संघटनेने गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करावे.स्वागत प्रा. राहुल चौगुले यांनी, प्रास्ताविक दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सागर चौगुले, सचिव मीना घोदे यांनी केले. प्रशांत पाटील-मजलेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. जयपाल चौगुले, सौ. अनिता पाटील यांनी केले.पुस्तकाचे प्रकाशन थाटातलेखक प्रा. डी. ए. पाटील यांच्या ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील जैन स्वातंत्र्यसेनानींचे योगदान’ या पुस्तकाचे तसेच प्रथमाचार्य शांतिसागरजी महाराज संक्षिप्त हिंदी परिचय पुस्तिका ‘गुरुगरिमा’ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या पुस्तकनिर्मितीची कथा लेखक पाटील यांनी यावेळी मांडली.

आरोग्याविषयी जागृती महत्त्वाची : मगदूममुंबईचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल मगदूम यावेळी म्हणाले की, समाजातील लोकांनी शिक्षण आणि आरोग्याविषयी जागरुक राहिले पाहिजे. कर्करोगाचे प्रमाण वाढत असताना त्याचे प्रमाण कमी व्हावे, याविषयी जागृती वाढावी म्हणून आम्ही शिबिरे घेत आहोत. यास प्रतिसादही चांगला मिळत आहे. भविष्यात सुदृढ समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी या चळवळीची मदत होईल.

टॅग्स :Sangliसांगलीhistoryइतिहास