शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

अरे, वीज देता का कुणी वीज..?

By admin | Updated: January 18, 2016 23:38 IST

चार वर्षांपासून ग्राहक प्रतीक्षेत : जिल्ह्यात तेवीस हजार वीज जोडण्या रखडल्या--लोकमत विशेष

अशोक डोंबाळे -- सांगली विहीर आणि कूपनलिका खुदाईनंतर २०१२ पासून शेतकऱ्यांनी अनामत रक्कम भरून महावितरणकडे वीज जोडणीची मागणी केली आहे. परंतु चार वर्षात जिल्ह्यातील कृषिपंपांचे १३ हजार ५८४ आणि घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वापराचे १० हजार ७६९ ग्राहक प्रतीक्षेत आहेत. वीज जोडणीसाठी ते महावितरणकडे फेऱ्या मारून थकले आहेत. वीज जोडणीच्या मूलभूत सुविधांसाठी दोनशे कोटींची गरज असून, निधी उपलब्ध नसल्यामुळे जोडणी प्रलंबित असल्याची जुजबी उत्तरे मिळत आहेत.सुमारे दोन हजारावर शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडून पाच ते वीस हजारांची अनामत रक्कम भरून २०१२ मध्ये वीज जोडणीची मागणी केली आहे. २०१३ मध्ये १७२६, तर २०१४ मध्ये २६४६ आणि २०१५-१६ मध्ये ७२६० शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केले आहेत. मात्र वीज जोडणी अद्याप झालेली नाही. परिणामी त्यांच्या विहिरींचा वापर होत नसल्यामुळे त्या बुजू लागल्या आहेत. विहिरीत पाणी असूनही शेतकऱ्यांना पिके घेता आलेली नाहीत. कर्ज फिटण्याऐवजी विहीर खुदाईच्या कर्जाचा बोजा वाढला आहे. या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या संघटनाही गप्प आहेत. हीच परिस्थिती घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक वीज ग्राहकांची आहे. शासन म्हणते : ३१ मार्चपूर्वी सर्वांना कनेक्शन राज्य शासनाने एक परिपत्रक काढले असून, त्यामध्ये दि. ३१ मार्चपूर्वी सर्व २३ हजार ५८४ वीज ग्राहकांना वीज मिळाली पाहिजे, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात वीज जोडणीसाठी निधी नाही. शासनाने आता निधी दिला तरीही त्या कामाची निविदा काढून ठेकेदार निश्चित करण्यासाठीच किमान दीड महिना लागणार आहे. अद्याप शासनाकडून निधीच उपलब्ध नसेल, तर ३१ मार्च २०१६ पूर्वी सर्व ग्राहकांची वीज जोडणी कशी होणार?, असा प्रश्न आहे.निधी नव्हे, केवळ आश्वासनजिल्ह्यातील साडेतेवीस हजार वीज ग्राहकांची वीज जोडणी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या ऊर्जामंत्र्यांनी निधी देण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात निधी उपलब्ध झालाच नाही. ग्राहकांनी आमदार अनिल बाबर यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन बाबर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर मुंबईत महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घडवून आणली. त्यावेळी ऊर्जामंत्र्यांनी, दोनशे कोटी मंजूर केले असून, तातडीने शंभर कोटी खर्चाचा प्रस्ताव देण्याची अधिकाऱ्यांना सूचना दिली. महिन्यात निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महिना संपला तरी शासनाकडून एक रुपयाही मिळालेला नाही.वारंवार मागणी करूनही निधी नाही घरगुती, वाणिज्य, औद्योगिक १० हजार ७६९ वीज ग्राहकांना वीज जोडणी मिळालेली नाही. ग्राहकांना वीज जोडणी देण्यासाठी खांब, तारा आणि रोहित्रे आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोनशे कोटींच्या निधीची गरज आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शासनाकडे वारंवार मागणी करूनही तो उपलब्ध झाला नाही. त्यामुळे वीज जोडणी प्रलंबित असल्याचे अधिकारी सांगत आहेत.