शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वीर जवान, तुझे सलाम!

By admin | Updated: November 2, 2016 00:11 IST

दुधगावकरांची मानवंदना : रात्रीत उभारले फलक, गावभर उमटल्या रांगोळ्या

सचिन लाड ल्ल सांगली दुधगाव हे सांगलीपासून १५ किलोमीटरवरचे गाव. वारणा नदीकाठी वसलेल्या पंधरा हजार लोकवस्तीच्या दुधगावने गावचा सुपुत्र नितीन कोळी यांना गमावले, मात्र देशासाठी लढताना नितीन यांना वीरमरण आल्याचा गावाला अभिमान आहे. या वीर जवानाने गावाची मान उंचावल्याने त्यांना मानवंदना देताना ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवले. ऐन दिवाळीत तीन दिवसांचा दुखवटा पाळला. दोन दिवसात स्मशानभूमीपर्यंतच्या एक किलोमीटर रस्त्याचे मुरमीकरण केले. महिलांनी अंत्ययात्रेच्या मार्गवर रात्रभर रांगोळ्या काढल्या. सीमा सुरक्षा दलात केवळ आठ वर्षे सेवा झालेल्या नितीन कोळी यांना शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या सैनिकांशी झालेल्या चकमकीवेळी वीरमरण आले. अत्यंत गरीब परिस्थितीत नितीन यांनी शिक्षण घेतले. सैन्यात भरती होण्याची त्यांची जिद्द वडिलांनी पूर्ण केली. कुटुंबाचा आधार असलेला नितीन अचानक निघून गेल्याच्या बातमीवर त्यांच्या कुटुंबीयांना अजूनही विश्वास बसत नाही. वडील सुभाष कोळी व भाऊ उल्हास यांनाच नितीन शहीद झाल्याचे माहीत होते. आई सुमन व पत्नी संपदा यांना मात्र नितीन यांना गोळी लागल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे गावात दोन दिवस कोणीही नितीन यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावले नव्हते. गावचा सुपुत्र शहीद झाला. अंत्ययात्रेसाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि जिल्हाभरातून लोक येणार असल्याने शनिवारी ग्रामस्थांची बैठक झाली. त्यात नियोजन ठरले. पावसामुळे स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता खचला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी शनिवार आणि रविवारी दिवस-रात्र थांबून मुरुम टाकून रस्ता करून घेतला. सोमवारी सकाळी पार्थिव येणार असल्याने सर्वांनी रविवारची रात्र जागूनच काढली. महिलांनी वारणा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्यासह इतर रस्त्यांवर रांगोळ्या काढल्या. अंत्ययात्रेच्या मार्गावर फुलांची रांगोळी काढण्यात आली. रात्री बारानंतर रांगोळ्या काढण्यास सुरुवात झाली. हे काम काम पहाटे पूर्ण झाले. कर्मवीर भाऊराव पाटील चौकात दोन डझनभरश्रद्धांजलीपर फलक उभे करण्यात आले. अंत्ययात्रेच्या मार्गावरही फलक लावले गेले. गावात प्रवेश केल्यानंतर नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहणारा फलक नजरेस पडला. त्यासमोर मोठी रांगोळी काढण्यात आली होती. यामध्ये भारताचा नकाशा रेखाटला होता. पार्थिव सकाळी येण्यापूर्वीच गावात येणाऱ्या प्रमुख मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. तेथेच पार्किंगची व्यवस्था केली होती. महिलांनी नितीन कोळी यांच्या घरासमोर गर्दी केली होती. कर्मवीर चौकात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असल्याने सकाळी सहापासून ग्रामस्थांनी गर्दी केली होती. नितीन यांच्या घरी नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. कर्मवीर चौकात ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. पितृछत्र हरपले : मुले कावरी-बावरी खेळण्या-बागडण्याच्या वयातच देवराज (वय ४ वर्षे) व युवराज (२ वर्षे) यांच्यावरील पितृछत्र हरपले. आपले वडील सैन्यात आहेत, एवढेच त्यांना माहीत होते. मात्र ते शहीद झाले, याबद्दल ते अनभिज्ञ होते. पार्थिव घरी आल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश सुरू केला, त्यावेळी मुले कावरी-बावरी झाली होती. नातेवाईकांनी या दोन्ही चिमुरड्यांना जवळ घेतले. स्मशानभूमीतही युवराजला त्याची आई संपदा यांनी जवळ घेतले होते. एवढ्या लहान वयात पित्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेल्या देवराजला अंत्यसंस्कार म्हणजे काय, याची कल्पनाही नव्हती. चुलते उल्हास यांनी देवराजला आधार देत अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला. शिस्तबद्ध नियोजन ग्रामस्थांनी नितीन कोळी यांच्या अंत्यसंस्काराचे नियोजन शिस्तबद्धरित्या केले होते. स्मशानभूमीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना वार्तांकन करण्यासाठी तीन ट्रॉलींची सोय केली होती. उन्हामुळे कोणाला त्रास झाल्यास वैद्यकीय पथक तसेच रुग्णवाहिकेची सोय केली होती. ध्वनिक्षेपकावरून नियोजन सांगितले जात होते.