शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

By अशोक डोंबाळे | Updated: September 21, 2024 21:57 IST

उष्म्यात वाढ झाल्यानंतर जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला.

अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: मागील चार दिवसांपासून उष्म्यात वाढ झाल्यानंतर शनिवारी सांगलीसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वाळवा, शिराळा, पलूस, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील अनेक गावांत जोराच्या पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सांगली शहरात मुसळधार पाऊस झाला. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे आठवडा बाजारात विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. उष्म्यात वाढ झाल्यानंतर जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला.

जिल्ह्यात जुलै आणि ऑगष्टच्या सुरुवातीला मुसळधार बसरणारा पाऊस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून गायब आहे. गेल्या महिन्याभरापासून पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या कामांना गती आली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून उष्मा वाढला होता. ढगाळ वातावरणही राहिले, मात्र पावसाने हुलकावणी दिली होती. शनिवारी जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस झाला. वाळवा, शिराळा, पलूस, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यात चांगला पाऊस झाला. सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहा वाजल्यापासून जोराच्या पावसाला सुरुवात झाली.

शनिवारी आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेत गर्दी होती. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. सुमारे तासभर पाऊस सुरुच राहिला, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते.चौकट

महिनाभर परतीचा पाऊसराज्यात २१ सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू होईल तो ऑक्टोबरपर्यंत मुक्कामी राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. परतीचा पाऊस रब्बी हंगामास उपयुक्त ठरणार आहे. पुढील काही दिवस पावसाचा मुक्काम असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवस वादळी वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगली