शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

घनकचराप्रश्नी आज दिल्लीत सुनावणी

By admin | Updated: April 20, 2015 00:03 IST

कोल्हापूरच्या प्रकल्पाबाबत महापालिका फारशी उत्सुक नाही. त्यासंदर्भातही म्हणणे मांडले जाण्याची शक्यता आहे.

सांगली : घनकचऱ्याच्या प्रश्नावर सोमवारी महापालिकेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली जाणार आहे. पालिकेकडून आर्थिक स्थितीचा लेखाजोखाही सादर होईल. त्यानंतर न्यायालय किती रक्कम भरायची? याचा फैसला देणार आहे. या सुनावणीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. गेल्या पंधरा वर्षांत घनकचऱ्याकडे पालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्याचा मोठा फटका बसला आहे. जिल्हा सुधार समितीने घनकचरा प्रकल्पासाठी हरित न्यायालयात याचिका दाखल केली. हरित न्यायालयाने महापालिकेला ६० कोटी रुपये विभागीय आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश देताना, बरखास्तीचा इशाराही दिला होता. या निकालाने पालिका प्रशासन व नगरसेवक हादरले. महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण सर्वोच्च न्यायालयानेही स्थगितीस नकार देत, पैसे भरण्याचे नियोजन सादर करण्याचे आदेश दिले. आयुक्त अजिज कारचे, उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ व लेखापाल अशोक चौगुले हे तिघे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार असून, पालिका किती रक्कम भरणार, याचे नियोजन सादर करणार आहे. सध्या पालिकेची आर्थिक स्थिती पाहता, एकाचवेळी ६० अथवा ३० कोटी रुपये भरता येणार नाहीत, त्यासाठी हप्ते बांधून देण्याची मागणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ ते दहा कोटी रुपये भरण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. उर्वरित रकमेसाठी हप्ते घेतले जाणार आहेत. त्यातच विभागीय आयुक्तांनी कोल्हापूरच्या धर्तीवर घनकचरा प्रकल्प राबविण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूरच्या प्रकल्पाबाबत महापालिका फारशी उत्सुक नाही. त्यासंदर्भातही म्हणणे मांडले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)