शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क करगणी : बहुजनांचे प्रश्न लोकशाही मार्गाने सोडविण्यासाठी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

करगणी : बहुजनांचे प्रश्न लोकशाही मार्गाने सोडविण्यासाठी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय आटपाडीत झालेल्या ‘रासप’च्या मेळाव्यात घेण्यात आला.

आटपाडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी अजितकुमार पाटील, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष उमाजी चव्हाण, सांगली जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर आदी प्रमुख उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्ष ही एक चळवळ असून या चळवळीतून अनेक हिरे निर्माण झाले आहेत. ‘रासप’ हा विशिष्ट समाजाचा पक्ष नसून वंचित व उपेक्षित घटकांसह सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी काम करणार पक्ष आहे. राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आजपर्यंत सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आंदोलनेही केली आहेत.

यावेळी धनगर समाजासह अन्य समाजातील घटकांच्या न्याय हक्काबाबत लढण्यासाठी येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रत्येक बूथ निहाय बूथ कमिटीची स्थापना करून तळागाळातील लोकांपर्यंत रासपाची भूमिका पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांचा सत्कार करण्यात आला. माऊली सलगर, उमाजी चव्हाण, अजित पाटील, उमाजी चव्हाण, अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सचिन व्हनमाणे, सत्यजित गलांडे, समाधान चौगुले, सुहास चौगुले आदी उपस्थित होते.