शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानीही त्यांना नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST

सांगली : कोरोनाच्या महामारीत एकीकडे माणुसकीचे दर्शन घडत असताना काही घटनांनी समाजमन सुन्न होत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर अनेकांना ...

सांगली : कोरोनाच्या महामारीत एकीकडे माणुसकीचे दर्शन घडत असताना काही घटनांनी समाजमन सुन्न होत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर अनेकांना रक्ताच्या नात्यानीही नाकारल्याची उदाहरणे समोर येत आहे. अशा वेळी स्मशानभूमीतील कर्मचारी, शववाहिकाचालकांकडून अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली आहे. नात्यातील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी संपली की काय? असा प्रश्न पडणाऱ्या घटनाही घडत आहेत.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. गेली वर्षभर कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले असताना सख्खी नाती दुरावल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण, त्याच्या नातेवाइकांना रक्त्याच्या नात्यापलिकडील लोक मदतीचा हात देत आहेत, तर दुसरीकडे अनेकांच्या वाट्याला मात्र नात्याचे प्रेमही मिळत नाही. कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक स्मशानभूमीत गेलेले नाहीत. काही जणांनी अग्निविधीलाही नकार दिला. अशावेळी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचारी, शववाहिकेवरील चालकांनी अंत्यविधीचे सोपस्कर पार पाडले आहे. काही जणांनी तर रुग्णालयातून मृतदेह स्मशानभूमीकडे पाठवून घरी गेल्याचे समोर आले आहे. या घटनांनी समाजमन मात्र सुन्न झाले आहे.

चौकट

अंत्यविधीला परवानगी. मृताच्या नशिबी तेही नाही

महापालिकेने मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे. त्यासाठी ठेकेदारही नियुक्त केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अविरत हे काम सुरू आहे. अंत्यविधीसाठी नातेवाइकांना पीपीई किट घालून परवानगी दिली जाते. काही जण पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करतात. त्यानंतर ते पीपीई किट काढून जाळून टाकले जाते. तर अनेक जणांचे नातेवाईकच अंत्यसंस्कारासाठी येत नाहीत. काहींचे स्मशानभूमीत येतात; पण अंत्यसंस्काराला नकार देतात. मृताच्या नशिबी नात्यातील लोकांकडून अंत्यसंस्काराचे सोपस्कारही नाहीत.

चौकट

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत २२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर परजिल्हा, परराज्यातील ३२९ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका हद्दीत मृत झालेल्या कोविड रुग्णावर मिरजेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची मोफत व्यवस्था केली आहे.

चौकट

कोट

महिन्याकाठी आठ ते दहा मृतदेहांवर आम्हालाच अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. अनेक नातेवाईक तर रुग्णालयात मृतदेह सोडून गेले होते. काही वेळ नातेवाइकांची वाट पाहून अंत्यसंस्कार करतो. वाईट वाटते; पण आमचाही नाईलाज असतो. - पिंटू माने

चौकट

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक ज‌वळही येत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. अनेक जण स्मशानभूमीत येतात; पण अग्नी देण्यासाठी पुढे येत नाहीत. अशावेळी त्यांच्या परवानगीने आम्हीच अंत्यसंस्कार करतो. -

चौकट

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे झालेले मृत्यू : २२४२

महापालिकेकडून केलेले अंत्यविधी : २०००

रुग्णांवर महापालिकेकडून केलेले अंत्यसंस्कार : ९० टक्के