शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य ‘डासां’च्या हाती

By admin | Updated: November 14, 2014 23:23 IST

गांधी वसतिगृहातील स्थिती : जिल्हा परिषद पदाधिकारी आणि प्रशासनाचेही दुर्लक्ष

नरेंद्र रानडे - सांगली -जिल्हा प्रशासनाने डेंग्यूचा फैलाव होऊ नये यासाठी व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. परंतु जिल्हा परिषदेपासून काही अंतरावरच असणाऱ्या महात्मा गांधी शासकीय वसतिगृहात प्रशासन राबवित असलेल्या अस्वच्छता अभियानामुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेली झुडुपे, सांडपाण्याच्या निचऱ्याचा अभाव, परिसरातच फेकण्यात येणारा कचरा यामुळे वसतिगृहात प्रचंड प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. जिल्हा परिषदेपासून जवळच असणाऱ्या शासकीय वसतिगृहातील अस्वच्छतेकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले आहे. महात्मा गांधी वसतिगृहात सध्या १४३ विद्यार्थी निवासी आहेत. तेथे सुरक्षारक्षक असून नसल्यासारखाच आहे. यामुळे रस्त्यावर फिरणारी डुकरे, मोकाट कुत्री यांचा वसतिगृहाच्या आवारात मुक्त संचार आहे. आरोग्य चांगले राहावे यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत, यासाठी वसतिगृहाने क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. परंतु सध्या तेथे प्रचंड प्रमाणात झुडपे वाढलेली आहेत. त्यामध्येच परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार समाजकल्याण विभागाकडे पाठपुरावा करुनही स्वच्छता करण्याची केवळ आश्वासने देण्यात येत आहेत. डासांची उत्पत्ती होऊ न देण्यासाठी सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे. परंतु स्वच्छतागृहाच्या मागील बाजूस सांडपाणी साठले आहे. पाणी साठू नये यासाठी प्रशासनातर्फे अद्याप उपाययोजना नाहीत. डास निर्माण होऊ नयेत यासाठी साठलेल्या पाण्यावर रॉकेल टाकणे अत्यावश्यक आहे. सायंकाळनंतर परिसरात डासांचे साम्राज्य पसरत आहे. विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यास करण्यापेक्षा डासांपासून बचाव करण्याच्या उपाययोजना करण्यात जात आहे. डेंग्यूच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने वसतिगृहातील परिसर स्वच्छ करावा, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. विद्यार्थ्यांनीच राबविली स्वच्छता मोहीमवसतिगृह परिसरात स्वच्छता करावी यासाठी विद्यार्थ्यांनी सतत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु तेथील अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने डेंग्यूच्या वाढत्या फैलावामुळे धास्तावलेल्या विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबविली आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील खोल्यांशेजारी वाढलेली झुडपे काढून टाकली आहेत.वसतिगृह निरीक्षक गायबवसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून त्यांची कार्यवाही करण्यासाठी प्रशासन निरीक्षकाची नेमणूक करते. परंतु या वसतिगृहात कोणी निरीक्षकच नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. साहजिकच कोणतीही समस्या उद्भवली, तर त्यांना थेट जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागातच धाव घ्यावी लागते. भविष्यकाळात वसतिगृहात कायमस्वरूपी निरीक्षकाची नेमणूक करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.