शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आनंदाचा शिधा नाहीच, पाडव्याला खिशातील पैशानेच करा पुरणपोळी

By संतोष भिसे | Updated: March 18, 2023 16:37 IST

गरीब कुटुंबांना १०० रुपयात गोडतेल, रवा, चणा डाळ, साखर मिळणार आहे

सांगली : गुढी पाडव्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शासनाने आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली, पण तो प्रत्यक्षात पाडव्यानंतरच मिळणार आहे. शासनाने यासाठीच्या निविदा दोनच दिवसांपूर्वी निश्चित केल्या आहेत, त्यामुळे पाडव्याला स्वखर्चानेच पुरणपोळी करावी लागणार हे स्पष्ट झाले आहे.पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. गरीब कुटुंबांना १०० रुपयात गोडतेल, रवा, चणा डाळ, साखर मिळणार आहे. दिवाळीला घरोघरी आनंदाचा शिधा पोहोचल्याने आता पाडव्यासाठीही सर्वसामान्यांचे डोळे त्याकडे लागले आहेत. पण पाडवा अवघ्या तीन दिवसांवर आला, तरी शिध्याचा पत्ता नाही. दुकानात तर राहू देच, पण जिल्ह्यातही आलेला नाही. किंबहुना राज्यात कोठेच त्याचा पत्ता नाही. शासनाने घोषणा केली, तरी त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. त्यातच सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचेही विघ्न येऊन ठेपले. त्यामुळे शिधा लांबणार हे निश्चित झाले आहे. शासनाने शिध्यासाठीची निविदा प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी पूर्ण केली. ठेकेदार निश्चित झाल्यानंतर आता शिध्याचे पॅकिंग, कदाचित त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांची छपाई, तेथून जिल्हा गोदामांत पुरवठा अशी प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.  

गोदामात शिधा पोहोच झाल्यावर स्वस्त धान्य दुकानदारांना चलन भरण्याची सूचना दिली जाईल. या प्रक्रियेला आणखी किमान आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा पाडव्याला मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. पाडव्याचा गोडवा वाढवायचा असेल, तर स्वत:च्या खिशातून खर्च करुन पुरणपोळी करावी लागणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली