शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

गुंठेवारी विकासाचा अनुशेष वाढणार

By admin | Updated: November 8, 2015 23:40 IST

सत्ताधाऱ्यांत वाद : नागरिकांना सुविधा कधी मिळणार?; नियोजनशून्य कारभाराचा फटका

सांगली : गेली सोळा वर्षे महापालिका हद्दीत गुंठेवारी विकासाची केवळ चर्चाच होत आहे. पालिकेतील सत्ताधारी, विरोधी पक्षासह प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गुंठेवारीतील नागरिकांची नरकयातनेतून सुटका होऊ शकलेली नाही. त्यातच पुन्हा गुंठेवारी निधीवरून सत्ताधाऱ्यांत संघर्ष उभा ठाकल्याने विकासाचा अनुशेष वाढणार आहे. राज्य शासनाने २००० मध्ये गुंठेवारी नियमितीकरणाचा कायदा केला. या कायद्याचे प्रणेते म्हणून सांगलीचेच नाव घेतले जाते. अनेक महापालिकांत तर गुंठेवारी हा शब्दच माहीत नव्हता. कायदा झाल्याने किमान गुंठेवारी भागातील नागरिकांना न्याय मिळेल, असा विश्वास होता. पण सोळा वर्षांनंतर त्याचे परीक्षण करताना, अजूनही गुंठेवारीतील विकासाचा अनुशेष संपलेला दिसत नाही. या सर्व बाबींना केवळ महापालिकेला दोष देऊन चालणार नाही. त्याला नागरिकही तितकेच जबाबदार आहेत. गुंठेवारीतील हजारो भूखंड धारकांनी अद्यापही नियमितीकरणाचे प्रशमन व विकास शुल्क भरलेले नाही. आतापर्यंत नियमितीकरणाला वीसवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता एकवीसावी मुदतवाढ दिली आहे. शासनाकडून मध्यंतरी गुंठेवारीतील विकास कामांसाठी दहा कोटीचा निधी आला होता. तब्बल चार वर्षे हा निधी पडून होता. अखेर या निधीतून कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. रस्ते, गटारींसह नागरी सुविधांचीही कामे कमी दराने ठेकेदाराने घेतली. पण आता तीही मार्गी लागलेली नाहीत. पालिकेच्या अंदाजपत्रकातही गुंठेवारी विकासासाठी दीड कोटी निधीची तरतूद केली होती. त्यातील कामे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. प्रशमन व विकास शुल्क भरलेल्या नागरिकांना सुविधा न देताच इतर ठिकाणी निधी खर्च होत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली आहे; तर महापौर विवेक कांबळे यांनी या निधीतील कामे थांबविण्याचे आदेश दिले आहेत. या संघर्षावर लवकरच पडदा पडला नाही, तर विकासकामे खोळंबण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)गुंठेवारी समिती : असून नसल्यासारखी!गुंठेवारी भागात राहणाऱ्या नागरिकांना न्याय देण्यासाठी महापालिकेने गुंठेवारी समितीची स्थापना केली आहे. पण ही समितीच असून नसल्यासारखी आहे. या समितीला अपेक्षित कर्मचारी वर्ग दिलेला नाही. त्यातून समितीच्या बैठकाही होत नाहीत. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने किमान या समितीला मजबूत करण्याची आवश्यकता आहे. त्यातून काही प्रश्न सुटण्यास मदत होईल.