शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
3
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
4
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
5
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
6
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
7
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
8
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
9
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
10
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
11
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
12
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
13
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
14
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
15
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
16
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
17
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
18
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
19
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
20
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 

वाढत्या थंडीचा द्राक्षाला फटका

By admin | Updated: December 22, 2016 00:09 IST

जत तालुक्याचे चित्र : मण्यांची फूग संथ

गजानन पाटील ल्ल संखजत तालुक्यात १५ दिवसांपासून थंडीची लाट सुरू आहे. रात्री बोचरी थंडी, दिवसा गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. गारठ्यामुळे वाढीच्या स्थितीतील द्राक्षमण्यांची फूगही संथ असून, थंडीचा परिणाम द्राक्षमण्यांच्या वाढीवर होऊ लागला आहे. तालुक्यामध्ये ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिबक सिंचन, मडकी सिंचनाच्या साहाय्याने बागा लावल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. शरद, सोनाक्का, माणिक चमन, सुपर सोनाक्का, थॉमसन आदी जातींच्या बागा आहेत. विहिरीतील काळ्या दगडातील पाणी असल्याने सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे.उमदी, तिकोंडी, बिळूर, डफळापूर, रामपूर, संंख, अंकलगी, भिवर्गी, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द, कोंत्यावबोबलाद, करजगी, जालिहाळ बु. आदी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाऊस कमी झाल्याने द्राक्षबागा अडचणीत आल्या आहेत. छाटण्या झालेल्या नाहीत. टॅँकरने पाणी घालून उन्हाळ्यात कांड्या तयार केल्या आहेत. थोड्या प्रमाणात पडलेल्या पावसावर फळबागा जगविल्या आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये थंडी वाढू लागली आहे. रात्री १० अंशापर्यंत, तर दिवसा दुपारी १२ वाजताही २२ अंशापर्यंत तापमान असते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किमान १० व कमाल २२ अंश तापमान राहील, असा अंदाज आहे. त्याचा परिणाम द्राक्षावर होत आहे.हवामानाचा फटका : रोगांची भीतीसप्टेंबरमध्ये छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांतील घडांच्या मण्यांची वाढ सुरु झाली आहे. परंतु वाढत्या थंडीमुळे द्राक्षमण्यांच्या फुगवण क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे द्राक्षमणी जास्त फुगू शकत नाहीत. पण सध्या पाणी उतरुन तयार झालेल्या मालावर थंडीचा फारसा परिणाम होत नाही. मात्र उर्वरित बागांमध्ये थंडी व दाट धुके पडल्यास भुरीसारख्या रोगांचा शिरकाव पुन्हा होऊ शकतो, असे द्राक्षबाग तज्ज्ञांनी सांगितले. द्राक्ष मण्यांची वाढ करण्यासाठी एसओपी खताचा वापर शेतकरी करीत आहेत. बेदाण्यावर परिणाममण्यांची फुगवण कमी होणार असल्याने चांगला दर्जेदार प्रतीचा बेदाणा तयार होणार नाही. दुय्यम प्रतीचा बेदाणा तयार होणार आहे. याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसणार आहे.