शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

गटनेत्यांनी फेटाळला निष्क्रियतेचा आरोप

By admin | Updated: December 4, 2014 23:40 IST

महापालिका : मोदी लाटेमुळे पराभव झाल्याचे मत

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या पराभवाला मोदी लाटेसह तत्कालीन वातावरण कारणीभूत होते. त्याला महापालिकेचा कारभार जबाबदार नाही, असे स्पष्टोक्ती गटनेते किशोर जामदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पालिकेतील पदाधिकाऱ्यांवर होणारा निष्क्रियतेचा आरोपही फेटाळून लावला. गेल्या चार दिवसांपासून पालिकेच्या कारभारावर काँग्रेसमधून टीका होत होती. माजी मंत्री पतंगराव कदम यांनी शहरातील गॅस्ट्रोच्या पार्श्वभूमीवर पालिका बरखास्तीची मागणी केली, तर माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी पदाधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करीत पालिकेच्या कारभारामुळेच मदन पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याची टीका केली होती. याबाबत आज जामदार यांना विचारता ते म्हणाले की, गॅस्ट्रोबाबत पालिकेचे प्रशासन व पदाधिकारी एकत्र येऊन मुकाबला केला आहे. दिवस-रात्र परिश्रम घेऊन ही साथ आटोक्यात आणली. महापालिका बरखास्त करून गॅस्ट्रोचा प्रश्न सुटणार नाही, असा टोलाही लगाविला. पतंगराव कदम हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नाराजी वृत्तपत्रातूनच कळली. लवकरच त्यांची भेट घेऊ, असेही त्यांनी सांगितले. विधानसभेतील पराभवाबाबत ते म्हणाले की, मदन पाटील यांच्या पराभवाला पालिकेचा कारभार जबाबदार नाही. तसे पाहिले तर माझ्या हातात नायकवडी माझे सहकारीमाजी महापौर इद्रिस नायकवडी हे माझे सहकारी आहेत. दररोज त्यांची भेट होत असते. पण त्यांच्या अडचणी, प्रश्नांची आपल्याकडे माहिती नाही. कामकाजाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो, असे सांगत नायकवडींवर थेट टीका करण्याचे टाळले. नायकवडी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सध्या पतंगराव यांच्या विनंतीवरुन आम्ही माघार घेतली आहे. कारभार सुधारला नाही तर आम्ही पुन्हा संघर्ष समिती करू. कारभारच नाही. महापौर, उपमहापौर, स्थायी सभापतींच्या हाती कारभार असतो. गटनेते म्हणून केवळ आपण नेत्यांच्या आदेशाचे पालन होते की नाही, हे पहात असतो. विधानसभेवेळचे वातावरण व मोदी लाट यामुळेच काँग्रेसला सांगलीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)