शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

मैदान लोकसभेचे, वारे विधानसभेचे! पलूस-कडेगावचे चित्र : कदम-देशमुख यांच्या होमग्राऊंडवर चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:12 IST

सांगली लोकसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराची भिस्त कदम-देशमुख कुटुंबातील वजनदार नेत्यांच्या पलूस-कडेगाव मतदार संघातील कामगिरीवर राहणार आहे. या मतदारसंघात

प्रताप महाडिक ।कडेगाव : सांगली लोकसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराची भिस्त कदम-देशमुख कुटुंबातील वजनदार नेत्यांच्या पलूस-कडेगाव मतदार संघातील कामगिरीवर राहणार आहे. या मतदारसंघात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीचे वारेही वाहणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून अधिक जोर लावला जाणार आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपला तोडीसतोड उमेदवार म्हणून आ. डॉ. विश्वजित कदम यांनी निवडणूक लढवावी, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह होता; परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार देत पलूस-कडेगावमधून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्याचे समजते. भाजपकडून विद्यमान खा. संजय पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या नावांची चर्चा आहे.

दरम्यान, उमेदवारी कोणालाही मिळो, पलूस-कडेगाव मतदार संघात आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी कदम-देशमुख कुटुंबातील नेत्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे. कारण काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद आ. मोहनराव कदम यांच्याकडे, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे आहे. आ. विश्वजित कदम यांच्याकडे जिल्ह्यातील काँग्रेसची जबाबदारी तर आहेच, पण ते राज्यस्तरावर कॉँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत, तर भाजपचे संग्रामसिंह देशमुख हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. यामुळे या वजनदार नेत्यांच्या होमग्राऊंडवरील कामगिरीकडे त्यांच्या पक्षाच्या हायकमांडचे लक्ष राहणार आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत पलूस-कडेगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना २७ हजार ५१९ इतके मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. पतंगराव कदम यांनी २४ हजार ३४ इतके मताधिक्य घेऊन पलूस-कडेगावचा गड अबाधित ठेवला. लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी यांच्यासह आघाडीतील मित्र पक्षांची साथ काँग्रेसला मिळणार आहे. भाजपलाही शिवसेना आणि युतीतील मित्रपक्षांची साथ मिळणार आहे.

भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत यश मिळविले आणि पलूस व कडेगाव दोन्ही पंचयात समित्यांची सत्ता घेतली. दुसऱ्या बाजूला बहुतांशी ग्रामपंचायती तसेच पलूस नगरपालिका आणि कडेगाव नगरपंचायत ही सत्ता केंद्रे ताब्यात घेऊन काँग्रेसने ताकद दाखवली आहे.

तिसऱ्या शक्तीचे आघाडीला बळपलूस-कडेगाव मतदार संघात आजवर कदम विरुद्ध देशमुख-लाड असा संघर्ष झाला. परंतु आता वरिष्ठ स्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड यांच्या तिसऱ्या शक्तीचे बळही आघाडीच्या उमेदवाराला मिळणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली