ऐतवडे बुद्रुक : ग्रामीण भागातील महिला व पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता आहे. या गुणवत्तेस प्रोत्साहन देणे, मदत करणे महत्त्वाचे आहे, तरच ग्रामीण भागाचा आपोआप विकास होईल, असे प्रतिपादन शिवसेना नेते व माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील यांनी केले.
चिकुर्डे (ता. वाळवा) येथे विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल व यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल मारुती खोत, सैन्यदलामध्ये भरती झाल्याबद्दल सावित्री सीताराम पाटील हिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
अभिजित पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आहे. या गुणवत्तेस प्रोत्साहन व मदत करणे गरजेचे आहे. यांच्याबरोबरच इतर लोकही विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करावेत म्हणून आपण सदैव त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे.
यावेळी माजी सरपंच कृष्णात पवार, चिकुर्डे सेवा सोसायटीचे अध्यक्ष केरू आबा पाटील, वारणा बँकेचे संचालक श्रीनिवास डोईजड, बाबासो खोत, शामराव पाटील, पोलीस पाटील सुधीर कांबळे, दगडू पाटील, शामराव पाटील, आदी उपस्थित होते.