शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

थोर स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 23:49 IST

थोर स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्कपाचगणी : सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भिकू दाजी भिलारे ऊर्फ भि. दा. भिलारे गुरुजी यांचे बुधवारी पहाटे तीन वाजता मुुंबई येथे निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावी दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पाच मुली, सुना, पुतणे, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.२६ नोव्हेंबर १९१९ रोजी भिलार येथील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भि. दा. भिलारे गुरुजी यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यातूनच ते स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भूमिगत चळवळीकडे ओढले गेले.गांधीजींनी देशातील तरुण वर्गाला स्वातंत्र चळवळीमध्ये उडी घेण्याचे आवाहन केल्यानंतर भिलारे गुरुजींनी स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. थोर नेत्यांच्या सहवासामुळे गुरुजींना सहकार शिक्षण आणि समाजकारण या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली.त्यांनी महाबळेश्वर, वाई व जावळी तालुक्यांतील ९३ गावांचा ग्रामोन्नती संघ स्थापन करून अनिष्ठ रुढी, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य त्यांनी केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत गुरुजींचा सिंहाचा वाटा होता. १९६२ ते १९७२ या कालावधीत ते जावळीचे आमदार होते. १९७८ ते १९८० या कालावधीत त्यांनी विधानपरिषदेचे सदस्यपद भूषविले. महाराष्ट्र राज्य प्रांतिक काँग्रेस कमिटीचे ते ४० वर्षे सदस्य होते. अलीकडच्या काळातही अनेक आमदार, खासदार हे भिलारे गुरुजींच्या मार्गदर्शन घेऊनच आपले कामकाज करीत असत. भिलारची माती पोरकी...भिलारची माती आज या गुरुजींच्या जाण्यामुळे पोरकी झाली आहे. भिलारे गुरुजींचे सर्व राजकीय लोकांशी सलोख्याचे संबंध होते. पाचगणी, महाबळेश्वरात येणारी प्रत्येक राजकीय व्यक्ती भिलारमध्ये येऊन भिलारे गुरुजींना न भेटता कधीच जात नसत.गांधीजींच्या हत्येचा कट उधळला१९४४ मध्ये महात्मा गांधी पाचगणीत आले असताना प्रार्थनेच्या वेळी नथुराम गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला हल्ला परतविण्यात भिलारे गुरुजी आघाडीवर होते. हल्ल्यासाठी पुढे आलेल्या व्यक्तीच्या हातातील सुरा हिसकावून घेतला व गांधीजींचा पाचगणीत होणारा हत्येचा कट भिलारे गुरुजींनी उधळवून लावला होता. महात्मा गांधी यांच्या हस्ते गुरुजींचा सत्कारगुरुजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्याकरिता महात्मा गांधी हे महाबळेश्वर येथे आले व त्यांनी गुरुजींचा गौरव केला होता.