शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

वाळवा तालुक्यातील कोरोनाचा आलेख उतरतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा आलेख उतरत असल्याचे आशादायी चित्र आहे.फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत ११७ दिवसात ग्रामीण ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा आलेख उतरत असल्याचे आशादायी चित्र आहे.फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत ११७ दिवसात ग्रामीण भागात ५९५३ तर इस्लामपूर १६६७ आणि आष्टा येथे ४८४ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणचा मृत्यूदर हा २.७२ तर शहरी भागात हेच प्रमाण २.८२ टक्के इतके राहिले आहे.

पहिल्या लाटेच्या तुलनेत तालुक्यातील कोरोना संसर्गाची वाढती स्थिती आता हळूहळू खाली येत आहे.गेल्यावेळी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात उच्चांक झाला तो यावेळी १५ एप्रिल ते १५ मे या काळात पुन्हा अनुभवास आला.मात्र आता संसर्गाची व्याप्ती कमी होत असल्याचे समोर येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

या दुसऱ्या लाटेत येलूर आणि परिसरातील ८ गावांमध्ये ३८९ कोरोना बाधीत रुग्ण सापडले.तर १९ जणांचा मृत्यू झाला. हा मृत्यूदर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ४.८८ टक्के इतका राहिला आहे. त्याखालोखाल कासेगाव परिसरातील ६ गावात ४५२ बाधित रुग्ण असून त्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. इथे ३.५३ इतक्या मृत्यूदराची नोंद झाली. येडेमच्छिद्र आणि बाजूच्या १० गावात ३८१ रुग्ण होते. तर १३ जण दगावले. हा मृत्यूदर ३.४१ असा आहे. पेठ परिसरातील ११ गावांमध्ये ६२३ रुग्ण आणि २० जणांचा मृत्यू झाला. तेथे हे प्रमाण ३.२१ इतके आहे.

कामेरी आणि परिसरातील ६ गावांमध्ये ६३८ रुग्ण होते आणि ८ रुग्ण दगावले. या ठिकाणी सर्वात कमी मृत्यूदराची नोंद झाली. येथे हे प्रमाण १.२५ इतके राहिले. त्यानंतर नेर्ले आणि लगतच्या ८ गावात ५२७ रुग्ण होते. त्यातील ९ जण दगावले. येथे मृत्यूचे प्रमाण हे १.७० असे राहिले. कुरळप आणि तेथील १४ गावात रुग्णसंख्या ६७५ होती तर २० जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी २.९६ इतका मृत्यूदर आहे. वाळवा आणि परिसरातील ६ गावांमध्ये ६१५ रुग्ण होते. त्यातील १७ रुग्ण दगावले. येथे २.७६ इतका मृत्यूदर आहे.

बोरगाव आणि त्याखालील ९ गावात ७५१ बाधित रुग्ण होते. तर २० जणांचा मृत्यू झाला. या परिसराचा मृत्यूदर हा २.६६ टक्के राहिला. बावची परिसरातील ७ गावांमध्ये ४७४ रुग्ण आणि ११ जणांचा मृत्यू यामध्ये हे प्रमाण २.३२ इतके होते. बागणी आणि लगतच्या ९ गावातून ४२८ रुग्णांची नोंद झाली.तर ९ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी २.१० टक्के इतका मृत्यूदर राहिला.