शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा तालुक्यातील कोरोनाचा आलेख उतरतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा आलेख उतरत असल्याचे आशादायी चित्र आहे.फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत ११७ दिवसात ग्रामीण ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा आलेख उतरत असल्याचे आशादायी चित्र आहे.फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत ११७ दिवसात ग्रामीण भागात ५९५३ तर इस्लामपूर १६६७ आणि आष्टा येथे ४८४ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणचा मृत्यूदर हा २.७२ तर शहरी भागात हेच प्रमाण २.८२ टक्के इतके राहिले आहे.

पहिल्या लाटेच्या तुलनेत तालुक्यातील कोरोना संसर्गाची वाढती स्थिती आता हळूहळू खाली येत आहे.गेल्यावेळी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात उच्चांक झाला तो यावेळी १५ एप्रिल ते १५ मे या काळात पुन्हा अनुभवास आला.मात्र आता संसर्गाची व्याप्ती कमी होत असल्याचे समोर येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

या दुसऱ्या लाटेत येलूर आणि परिसरातील ८ गावांमध्ये ३८९ कोरोना बाधीत रुग्ण सापडले.तर १९ जणांचा मृत्यू झाला. हा मृत्यूदर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ४.८८ टक्के इतका राहिला आहे. त्याखालोखाल कासेगाव परिसरातील ६ गावात ४५२ बाधित रुग्ण असून त्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. इथे ३.५३ इतक्या मृत्यूदराची नोंद झाली. येडेमच्छिद्र आणि बाजूच्या १० गावात ३८१ रुग्ण होते. तर १३ जण दगावले. हा मृत्यूदर ३.४१ असा आहे. पेठ परिसरातील ११ गावांमध्ये ६२३ रुग्ण आणि २० जणांचा मृत्यू झाला. तेथे हे प्रमाण ३.२१ इतके आहे.

कामेरी आणि परिसरातील ६ गावांमध्ये ६३८ रुग्ण होते आणि ८ रुग्ण दगावले. या ठिकाणी सर्वात कमी मृत्यूदराची नोंद झाली. येथे हे प्रमाण १.२५ इतके राहिले. त्यानंतर नेर्ले आणि लगतच्या ८ गावात ५२७ रुग्ण होते. त्यातील ९ जण दगावले. येथे मृत्यूचे प्रमाण हे १.७० असे राहिले. कुरळप आणि तेथील १४ गावात रुग्णसंख्या ६७५ होती तर २० जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी २.९६ इतका मृत्यूदर आहे. वाळवा आणि परिसरातील ६ गावांमध्ये ६१५ रुग्ण होते. त्यातील १७ रुग्ण दगावले. येथे २.७६ इतका मृत्यूदर आहे.

बोरगाव आणि त्याखालील ९ गावात ७५१ बाधित रुग्ण होते. तर २० जणांचा मृत्यू झाला. या परिसराचा मृत्यूदर हा २.६६ टक्के राहिला. बावची परिसरातील ७ गावांमध्ये ४७४ रुग्ण आणि ११ जणांचा मृत्यू यामध्ये हे प्रमाण २.३२ इतके होते. बागणी आणि लगतच्या ९ गावातून ४२८ रुग्णांची नोंद झाली.तर ९ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी २.१० टक्के इतका मृत्यूदर राहिला.