शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

वाळवा तालुक्यातील कोरोनाचा आलेख उतरतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा आलेख उतरत असल्याचे आशादायी चित्र आहे.फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत ११७ दिवसात ग्रामीण ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा आलेख उतरत असल्याचे आशादायी चित्र आहे.फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत ११७ दिवसात ग्रामीण भागात ५९५३ तर इस्लामपूर १६६७ आणि आष्टा येथे ४८४ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणचा मृत्यूदर हा २.७२ तर शहरी भागात हेच प्रमाण २.८२ टक्के इतके राहिले आहे.

पहिल्या लाटेच्या तुलनेत तालुक्यातील कोरोना संसर्गाची वाढती स्थिती आता हळूहळू खाली येत आहे.गेल्यावेळी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात उच्चांक झाला तो यावेळी १५ एप्रिल ते १५ मे या काळात पुन्हा अनुभवास आला.मात्र आता संसर्गाची व्याप्ती कमी होत असल्याचे समोर येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

या दुसऱ्या लाटेत येलूर आणि परिसरातील ८ गावांमध्ये ३८९ कोरोना बाधीत रुग्ण सापडले.तर १९ जणांचा मृत्यू झाला. हा मृत्यूदर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ४.८८ टक्के इतका राहिला आहे. त्याखालोखाल कासेगाव परिसरातील ६ गावात ४५२ बाधित रुग्ण असून त्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. इथे ३.५३ इतक्या मृत्यूदराची नोंद झाली. येडेमच्छिद्र आणि बाजूच्या १० गावात ३८१ रुग्ण होते. तर १३ जण दगावले. हा मृत्यूदर ३.४१ असा आहे. पेठ परिसरातील ११ गावांमध्ये ६२३ रुग्ण आणि २० जणांचा मृत्यू झाला. तेथे हे प्रमाण ३.२१ इतके आहे.

कामेरी आणि परिसरातील ६ गावांमध्ये ६३८ रुग्ण होते आणि ८ रुग्ण दगावले. या ठिकाणी सर्वात कमी मृत्यूदराची नोंद झाली. येथे हे प्रमाण १.२५ इतके राहिले. त्यानंतर नेर्ले आणि लगतच्या ८ गावात ५२७ रुग्ण होते. त्यातील ९ जण दगावले. येथे मृत्यूचे प्रमाण हे १.७० असे राहिले. कुरळप आणि तेथील १४ गावात रुग्णसंख्या ६७५ होती तर २० जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी २.९६ इतका मृत्यूदर आहे. वाळवा आणि परिसरातील ६ गावांमध्ये ६१५ रुग्ण होते. त्यातील १७ रुग्ण दगावले. येथे २.७६ इतका मृत्यूदर आहे.

बोरगाव आणि त्याखालील ९ गावात ७५१ बाधित रुग्ण होते. तर २० जणांचा मृत्यू झाला. या परिसराचा मृत्यूदर हा २.६६ टक्के राहिला. बावची परिसरातील ७ गावांमध्ये ४७४ रुग्ण आणि ११ जणांचा मृत्यू यामध्ये हे प्रमाण २.३२ इतके होते. बागणी आणि लगतच्या ९ गावातून ४२८ रुग्णांची नोंद झाली.तर ९ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी २.१० टक्के इतका मृत्यूदर राहिला.