शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

तासगावातील शेतकऱ्यांच्या अनुदानाला कासवगती

By admin | Updated: March 17, 2016 00:11 IST

तालुक्यातील स्थिती : अनुदान वर्ग करण्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विलंब

 दत्ता पाटील -- तासगाव  --खरीप हंगाम वाया गेल्यामुळे शासनाकडून कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तासगाव तालुक्यासाठी १८ कोटी ३३ लाख ४१ हजार ४०५ रुपयांचे अनुदान प्रशासनाकडून जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र मार्चअखेरची कामे, शेतकऱ्यांच्या याद्यांची तपासणी, रकमांची जुळवाजुळव अशा तांत्रिक गोष्टीमुळे अनुदान गोगलगाईच्या गतीने पुढे सरकत आहे. शासनाचे अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी होत आहे.२०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचा खरीप हंगाम वाया गेला होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्रासाठी गुंठ्याला ६८ रुपयांप्रमाणे हेक्टरी ६ हजार ८०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, वाळवा या आठ तालुक्यांसाठी पहिल्या टप्प्यात ६९ कोटी ९१ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी तासगाव तालुक्याला १८ कोटी ३३ लाख ४१ हजार ४०५ रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. प्रशासनाकडून लाभार्थी शेतकऱ्यांचे क्षेत्र निश्चित करुन तासगाव तालुक्यातील ६१ हजार १४५ शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग करण्यासाठी ५ मार्चला जिल्हा बँककडे वर्ग करण्यात आले होते. मात्र अद्याप बँकेकडून हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाही. तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळाल्यास, शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे. मात्र अनुदान वर्ग करण्यास वेळ होत असल्याचे दिसून येत आहे. खरिपाच्या अनुदानाबाबत शेतकऱ्यांनी बँकेत चौकशी केल्यास, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनुदान खात्यावर जमा होईल, असे बँक अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. जिल्हा बँक ताब्यात, तरीही राष्ट्रवादीचे निवेदन बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी तासगाव बंद ठेवण्यात आले होते. त्यामध्ये खरीप हंगामासाठी शासनाकडून आलेली भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करावी, या मागणीचाही समावेश आहे. मात्र प्रशासनाकडून जिल्हा बँकेच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले असून, बँकेकडूनच अनुदान अद्याप मिळालेले नाही. तरीही राष्ट्रवादीनेच याबाबत निवेदन दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनुदानावर एक नजर... तासगाव तालुक्यात कोरडवाहू शेतकरी लाभार्थ्यांची संख्या ६१ हजार १४५ इतकी आहे. खरीप अनुदानासाठी प्रशासनाकडून ३२ कोटी ८० लाख २८ हजार ३३० रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात शासनाकडून १८ कोटी ३३ लाख ४१ हजार ४०५ रुपये प्राप्त झाले. मिळालेला निधी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना मंजूर अनुदानाच्या ६० टक्के इतका वर्ग करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात ५ कोटी ७६ लाख रुपयांचे अनुदान प्रशासनाकडे प्राप्त झाले असून, लवकरच १७ टक्क्यांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार आहे.तासगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या पूर्व भागात भीषण दुष्काळ आहे. पावसाअभावी शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान तातडीने मिळाले, तर दिलासा मिळणार आहे. मात्र प्रशासनाकडून अनुदान वर्ग करूनही बँकेकडून स्वार्थी हेतूने टाळाटाळ केली जात आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे.- महेश खराडे, प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना.