शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

दादा घराणे विधानसभेच्या रिंगणाबाहेर - : चार महिन्यांत दुसऱ्यांदा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 23:03 IST

विधानसभा मतदारसंघाचे वसंतदादा घराण्याशी अतुट नाते राहिले आहे. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील या मतदारसंघातून विजयी झाले, तेव्हापासून हा मतदारसंघ दादा घराण्याचा बालेकिल्ला बनला. १९६७ मध्ये पहिल्यांदा दादा घराण्याबाहेरील उमेदवार काँग्रेसने दिला.

ठळक मुद्देयापूर्वी चारवेळा दादा घराण्याबाहेरील उमेदवारांना संधी

शीतल पाटील ।सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघावर नेहमीच वसंतदादा घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. वसंतदादांच्या हयातीत त्यांच्याच विचाराने दोनदा घराण्याबाहेरील उमेदवार देण्यात आला होता, पण त्यांच्या निधनानंतरही काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सातत्याने या घराण्याचा मान राखला. पण गेल्या काही वर्षांपासून दादा घराण्याला उमेदवारीसाठी झगडावे लागत आहे. यंदा तर लोकसभा निवडणुकीवेळीही दादांचे नातू विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. आता विधानसभेलाही दादा घराण्याबाहेरील उमेदवार कॉँग्रेसने दिला आहे.

विधानसभा मतदारसंघाचे वसंतदादा घराण्याशी अतुट नाते राहिले आहे. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील या मतदारसंघातून विजयी झाले, तेव्हापासून हा मतदारसंघ दादा घराण्याचा बालेकिल्ला बनला. १९६७ मध्ये पहिल्यांदा दादा घराण्याबाहेरील उमेदवार काँग्रेसने दिला. पण तोही वसंतदादांच्या आदेशानेच. तेव्हा आप्पासाहेब बिरनाळे काँग्रेसचे उमेदवार होते.त्यांनी अपक्ष केशवराव चौगुले यांचा पराभव केला. १९७२ मध्ये प्राचार्य पी. बी. पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. तेही विजयी झाले. १९७८ मध्ये पुन्हा वसंतदादांना उमेदवारी मिळाली. १९८० मध्ये शालिनीताई पाटील, १९८५ मध्ये पुन्हा वसंतदादा पाटील यांनी सांगली मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.

१९८६ च्या पोटनिवडणुकीत मात्र वसंतदादा घराण्याच्या वर्चस्वाला पहिल्यांदा शह बसला. या निवडणुकीत संभाजी पवार यांनी विष्णुअण्णा पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर १९९० मध्ये पुन्हा पवार-पाटील यांच्यात लढत झाली. तेव्हाही पवार विजयी झाले. १९९५ मध्ये काँग्रेसने विष्णुअण्णांच्या जागी वसंतदादांचे चिरंजीव प्रकाशबापू पाटील यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत मदन पाटील यांनी बंड केले. त्यामुळे दादा घराण्यातील फूट अधोरेखित झाली. संभाजी पवार यांनी सलग तिसऱ्यांदा वसंतदादा घराण्याचा पराभव करीत हॅट्ट्रिक केली. १९९९ मध्ये मात्र काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली.

प्रकाशबापू पाटील हे काँग्रेससोबत राहिले, तर विष्णुअण्णा, मदन पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.या निवडणुकीत काँग्रेसने प्रकाशबापूंना लोकसभेसाठी, तर दिनकर पाटील यांना सांगली विधानसभेसाठी उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात मदन पाटील व संभाजी पवार एकत्र आले, पण या निवडणुकीत दिनकर पाटील यांनी विजय प्राप्त करीत पुन्हा काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित केले. वसंतदादांच्यानंतर तब्बल १३ वर्षांनी सांगली मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे आला.

२००४ च्या निवडणुकीत काँग्रेसने दिनकर पाटील यांनाच उमेदवारी दिली. त्यावेळी वसंतदादांचे नातू मदन पाटील यांनी बंडखोरी केली. दिनकर पाटील, मदन पाटील व संभाजी पवार अशी तिरंगी लढत झाली. यात मदन पाटील यांनी बाजी मारली. वसंतदादांनंतर मदन पाटील यांच्यारूपाने घराण्याला सांगलीत पहिल्यांदाच यश मिळाले. त्यानंतर २००९ व २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने मदन पाटील यांना उमेदवारी दिली. पण या दोन्ही निवडणुकीत भाजपचे संभाजी पवार व सुधीर गाडगीळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

लोकसभेनंतर : आता विधानसभेत...२०१९ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून वसंतदादा घराण्याच्या स्नुषा व मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती. पण त्यांना डावलून काँग्रेसने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे वसंतदादा घराणे पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणाबाहेर झाले आहे. लोकसभेवेळीही वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारीसाठी झगडावे लागले होते. काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असताना, ऐनवेळी तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आला. शेवटी विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. चार महिन्यांच्या अंतरात काँग्रेसने वसंतदादा घराण्याला दुसऱ्यांदा धक्का दिला आहे.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSangliसांगलीVasantdada Patilवसंतदादा पाटील