शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर, परंतु आझाद मैदान सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील ठाम
3
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
4
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
5
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
6
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
7
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
8
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
9
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
10
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
11
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
12
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
13
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
14
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
15
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
16
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
17
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
18
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
19
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
20
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'

राज्यातील महाआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST

सांगली : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपचे सरकार ...

सांगली : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपचे सरकार येण्यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि माझे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत दिली. सध्याचे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असेही ते म्हणाले.

पत्रकारांना त्यांनी सांगितले की, मुंबईत उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी केली गेली. गाडीमालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. राज्यात दलितांवर अत्याचार वाढताहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. राज्य सेवेच्या पूर्वपरीक्षा झाल्या पाहिजेत, त्या आता पुढे ढकलू नयेत. राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. आठ जिल्ह्यांत गंभीर स्थिती आहे. सरकारने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. लोकांनीही मास्कचा वापर करावा.

आठवले म्हणाले की, नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. राज्यातील परिस्थिती बिघडत राहिली, तर त्याचा विचार करायला हरकत नाही. मात्र, राष्ट्रपती राजवट लागू नये, अशी आमची इच्छा आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी ठाकरे सरकारने लक्ष द्यावे. मराठा आरक्षणासाठी आम्ही सहमत आहोत. सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक निर्णय येईल, अशी अपेक्षा आहे. आरक्षणासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मागणी केली आहे.