शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील महाआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST

सांगली : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपचे सरकार ...

सांगली : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपचे सरकार येण्यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि माझे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत दिली. सध्याचे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असेही ते म्हणाले.

पत्रकारांना त्यांनी सांगितले की, मुंबईत उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी केली गेली. गाडीमालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. राज्यात दलितांवर अत्याचार वाढताहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. राज्य सेवेच्या पूर्वपरीक्षा झाल्या पाहिजेत, त्या आता पुढे ढकलू नयेत. राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. आठ जिल्ह्यांत गंभीर स्थिती आहे. सरकारने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. लोकांनीही मास्कचा वापर करावा.

आठवले म्हणाले की, नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. राज्यातील परिस्थिती बिघडत राहिली, तर त्याचा विचार करायला हरकत नाही. मात्र, राष्ट्रपती राजवट लागू नये, अशी आमची इच्छा आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी ठाकरे सरकारने लक्ष द्यावे. मराठा आरक्षणासाठी आम्ही सहमत आहोत. सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक निर्णय येईल, अशी अपेक्षा आहे. आरक्षणासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मागणी केली आहे.