शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सरकार म्हणते निधी दिला, अधिकारी म्हणतात, कल्पना नाही...मिरज-पेठ रस्त्याच्या निधीचा गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 22:59 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राष्टÑीय व राज्य महामार्गांच्या निधीचा पाऊस सध्या जिल्ह्याला चिंब भिजवित असल्याचे ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राष्टÑीय व राज्य महामार्गांच्या निधीचा पाऊस सध्या जिल्ह्याला चिंब भिजवित असल्याचे चित्र भाजपने निर्माण केले आहे. मात्र, निधीचा भासही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बाब समोर आली आहे. मिरज-सांगली-पेठ राष्टÑीय महामार्गासाठी तब्बल १२०० कोटी रुपये मंजूर झाल्याची जाहिरात शासनाने प्रसिद्ध केली. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर या निधीबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील महामार्गांसाठी मंजूर झालेल्या ७ हजार ११४ कोटी रुपयांच्या निधीबाबतची जाहिरात शासनाने प्रसिद्ध केली. जिल्ह्यातील अशा रस्त्यांच्या यादीत मिरज-सांगली-पेठ असा राष्टÑीय महामार्ग क्र. १६६ एच समाविष्ट केला आहे. ६० किलोमीटरच्या या रस्त्यासाठी १२०० कोटी रुपये मंजूर झाल्याचे स्पष्टपणे त्यात नमूद करण्यात आले आहे. वास्तविक या संपूर्ण महामार्गाचा विचार केला तर केवळ सांगली-पेठ नाक्यापर्यंतचा रस्ता सध्या राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाला आहे. मिरज ते सांगली हा तुकडा राष्टÑीय नव्हे, तर राज्य महामार्ग म्हणून गणला जातो. मिरज ते सांगली हा भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या, तर सांगली-पेठ हा भाग राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येत आहे. अद्याप राष्टÑीय महामार्गात हे दोन्ही मार्ग एकत्रित आलेच नसताना, या संपूर्ण मार्गासाठी निधी मंजूर झालाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.बाराशे कोटी रुपये मंजूर झाल्याचे प्रसिद्ध झाले असले तरी, तसा कोणताही आराखडा शासनाकडे अद्याप सादर झालेला नाही. इतक्या मोठ्या निधीच्या मंजुरीचे पत्रही कोणत्याही शासकीय कार्यालयास प्राप्त झाले नाही. तरीही गेल्या काही दिवसांपासून या निधीच्या मंजुरीचे गोडवे गायले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर बाराशे कोटी रुपयांच्या मंजुरीचे पत्र आले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निधीचा गोलमाल समोर आला आहे. याशिवाय चौपदरीकरणाचे हे काम करताना मिरज ते सांगली आणि सांगली ते पेठ असा टप्पा गृहीत धरला आहे. मिरजेहून आलेला चारपदरी रस्ता सांगलीच्या राम मंदिरपर्यंत थांबतो. तिथून चौपदरी नव्हे, तर दुपदरी करण्याची कोणतीही संधी दिसत नाही. दुसºया पर्यायी मार्गाचा विचार केला तर बायपासपर्यंत जाणारे रस्तेही अरुंद व अडचणीचे आहेत. या रस्त्याचा आराखडा किंवा चर्चासुद्धा कधी झालेली नाही. राम मंदिर ते सांगलीवाडीपर्यंतचे किंवा अन्य मार्गाने बायपास रस्त्यापर्यंचे चौपदरीकरण कुठून करणार, याचीही कोणाला कल्पना नाही. त्यामुळे हा एकप्रकारचा शासकीय गोंधळ आहे.वास्तविक आजवर महामार्गांच्या निधी व कामाच्या माध्यमातून येथील जनतेचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. सांगली-पेठ रस्त्याबद्दल नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी आंदोलने केल्यानंतर सत्ताधाºयांना जाग आली आणि तातडीने हा रस्ता राष्टÑीय महामार्गात समाविष्ट केला. त्याचे कामही सुरू केले. तरीही गेल्या दीड वर्षापासून हे काम अर्धवट स्थितीत आहे. तुंगपर्यंतचा रस्ता अत्यंत यातनादायी बनला आहे. वर्षानुवर्षे निधी मंजूर होऊनही तो व्यवस्थित खर्च झालेला नाही. अशातच निधीचा हा गोड मुलामा या प्रश्नाला लावला जात आहे.निधी मंजूर : कसा झाला?कोणत्याही रस्त्यासाठी निधी मंजूर होताना त्याचा किमान आराखडा तयार करावा लागतो. आराखडा करताना रस्त्याची पाहणी, त्याची मोजमापे व भौगोलिक परिस्थिती, अडथळे, भूसंपादन अशा सर्व गोष्टींचा विचार करून त्याबाबतच्या खर्चाचा समावेश करावा लागतो. आराखड्यासह एक प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवावा लागतो. त्यानंतर त्याची विविध समित्यांकडून छाननी होऊन अंतिम मंजुरी दिली जाते, मात्र मिरज-सांगली-पेठ अशा मार्गाचा कोणताही आराखडा किंवा प्रस्तावच तयार नाही. तरीही निधी कोणत्या गोष्टीवर मंजूर झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गोष्टीची कल्पना बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनासुद्धा नाही.अधिकारी म्हणतात, कल्पना नाही...राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी बाराशे कोटी आणि एकूणच या मार्गाबाबत काही कल्पना नसल्याचे स्पष्ट केले. बांधकाम विभागानेही मिरज-सांगली रस्त्याच्या हस्तांतरणाबाबत कोणतेही आदेश नसल्याचे स्पष्ट केले.