शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष शेतीबाबत सरकार सकारात्मक : अनिल बाबर यांचा विधानसभेत प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:46 IST

विटा : द्राक्ष बागांना शेडनेट व प्लास्टिकच्या आच्छादनासाठी ५० टक्के अनुदान देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत शुक्रवारी आमदार अनिल बाबर यांनी द्राक्ष बागायातदारांना शेडनेट व प्लास्टिक अच्छादनासाठी अनुदान देण्याचा प्रश्न उपस्थित केला.त्यावर उत्तर देताना सहकारमंत्री ...

ठळक मुद्देशेडनेट व प्लास्टिक आच्छादनासाठी ५० टक्के अनुदान

विटा : द्राक्ष बागांना शेडनेट व प्लास्टिकच्या आच्छादनासाठी ५० टक्के अनुदान देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत शुक्रवारी आमदार अनिल बाबर यांनी द्राक्ष बागायातदारांना शेडनेट व प्लास्टिक अच्छादनासाठी अनुदान देण्याचा प्रश्न उपस्थित केला.

त्यावर उत्तर देताना सहकारमंत्री देशमुख यांनी ५० टक्के अनुदान देण्यास सरकार सकारात्मक असल्याचे सांगून द्राक्ष बागायतदारांच्या अडीअडचणी संदर्भात आमदार बाबर यांच्या समवेत एक महिन्याच्या आत द्राक्ष बागायतदार महासंघाची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला जाईल, असेही सांगितले.

मुंबई येथे विधिमंडळाच्या अधिवेशनात शुक्रवारी द्राक्ष बागायतदारांच्या प्रश्नाबाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित झाला होता. सुरुवातीला मंत्री देशमुख यांनी द्राक्षांची निर्यात वाढली असल्याचे सांगितले. त्यावेळी बाबर यांनी या चर्चेत भाग घेत द्राक्ष बागायतदारांच्या समोरील समस्या व त्या संदर्भातील अडचणींचे काही मुद्दे उपस्थित केले.

बाबर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख यांनी द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द असून, द्राक्षबागांना शेडनेट व प्लास्टिक आच्छादनासाठी ५० टक्के अनुदान देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. द्राक्ष बागायतदारांच्या अडीअडचणी संदर्भात आमदार बाबर यांच्यासमवेत द्राक्ष बागायतदार महासंघाची एका महिन्याच्या आत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला जाईल, असेही सभागृहात सांगितले. बाबर यांच्या लक्षवेधीमुळे द्राक्ष बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.निर्यातीच्या दृष्टीने सवलती आवश्यकआमदार बाबर म्हणाले, साखर व्यवसायात उत्पादन जास्त होते म्हणून आपण निर्यातीच्यादृष्टीने काही सवलतीही दिल्या होत्या. अगदी त्याच पद्धतीने द्राक्षांची निर्यातही वाढली आहेच, शिवाय अन्य फळ बागांच्याही उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. शेतकरी जर उसाच्या शेतीपासून फळ बागाकडे वळू लागला असेल आणि वाढलेले उत्पादन बाहेर पाठवायचे असेल, तर तशा योजना शासनाकडून करण्यात आल्या पाहिजेत. फळ बागा हे भांडवली पीक आहे. त्यासाठी भांडवली खर्चही मोठा करावा लागतो. परिणामी, उत्पादन खर्च कमी करण्याच्यादृष्टीनेही काही योजना करणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात द्राक्ष बागांवर शेडनेट आणि प्लास्टिक आच्छादनाचे काही यशस्वी प्रयोग शेतकºयांनी केले आहेत. त्यासाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येईल काय? असा सवालही बाबर यांनी उपस्थित केला.