शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
2
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
3
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
4
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
6
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
7
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
8
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
9
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
10
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
11
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
12
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
13
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
14
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
15
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
16
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
17
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
18
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
19
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
20
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  

द्राक्ष शेतीबाबत सरकार सकारात्मक : अनिल बाबर यांचा विधानसभेत प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:46 IST

विटा : द्राक्ष बागांना शेडनेट व प्लास्टिकच्या आच्छादनासाठी ५० टक्के अनुदान देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत शुक्रवारी आमदार अनिल बाबर यांनी द्राक्ष बागायातदारांना शेडनेट व प्लास्टिक अच्छादनासाठी अनुदान देण्याचा प्रश्न उपस्थित केला.त्यावर उत्तर देताना सहकारमंत्री ...

ठळक मुद्देशेडनेट व प्लास्टिक आच्छादनासाठी ५० टक्के अनुदान

विटा : द्राक्ष बागांना शेडनेट व प्लास्टिकच्या आच्छादनासाठी ५० टक्के अनुदान देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत शुक्रवारी आमदार अनिल बाबर यांनी द्राक्ष बागायातदारांना शेडनेट व प्लास्टिक अच्छादनासाठी अनुदान देण्याचा प्रश्न उपस्थित केला.

त्यावर उत्तर देताना सहकारमंत्री देशमुख यांनी ५० टक्के अनुदान देण्यास सरकार सकारात्मक असल्याचे सांगून द्राक्ष बागायतदारांच्या अडीअडचणी संदर्भात आमदार बाबर यांच्या समवेत एक महिन्याच्या आत द्राक्ष बागायतदार महासंघाची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला जाईल, असेही सांगितले.

मुंबई येथे विधिमंडळाच्या अधिवेशनात शुक्रवारी द्राक्ष बागायतदारांच्या प्रश्नाबाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित झाला होता. सुरुवातीला मंत्री देशमुख यांनी द्राक्षांची निर्यात वाढली असल्याचे सांगितले. त्यावेळी बाबर यांनी या चर्चेत भाग घेत द्राक्ष बागायतदारांच्या समोरील समस्या व त्या संदर्भातील अडचणींचे काही मुद्दे उपस्थित केले.

बाबर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख यांनी द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द असून, द्राक्षबागांना शेडनेट व प्लास्टिक आच्छादनासाठी ५० टक्के अनुदान देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. द्राक्ष बागायतदारांच्या अडीअडचणी संदर्भात आमदार बाबर यांच्यासमवेत द्राक्ष बागायतदार महासंघाची एका महिन्याच्या आत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला जाईल, असेही सभागृहात सांगितले. बाबर यांच्या लक्षवेधीमुळे द्राक्ष बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.निर्यातीच्या दृष्टीने सवलती आवश्यकआमदार बाबर म्हणाले, साखर व्यवसायात उत्पादन जास्त होते म्हणून आपण निर्यातीच्यादृष्टीने काही सवलतीही दिल्या होत्या. अगदी त्याच पद्धतीने द्राक्षांची निर्यातही वाढली आहेच, शिवाय अन्य फळ बागांच्याही उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. शेतकरी जर उसाच्या शेतीपासून फळ बागाकडे वळू लागला असेल आणि वाढलेले उत्पादन बाहेर पाठवायचे असेल, तर तशा योजना शासनाकडून करण्यात आल्या पाहिजेत. फळ बागा हे भांडवली पीक आहे. त्यासाठी भांडवली खर्चही मोठा करावा लागतो. परिणामी, उत्पादन खर्च कमी करण्याच्यादृष्टीनेही काही योजना करणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात द्राक्ष बागांवर शेडनेट आणि प्लास्टिक आच्छादनाचे काही यशस्वी प्रयोग शेतकºयांनी केले आहेत. त्यासाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येईल काय? असा सवालही बाबर यांनी उपस्थित केला.